शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

अवकाळी पावसामुळे पाचल परिसरात बागायतदारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात वादळीवाऱ्यासह काेसळलेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी ...

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात वादळीवाऱ्यासह काेसळलेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरीवर्गामधून करण्यात येत आहे.

सातत्याने बदलणारे हवामान, अधूनमधून गारांसह पडणारा पाऊस यामुळे अगोदरच आंब्याचे पीक फारच कमी होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत होता. जे आहे ते वाचविण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करीत होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आंबा पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तयार झालेल्या हापूस आंब्यांचा सर्वत्र खच पडला आहे. आधीच कोरोनामुळे शेतकरी गलीतगात्र झाला असून, आता निसर्गही मागे लागल्याने शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नुकसानाची तातडीने दखल घेऊन शासनाने विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे.