शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डी. एड्.च्या जागा २४०, अर्ज मात्र १०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST

रत्नागिरी : दोन वर्षे डी. एड्. करून वर्षानुवर्ष नोकरीअभावी बेरोजगार म्हणून राहावे लागत असल्याने डी. एड्. प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ ...

रत्नागिरी : दोन वर्षे डी. एड्. करून वर्षानुवर्ष नोकरीअभावी बेरोजगार म्हणून राहावे लागत असल्याने डी. एड्. प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. विद्यार्थी संख्या वाढावी, यासाठी डी. एड्. महाविद्यालयांनी प्रवेशासाठी गुणवत्तेची टक्केवारीही खाली आणली आहे. तरीही जिल्ह्यातील २४० जागांसाठी अवघ्या १० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

जिल्ह्यात दोन अनुदानित, चार विनाअनुदानित डी. एड्. महाविद्यालये होती. त्यापैकी गेल्या पाच - सहा वर्षांतील विद्यार्थी गळतीमुळे दोन विनाअनुदानित महाविद्यालये बंद झाली आहेत. त्यामुळे दोन अनुदानित व दोन विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये एकूण २४० विद्यार्थी प्रवेश क्षमता असताना आतापर्यंत अवघे १० प्रवेश विद्यार्थ्यांनी घेतले आहेत. प्रवेश अर्जासाठी दि. २३ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

डी. एड्. पदविका अभ्यासक्रमानंतर नोकरीची खात्री असल्यामुळे दहा ते बारा वर्षांपूर्वी या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक होता. प्रवेशासाठी गुणवत्तेचा कस लागत असे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला असल्याने मर्यादित जागा व प्रवेश अर्ज अधिक असल्याने ८९ ते ९० टक्केपर्यंत उच्चतम गुणवत्तेवर काही वर्षांपूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागली होती.

मात्र, आठ वर्षांपूर्वी डी. एड्. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीसाठी टीईटी परीक्षा सक्तीची केली. शिवाय शिक्षक भरतीही २०१०नंतर बंद आहे. २०१७मध्ये ‘पवित्र पोर्टल’द्वारे राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया अद्याप रेंगाळली आहे. दोन वर्षे डी. एड्. करण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही नोकरीची शाश्वती नाही. खासगी संस्थेमध्ये अडीच ते तीन हजार रूपयांवर राबावे लागते अन्यथा बेरोजगार म्हणूनच राहावे लागते. पदवीधर नसल्यामुळे कारकून म्हणूनही खासगी संस्थांमध्ये काम मिळत नाही. गेल्या सात ते आठ वर्षांत जिल्ह्यात डी. एड्. झालेले हजारो विद्यार्थी बेरोजगार आहेत. ग्रामीण भागातील काही डीएडधारक तर उपजीविकेसाठी मजुरी करत आहेत. शासनाच्या अजब धोरणामुळे डीएड विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

शासकीय धोरणाचा परिणाम म्हणूनच डी. एड. महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील दोन विनाअनुदानित महाविद्यालये आधीच बंद झाली आहेत. रत्नागिरी, राजापूर येथील अनुदानित व खेड, सावर्डे येथील विनाअनुदानित महाविद्यालये सुरू आहेत. या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोजकीच असल्याने प्रवेशासाठी चक्क गुणवत्ताच खाली आणण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता ४४.५० टक्के, तर खुल्या संवर्गासाठी ४९.५० टक्के प्रवेशासाठी गुणवत्ता निश्चित केली आहे. काही वर्षांपूर्वी प्रवेशासाठी गर्दी होत असे. परंतु, आता विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रवेश घेण्यासाठी विनवणी केली जात आहे.