शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात दुग्ध व्यवसायाला हवी ऊर्जितावस्था!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST

आजही दुधाचे दर कमी असून, सोसायटींमध्ये सरासरी २५ रुपये लीटर दर हा गायीच्या दुधाला मिळत आहे. पॅकेटबंद दूध ४४ ...

आजही दुधाचे दर कमी असून, सोसायटींमध्ये सरासरी २५ रुपये लीटर दर हा गायीच्या दुधाला मिळत आहे. पॅकेटबंद दूध ४४ ते ४६ रुपये प्रति लीटर दराने विकले जाते. तर काही फार्मस् त्यांच्या दुधाची विक्री थेट ग्राहकांना करतात. त्यासाठी ५५ ते ७० रुपये प्रति लीटर इतका दर आकारला जातो. यासाठी विविध ब्रॅंड व मार्केटिंगचे तंत्र वापरले जाते. यामध्ये देशी गायीचे दूध, फार्म फ्रेश दूध, निर्जंतुक, मनुष्याचा हात न लागलेले दूध, प्रतिजैविकेविरहीत दूध, ओमेगा फॅटयुक्त दूध यामुळे ग्राहकाला विविध प्रकारच्या दुधांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे दूध व दुधापासून बनवलेल्या पदार्थांची आपण कशी विक्री करू शकतो, यावर आपल्या व्यवसायाच्या नफ्याचे गणित ठरते. स्वच्छ व निर्जंतुक दुधाला यापुढे मागणी वाढेल, अशास्थितीत कोकणाला ‘सुदृढ’ बनवणारा लाखो लीटर क्षमतेचा वाशिष्ठी डेअरी प्रकल्प चिपळुणात कार्यरत होत असल्याने तो एक दुग्धशर्करा योग मानला जात आहे. दूध प्रकल्प चिपळुणात सुरु होणे ही फार महत्त्वाची बाब आहे. हा प्रकल्प खासगी तत्त्वावर असला तरी त्याचे संचालन सहकारी पद्धतीने असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख, चिपळूण, खेड तालुक्यांत सहकारी तत्त्वावरचे छोट्या व मध्यम स्वरुपाच्या दूध प्रकल्पांचे प्रयत्न झाले, पण आपल्या कोकणी वृत्तीने त्याचा घातच केला. प्रकल्पाचे भवितव्य हे संकलन होणाऱ्या दुधावर आणि बाय प्रॉडक्टवर असते. शेतकऱ्यांनी स्वतःसाठी व प्रकल्पासाठी प्रामाणिकपणे दूध देण्याचे काम केले तर कोकण अशा प्रकल्पांवर सुफलाम् होण्यास वेळ लागणार नाही. प्रारंभी काळात ३० हजार लीटर दूध संकलन लक्ष्य असलेल्या या दूध प्रकल्पाची कमाल मर्यादा दीड लाख लीटर आहे. कोकणासाठी ही एक मोठी ‘संधी’ आहे. हा कृषी प्रकल्प यशस्वी झाला, तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत हाेण्यास मदत हाेणार आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला दुग्ध व्यवसायाशी निगडीत २२३ दुग्ध संस्थांपैकी केवळ ५८ संस्था सुरु आहेत. तब्बल १६५ दुग्ध संस्था बंद आहेत. शासनाकडून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आवश्यक तेवढे प्रयत्न न झाल्याने जिल्ह्याचा एकूणच दुग्ध व्यवसाय मरणावस्थेत आहे. मात्र, आता या व्यवसायाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने प्रयत्न करायला हवेत.

- संदीप बांद्रे