शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

दाभोळ खाडी प्रदूषणाच्या विळख्यात

By admin | Updated: July 9, 2014 00:28 IST

महसूलचा कारभार : नियम धाब्यावरए वाळू काठावर... हा प्रकार थांबणार कधी असा सवाल

सुमय्या तांबे : खाडीपट्टा.  बारमाही दुथडी वाहणाऱ्या दाभोळखाडी, वाशिष्टी व जगबुडी नदीच्या संगमावर लोटे येथील उद्योग, कारखान्यातून सन १९९६-९७ पासून सोडण्यात येत असलेल्या मळी आणि रसायनांमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. या दूषित पाण्यामुळे नदीतील बहुमूल्य जलप्राण्यांचा, माशांचा संहार होत आहेए तर सातत्याने दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. १९९६-९७ पूर्वी या तिन्ही नद्यांतील पाणी सर्वाधिक सुरक्षित असे म्हटले जात होते. पण, १९९६-९७ सालापासून सातत्याने या नद्यांमध्ये लोटे येथील उद्योग, कारखान्यातून मळीमिश्रीत आणि धोकादायक रसायनयुक्त दूषित पाणी सोडले जात आहे. खेड खाडीपट्ट्यातील वाहणाऱ्या दाभोळ खाडी व जगबुडी नदीचे पाणी पूर्णपणे धोकादायक बनले असल्याचे चित्र आहे. पण, याकडे कोणताही जबाबदार लोकप्रतिनिधी अथवा राज्यकर्ते गांभीर्याने पाहात नसल्याचे खेदजनक चित्र आहे. दरम्यान, दूषित पाणी सातत्याने प्यावे लागत असल्याने शिर्शी, कर्जी आमशेत, सवणस, तुंबाड, बहिरवली व पन्हाळजे आदी नदीकाठांवरील गावांमध्ये रोगराईचे प्रमाण वाढू लागले आहे. मात्र, याची कोणाला ना खंत ना खेद, असेच संतापजनक चित्र आहे. बहुमूल्य जलसंपत्तीचा नाश होत आहे. दरम्यान, नदीत सातत्याने धोकादायक रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडू लागले आहेत. अक्षरश: कोट्यवधीच्या संख्येने हे मत्स्यधन पाण्यात संपू लागले आहे. वाम, रेनवी, कालचर आदी पारंपरिक माशांच्या जातींची या नदीत मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. पण, दूषित पाण्याने हे मत्स्यधन मृत्यूमुखी पडू लागले आहे. याकडे कोणी गांभीर्याने पाहात नाही. खाडीपट्ट्यातील नदीकाठच्या अनेक गावांमध्ये कोट्यवधीचा खर्च करुन पिण्याच्या पाण्याची उभारणी करण्यात आली आहे. पण, नदीतील पाणी दूषित होऊ लागल्याने या योजना अक्षरश: कुचकामी ठरतात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. तसेच नदीत होणाऱ्या वाळू उत्खननाचा गंभीर परिणाम लोकवस्तीवर होत असल्याने पाणी योजनाही पाण्यात जात आहेत, याची काळजी घ्यावी.