शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

कवडीमोलाची कॅनिंग वारी

By admin | Updated: May 31, 2016 00:35 IST

बागायतदार अडचणीत : हापूसचा दिलासा नाहीच

शिवाजी गोरे -- दापोलीकोकण म्हटले की, हापूस डोळ्यासमोर येतो. कोकणचा हापूस राज्यातच नव्हे तर आता विदेशातही प्रसिद्ध आहे. आंब्याचा राजा हापूस संकटात सापडल्याने बागायतदारांच्या अडचणीत वाढ होत आहे. दरवर्षी गेल्या वर्षीचे पीक बरे होते, असे म्हणण्याची वेळ आता आंबा बागायतदारांवर येऊ लागली आहे. यावर्षी हापूस आंबा कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देईल, असे वाटत असताना यावर्षीसुद्धा आंब्याच्या राजाने बागायतदारांना दिलासा दिलेला नाही. त्यामुळे विदर्भातील संत्र व पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांप्रमाणेच कोकणातील आंबा बागायतदार शेतकरीही अडचणीत सापडला आहे.कोकणातील रत्नागिरी, देवगड हापूस सर्वत्र प्रसिद्ध आहे. हापूसने मार्केटमध्ये चांगले नाव कमावले आहे. परंतु, हाच हापूस आता निसर्गाच्या वक्रदृष्टीत सापडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. हापूसमधील दुर्गूण म्हणजे हापूसमधील साका. हा साका दूर करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. कारण हापूसमधील साक्यामुळे मार्के टमध्ये हापूस बदनाम होत आहे. हापूसचे मार्के टींग करण्यात शेतकरी कमी पडत असून, कोकणात कमर्शियल आंबा बागायतदारच केवळ आंब्याचे मार्के टींग करीत आहे. आंब्याच्या झाडाला कल्टारचा हाय डोस दिला जात आहे. हापूसचे पीक आता नैसर्गिकऐवजी रासायनिक होऊ लागले आहे. काही शेतकरी मात्र आजही सेंद्रीय पद्धतीने हापूसचे पीक घेत आहेत. हापूस आंब्याचे पीक घ्यायचे असेल तर शेतकऱ्याने हापूसच्या झाडांची काळजी ही घ्यायलाच हवी.मेहनत वाया... : सुरुवातीला चांगला भाव पण...३० टक्के हापूस अजूनही झाडावर!हंगामाच्या अंतिम टप्प्यात ३० टक्के आंबा अजूनही झाडावर आहे. हा आंबा कॅनिंगला पाठविला जात आहे. परंतु, कॅनिंगमधून शेतकऱ्याला फारसा फायदा होताना दिसत नाही. हापूस हंगामाच्या सुरुवातीला काही बागायतदारांना मात्र चांगला दर मिळाला. त्यानंतर कर्नाटक हापूसची ‘एंट्री’ वाशी मार्केटमध्ये झाल्याने आंब्याचे दर घसरले. आता तर कवडीमोलाने हापूस विक्री होत आहे.हापूसचे दर पडलेआंबा हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला. परंतु, ज्यांचा आंबा उशिरा तयार झाला. त्यांना मात्र दरात फटका बसला आहे. शेवटच्या टप्प्यात आता मार्केटमध्ये हापूसचे दर १०० रुपये डझन झाले असून, त्यामुळे बागायतदार शेतकऱ्याला हे दर परवडणारे नाहीत. वर्षभर मेहनत करुन हापूसला योग्य दर मिळाला नाही तर आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.आंबा नुकसानभरपाई मिळावीआंबा मोहरण्याच्या कालावधीत पाऊस पडल्याने मोहरावर करपा पडून आंब्याचे पीक हातचे गेले. यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेत आंबेच आले नाहीत. काही बागायतदारांनी मात्र योग्य मशागत करुन थोडेफार पीक घेतले आहे. परंतु, पावसामुळे कोकणातील हापूसचे पीक हातचे गेल्याने आंबा नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.