शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

कवडीमोलाची कॅनिंग वारी

By admin | Updated: May 31, 2016 00:35 IST

बागायतदार अडचणीत : हापूसचा दिलासा नाहीच

शिवाजी गोरे -- दापोलीकोकण म्हटले की, हापूस डोळ्यासमोर येतो. कोकणचा हापूस राज्यातच नव्हे तर आता विदेशातही प्रसिद्ध आहे. आंब्याचा राजा हापूस संकटात सापडल्याने बागायतदारांच्या अडचणीत वाढ होत आहे. दरवर्षी गेल्या वर्षीचे पीक बरे होते, असे म्हणण्याची वेळ आता आंबा बागायतदारांवर येऊ लागली आहे. यावर्षी हापूस आंबा कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देईल, असे वाटत असताना यावर्षीसुद्धा आंब्याच्या राजाने बागायतदारांना दिलासा दिलेला नाही. त्यामुळे विदर्भातील संत्र व पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांप्रमाणेच कोकणातील आंबा बागायतदार शेतकरीही अडचणीत सापडला आहे.कोकणातील रत्नागिरी, देवगड हापूस सर्वत्र प्रसिद्ध आहे. हापूसने मार्केटमध्ये चांगले नाव कमावले आहे. परंतु, हाच हापूस आता निसर्गाच्या वक्रदृष्टीत सापडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. हापूसमधील दुर्गूण म्हणजे हापूसमधील साका. हा साका दूर करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. कारण हापूसमधील साक्यामुळे मार्के टमध्ये हापूस बदनाम होत आहे. हापूसचे मार्के टींग करण्यात शेतकरी कमी पडत असून, कोकणात कमर्शियल आंबा बागायतदारच केवळ आंब्याचे मार्के टींग करीत आहे. आंब्याच्या झाडाला कल्टारचा हाय डोस दिला जात आहे. हापूसचे पीक आता नैसर्गिकऐवजी रासायनिक होऊ लागले आहे. काही शेतकरी मात्र आजही सेंद्रीय पद्धतीने हापूसचे पीक घेत आहेत. हापूस आंब्याचे पीक घ्यायचे असेल तर शेतकऱ्याने हापूसच्या झाडांची काळजी ही घ्यायलाच हवी.मेहनत वाया... : सुरुवातीला चांगला भाव पण...३० टक्के हापूस अजूनही झाडावर!हंगामाच्या अंतिम टप्प्यात ३० टक्के आंबा अजूनही झाडावर आहे. हा आंबा कॅनिंगला पाठविला जात आहे. परंतु, कॅनिंगमधून शेतकऱ्याला फारसा फायदा होताना दिसत नाही. हापूस हंगामाच्या सुरुवातीला काही बागायतदारांना मात्र चांगला दर मिळाला. त्यानंतर कर्नाटक हापूसची ‘एंट्री’ वाशी मार्केटमध्ये झाल्याने आंब्याचे दर घसरले. आता तर कवडीमोलाने हापूस विक्री होत आहे.हापूसचे दर पडलेआंबा हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला. परंतु, ज्यांचा आंबा उशिरा तयार झाला. त्यांना मात्र दरात फटका बसला आहे. शेवटच्या टप्प्यात आता मार्केटमध्ये हापूसचे दर १०० रुपये डझन झाले असून, त्यामुळे बागायतदार शेतकऱ्याला हे दर परवडणारे नाहीत. वर्षभर मेहनत करुन हापूसला योग्य दर मिळाला नाही तर आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.आंबा नुकसानभरपाई मिळावीआंबा मोहरण्याच्या कालावधीत पाऊस पडल्याने मोहरावर करपा पडून आंब्याचे पीक हातचे गेले. यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेत आंबेच आले नाहीत. काही बागायतदारांनी मात्र योग्य मशागत करुन थोडेफार पीक घेतले आहे. परंतु, पावसामुळे कोकणातील हापूसचे पीक हातचे गेल्याने आंबा नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.