शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

गर्दीच्या ठिकाणी तपासणी होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST

असे असताना, दुसऱ्या बाजूला मात्र बेफिकीरी दाखविणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. त्यामुळे आपल्याला काही झालेले नाही अशा थाटात वावरणाऱ्या ...

असे असताना, दुसऱ्या बाजूला मात्र बेफिकीरी दाखविणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. त्यामुळे आपल्याला काही झालेले नाही अशा थाटात वावरणाऱ्या आणि ज्या व्यक्तींमध्ये लक्षणे दिसत नाहीत अशांकडून संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, अशांवर सध्या कोणतेच बंधन नसल्याचे दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये गृहअलगीकरणात असलेल्यांच्या हातावर पूर्वीसारखा शिक्का अद्याप मारलेला नव्हता, तसेच अशांच्या घरावरही गृहअलगीकरणासंदर्भात कुठलीच सूचना नसल्याने अनेक ग्राम कृती दलांनाही अशा व्यक्तींबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळे अशा पाॅझिटिव्ह व्यक्ती गावांमध्ये, वाडींमध्ये राजरोस फिरत राहिल्याने अनेक गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कोरोना गावांमध्ये वाढण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.

दुसरं महत्त्वाचे कारण म्हणजे बाहेरून येणाऱ्यांना एस. टी. प्रवासासाठी ई-पास आहे. मात्र, कोकण रेल्वेसाठी ई- पासची अट नाही, तसेच पूर्वी जिल्हा प्रशासनाने रेल्वे स्थानके, बसस्थानके याठिकाणी थर्मल गन, ऑक्सिमीटर आदींमार्फत येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र, त्याप्रमाणे काहीच झाले नाही. कोकण रेल्वेस्थानकावर बाहेरून येणाऱ्यांनी कोरोना चाचणीबाबत अहवाल आणला तरीही त्याची गरज नसल्याचे सांगून आता केवळ त्यांच्या हातावर होम विलगीकरणाचा शिक्का मारला जात आहे. त्यामुळे या प्रवाशांमधून अनेक पाॅझिटिव्ह व्यक्ती जिल्ह्यात आल्या असून, त्यांनी आतापर्यंत त्यांच्या घरातील अनेक व्यक्तींना बाधित केले आणि त्यांच्या घरातल्यांकडून बाहेरच्यांनाही मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

गेल्या वर्षभरात जेवढी झाली नाही त्यापेक्षाही जास्त रुग्णसंख्या केवळ एप्रिल महिन्यात वाढली आहे. या महिन्यात तब्बल साडेअकरा हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामागची ही कारणे जिल्हा प्रशासनाने लक्षात घ्यायला हवीत. आज आरोग्य यंत्रणेवर रुग्ण वाचविण्यासाठी प्रचंड ताण आहे. हा ताण कमी करायचा असेल तर जिथे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे, तिथे काटेकोरपणे तपासणी होणे गरजेचे होते. मात्र, ती न झाल्याने जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडणे अशक्य झाले आहे. सध्या चाचण्या केल्या जाताहेत, त्यातूनच कोरोनाबाधितांची संख्या पुढे येत आहे. मात्र, जे अद्याप चाचण्या न करताच घरात आहेत त्यांच्याकडून कोरोनाचा होणारा फैलाव राेखणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सध्या ही संख्या आटोक्यात आणताना जिल्हा प्रशासन मेटाकुटीस आले आहे.

सध्या भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करून त्यांना सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, तिथेही होणारी गर्दी न टाळता येण्यासारखी आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करून सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी तपासणी करायला हवी. अन्यथा आरोग्य यंत्रणेचे रुग्णांना वाचविण्यासाठीचे प्रयत्न फोल ठरतील.