शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दाभोळ खाडी प्रदूषणाच्या विळख्यात

By admin | Updated: July 9, 2014 00:28 IST

महसूलचा कारभार : नियम धाब्यावरए वाळू काठावर... हा प्रकार थांबणार कधी असा सवाल

सुमय्या तांबे : खाडीपट्टा.  बारमाही दुथडी वाहणाऱ्या दाभोळखाडी, वाशिष्टी व जगबुडी नदीच्या संगमावर लोटे येथील उद्योग, कारखान्यातून सन १९९६-९७ पासून सोडण्यात येत असलेल्या मळी आणि रसायनांमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. या दूषित पाण्यामुळे नदीतील बहुमूल्य जलप्राण्यांचा, माशांचा संहार होत आहेए तर सातत्याने दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. १९९६-९७ पूर्वी या तिन्ही नद्यांतील पाणी सर्वाधिक सुरक्षित असे म्हटले जात होते. पण, १९९६-९७ सालापासून सातत्याने या नद्यांमध्ये लोटे येथील उद्योग, कारखान्यातून मळीमिश्रीत आणि धोकादायक रसायनयुक्त दूषित पाणी सोडले जात आहे. खेड खाडीपट्ट्यातील वाहणाऱ्या दाभोळ खाडी व जगबुडी नदीचे पाणी पूर्णपणे धोकादायक बनले असल्याचे चित्र आहे. पण, याकडे कोणताही जबाबदार लोकप्रतिनिधी अथवा राज्यकर्ते गांभीर्याने पाहात नसल्याचे खेदजनक चित्र आहे. दरम्यान, दूषित पाणी सातत्याने प्यावे लागत असल्याने शिर्शी, कर्जी आमशेत, सवणस, तुंबाड, बहिरवली व पन्हाळजे आदी नदीकाठांवरील गावांमध्ये रोगराईचे प्रमाण वाढू लागले आहे. मात्र, याची कोणाला ना खंत ना खेद, असेच संतापजनक चित्र आहे. बहुमूल्य जलसंपत्तीचा नाश होत आहे. दरम्यान, नदीत सातत्याने धोकादायक रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडू लागले आहेत. अक्षरश: कोट्यवधीच्या संख्येने हे मत्स्यधन पाण्यात संपू लागले आहे. वाम, रेनवी, कालचर आदी पारंपरिक माशांच्या जातींची या नदीत मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. पण, दूषित पाण्याने हे मत्स्यधन मृत्यूमुखी पडू लागले आहे. याकडे कोणी गांभीर्याने पाहात नाही. खाडीपट्ट्यातील नदीकाठच्या अनेक गावांमध्ये कोट्यवधीचा खर्च करुन पिण्याच्या पाण्याची उभारणी करण्यात आली आहे. पण, नदीतील पाणी दूषित होऊ लागल्याने या योजना अक्षरश: कुचकामी ठरतात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. तसेच नदीत होणाऱ्या वाळू उत्खननाचा गंभीर परिणाम लोकवस्तीवर होत असल्याने पाणी योजनाही पाण्यात जात आहेत, याची काळजी घ्यावी.