शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पार्सल सेवेकडे ग्राहकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:30 IST

लग्नाचे कार्यक्रम रद्द रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वत्र लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे नियोजित लग्नसमारंभ रद्द ...

लग्नाचे कार्यक्रम रद्द

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वत्र लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे नियोजित लग्नसमारंभ रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सभागृह, कॅटरिंग, साऊंड सिस्टिम, वाद्यवृंद आदी विविध व्यवसायांवर त्याचा परिणाम झाला आहे. २५ लोकांची परवानगी असल्याने काही यजमानांनी सभागृह रद्द करून घरातच लग्नसोहळा उरकत आहेत.

परीक्षा ऑनलाइन

रत्नागिरी : कोरोनामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डिसेंबर २०२० च्या प्रलंबित विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा मे महिन्यात ऑनलाइन होणार आहेत. विद्यापीठाने संकेतस्थळावर वेळापत्रक जारी केले आहे. सकाळ, दुपारच्या प्रत्येकी पाच तासांच्या सत्रात विद्यार्थ्यांना ही एक तासाची परीक्षा द्यायची आहे.

नियंत्रण कक्ष कार्यान्वित

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लागू केले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, निविष्ठांचा पुरवठा सुरळत व्हावा, यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी ते सकाळी ६ यावेळेत संपर्क साधण्यासाठी कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मार्गदर्शन कार्यशाळा

रत्नागिरी : माेहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘पशुसंवर्धन एक स्वयंरोजगाराचा उत्तम पर्याय’ या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंचायत समितीचे विकास विस्तार अधिकारी डाॅ.अभिजित कसाळकर यांनी मार्गदर्शन केले.

बीएसएनएल सेवेचा बोजवारा

राजापूर : तालुक्यातील गोवळ येथील भारत संचार निगमचा मोबाइल टाॅवर गेले कित्येक दिवस बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. या संदर्भात तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याबद्दल ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पन्हळे, दादनवाडी, शिवणे, गोवळ, सोगमवाडी या वाड्या बीएसएनएलवर अवलंबून असल्याने त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

टँकरला मागणी

खेड : तालुक्यातील दुर्गम भागात ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. तालुक्यातील चार गावे व सहा वाड्यांना एका शासकीय टँकरद्वारे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पहिला टँकर खवटी - खालची धनगरवाडी येथे धावला होता. त्यानंतर वरची धनगरवाडी, आंबवली - भिंगारा, सवणस - मूळगाव या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू झाला.

सनियंत्रित समितीची सभा

राजापूर : जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची २०२१-२२ या वित्तीय वर्षाची पहिली सभा खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्रप्रणालीद्वारे झाली. या सभेत शासनाच्या विविध योजनांच्या आढावा घेण्यात आला. आमदार राजन साळवी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव उपस्थित होते.

पथदीप बंद

राजापूर : राजापुरातील साखरीनाटे गावातील पथदीप काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याने हे बंद पथदीप तत्काळ सुरू करावेत, अशी ग्रामीण ग्रामस्थांतून होत आहे.

कागदपत्रे तपासण्याची मागणी

रत्नागिरी : राज्यस्तरावरून आरटीई कायद्यांतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत जाहीर करण्यात आली आहे. पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाची तारीख बघावी. निर्धारित मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.