शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

मिसळीतून कांदा गायब, कांदाभजीचा पत्ता कट

By admin | Updated: July 9, 2014 23:55 IST

पुन्हा कांदा संकट : व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी...

रत्नागिरी : कांद्याचे दर वधारले आहेत. सध्या ३० ते ३५ रूपये किलो दराने कांदा विक्री सुरू आहे. भविष्यात दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिसळीतील कांदा गायब झाला आहे, तर टपऱ्यांवरील कांदाभजीचा पत्ताच कट झाला आहे.कांदा वधारल्यामुळे उपाहारगृह व टपरी व्यावसायिकांना कांदा सढळ हस्ते देणे परवडत नाही. कांदा भविष्यात वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. गतवर्षी कांद्याने १०० रूपये किलोपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर ते खाली आले होते. सहा ते सात रूपये दराने कांद्याची विक्री सुरू होती. परंतु पावसाअभावी कांद्याचे दर वधारले तसेच ते आणखी वधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उपाहारगृह चालकांनी मिसळीतून कांदा देणे बंद केले आहे. काही उपाहारगृहांतून मिसळीत थोडासा कांदा दिला जातो. परंतु कांदाभजी मात्र बंद करण्यात आली आहे. कांदा ७ ते ८ रूपये किलो दराने विकण्यात येत होता. त्यावेळी कांदाभजी १५ रूपयांना ५ नग देण्यात येत होते. मात्र, ३० ते ३५ रूपये दर असल्याने दर वाढविला तर सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारा नसल्यामुळे कांदाभजी काढणे बंद करण्यात आली आहे.मूग किंवा वाटाण्याच्या गरमागरम रशात सढळ हस्ते कांदा, फरसाण, कोथिंबीर, कांदेपोहे, शेव घातली जाते. वरून पुन्हा एकदा कडकडीत रस्सा ओतला जातो. कांद्याचा दर वाढल्याने सढळ हस्ते कांदा देणे परवडत नाही. त्यामुळे बहुतांश उपाहारगृहातून मिसळीत थोडासा कांदा दिला जातो, तर टपरी व्यावसायिकांनी तो देणेच बंद केले आहे. शिवाय पुन्हा कुठल्या ग्राहकांनी कांदा मागविला तर त्यांना चक्क नकार दिला जातो. बहुतांश हॉटेल्समध्ये कांद्याऐवजी चिरलेला कोबी दिला जातो.टपरीवर येणारा ग्राहक सर्वसाधारण गटातील असतो. त्यामुळे कांदाभजीचे दर वाढविणे परवडणारे नाही. त्यामुळे कांदाभजी तयार करणे बंद करण्यात आले आहे. शिवाय पावसाळ्यात घरोघरी भजीचा सुगंध दरवळतो. मात्र, यावर्षी महागाईमुळे कांद्याऐवजी चक्क कोबीची भजी करून पानात वाढून घेतली जात आहे.यावर्षी कांदा, बटाट्याचे दर वाढले आहेत. अजून दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे साठा केलेला कांदा जपून वापरण्यात येत आहे. कांदाभजी प्लेटमध्ये १५ रूपयास ५ नग देणे परवडत नाही. प्लेटचे दर वाढविले तर मात्र ते ग्राहकांस परवडणारे नाहीत. त्यामुळे एकूण अंदाज घेत कांदाभजीची विक्री बंद करण्यात आली आहे. मिसळीत नावाला कांदा घालण्यात येत आहे. बटाटाभजी, बटाटावडा, मिक्स भजी, मिरची भजी सध्या विक्रीस उपलब्ध आहेत.- के.एस. कांबळे, व्यावसायिक, रत्नागिरी (प्रतिनिधी)