शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात चक्रीवादळाचा ५८७ शेतकऱ्यांना फटका, ४५६ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

अडरे : चिपळूण तालुक्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका तालुक्यातील ग्रामीण भागातील आंबा-काजू बागायतदारांना मोठ्या प्रमाणात बसला असून, तालुक्यातील एकूण ...

अडरे : चिपळूण तालुक्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका तालुक्यातील ग्रामीण भागातील आंबा-काजू बागायतदारांना मोठ्या प्रमाणात बसला असून, तालुक्यातील एकूण ७५.७४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तर या वादळात ५८७ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, आत्तापर्यंत ४५६ शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम कृषी सहाय्यकांकडून सुरू आहे. यामध्ये दोनप्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये एक वादळाने झाडे उन्मळून पडल्याने व झाडावरील आंबे पडून झालेल्या नुकसानाचा समावेश आहे.

चिपळूण तालुक्यात आंबा ६ हजार हेक्टर क्षेत्रावर तर काजू १३ हजार हेक्टर क्षेत्रावर असे एकूण १९ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. मात्र, दरवर्षी पडणाऱ्या अवकाळी पाऊस व वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान होते. चिपळूण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळाने ग्रामीण भागातील घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले आहे तसेच घरांवर झाडे पडल्याने व सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक अंदाजानुसार १३० गावांमधील आंबा व काजू बागायतदारांचेही नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने पुरता उद्ध्वस्त झालेला शेतकरी पुन्हा यावर्षी तौक्ते चक्रीवादळाने उद्ध्वस्त झाला आहे. काढणीयोग्य तयार झालेल्या आंब्याची झाडे उन्मळून पडल्याने व झाडावरील आंबे गळून पडल्याने नुकसान झाले आहे. कृषी विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे तालक्यातील १३० गावांमधील शेतकऱ्यांचे अवघे १९ कर्मचारी पंचनामे करत असून, या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम तालुका कृषी अधिकारी राहुल अडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.