शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

चिपळुणात चक्रीवादळाचा ५८७ शेतकऱ्यांना फटका, ४५६ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

अडरे : चिपळूण तालुक्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका तालुक्यातील ग्रामीण भागातील आंबा-काजू बागायतदारांना मोठ्या प्रमाणात बसला असून, तालुक्यातील एकूण ...

अडरे : चिपळूण तालुक्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका तालुक्यातील ग्रामीण भागातील आंबा-काजू बागायतदारांना मोठ्या प्रमाणात बसला असून, तालुक्यातील एकूण ७५.७४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तर या वादळात ५८७ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, आत्तापर्यंत ४५६ शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम कृषी सहाय्यकांकडून सुरू आहे. यामध्ये दोनप्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये एक वादळाने झाडे उन्मळून पडल्याने व झाडावरील आंबे पडून झालेल्या नुकसानाचा समावेश आहे.

चिपळूण तालुक्यात आंबा ६ हजार हेक्टर क्षेत्रावर तर काजू १३ हजार हेक्टर क्षेत्रावर असे एकूण १९ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. मात्र, दरवर्षी पडणाऱ्या अवकाळी पाऊस व वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान होते. चिपळूण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळाने ग्रामीण भागातील घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले आहे तसेच घरांवर झाडे पडल्याने व सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक अंदाजानुसार १३० गावांमधील आंबा व काजू बागायतदारांचेही नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने पुरता उद्ध्वस्त झालेला शेतकरी पुन्हा यावर्षी तौक्ते चक्रीवादळाने उद्ध्वस्त झाला आहे. काढणीयोग्य तयार झालेल्या आंब्याची झाडे उन्मळून पडल्याने व झाडावरील आंबे गळून पडल्याने नुकसान झाले आहे. कृषी विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे तालक्यातील १३० गावांमधील शेतकऱ्यांचे अवघे १९ कर्मचारी पंचनामे करत असून, या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम तालुका कृषी अधिकारी राहुल अडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.