शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

उंबरशेत येथे वड जाळले

By admin | Updated: March 23, 2017 15:07 IST

ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

आॅनलाईन लोकमतदापोली : तालुक्यातील उटंबर बेलेश्वर मंदिरासमोर मुख्य रस्त्यालगत असलेले पार असलेला वड जाळण्यात आला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. येथील गट ग्रामपंचायतीने दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी ठेकेदाराने दोन्ही पारांचे दगड काढले व तेथे असलेला गवत पाळापाचोळा काढण्यासाठी वेळ वाचावा यासाठी या पारावर वडाच्या दोन्ही बुंध्यांजवळ पेटवले होते. त्यानंतर पाणी टाकून आग विझवली नाही. नंतर ते काम आठ दिवस बंद ठेवण्यात आले. दरम्यान पोखरलेल्या वडाच्या आत घुमत असलेली आग कुणाच्याही लक्षात येण्यासारखी नव्हती. खोडाच्या आतमध्ये पेटून आतल्याआत प्रचंड प्रमाणात राख साचली होती. अचानक दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री शेंड्यापर्यंत भडका होवून खोडाच्या चारही दिशेने राखेचा ढिगारा बाहेर आल्याचे निदर्शनास आले. पहाटेच्या सुमारास या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या व लगत रहात असलेल्या संजय पाटील यांच्या कर्मचाऱ्यांचे हे लक्षात आल्यावर ग्रामपंचायतीकडे संपर्क साधण्यात आला. घटनास्थळी काही ग्रामस्थ व पोलीस पाटील हजर असल्याचे निदर्शनात आले. या घटनेबाबत ग्रामपंचायत सदस्य दिलीप धावरे यांना विचारणा केली असता ते ग्रामपंचायत बघून घेईल याची जबाबदारी ठेकेदाराची असल्याचे धावरे यांनी सांगितले. ठेकेदाराने सुरूवातीला जाळलेले ग्रामपंचायत सदस्यांनी कल्पना आहेच शिवाय अनेक ग्रामस्थांनी पेटवलेले पाहीले आहे. यापुढे ग्रामपंचायत काय कारवाई करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)