शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची केंद्रांवर होतेय गर्दी; पण लसीकरणासाठी लसच कुठाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात लसीकरणासाठी ज्येष्ठांबरोबरच आता अन्य नागरिकही गर्दी करू लागलेत. मात्र, जिल्ह्यात येणारी लस अपुरी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात लसीकरणासाठी ज्येष्ठांबरोबरच आता अन्य नागरिकही गर्दी करू लागलेत. मात्र, जिल्ह्यात येणारी लस अपुरी असल्याने लसीकरण केंद्रावर जाऊनही अनेकांना परत यावे लागत आहे. सध्या जिल्ह्यात दररोज २५ हजार डोस देण्याची आरोग्य यंत्रणेची क्षमता असली तरीही तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्याची टक्केवारी रोडावलेली आहे.

केंद्र शासनाने आता १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस देण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यात १८ वर्षांवरील सुमारे १३ लाख नागरिक आहेत. त्यांपैकी आतापर्यंत तीन लाख ४९ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटाला लस देणे तात्पुरते थांबविण्यात आले आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देणे सुरू झाले आहे. परंतु सध्या ४५ वरील वयोगटालाच लस मिळेनाशी झाली आहे. जिल्ह्याला होणारा लसीचा पुरवठाच अपुरा असल्याने सध्या लसीकरण सुरू असलेल्या १३६ केंद्रांना ५० ते २०० डोस एवढेच मिळतात. त्यामुळे देताना नागरिकांमध्ये वाद होत आहे.

लसीकरण कमी होण्याचे कारण

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, जिल्ह्याला लस अपुरी मिळत असल्याने जिल्ह्यात सध्या जेमतेम २५ टक्के नागरिकांचेच लसीकरण झालेले आहे.

केवळ २७ टक्केच लसीकरण झाले.....

जिल्ह्यात १८ वर्षांवरील सुमारे १३ लाख नागरिक आहेत. यांपैकी सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याची घोषणा केली होती. मात्र, लस अपुरी पडू लागल्याने या वयोगटाचे लसीकरण थांबविले आहे.

सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली असली तरी अजूनही दोन्ही लसींचा पुरवठा तेवढ्या प्रमाणात होत नाही.

जिल्ह्यातील १३६ केंद्रांवर सध्या लसीकरण होत असले तरीही या केंद्रांना क्षमतेपेक्षा कमी लसपुरवठा होत असल्याने ती कुणाला देणार, ही समस्या निर्माण होत आहे.

जिल्ह्याची दररोज २५ हजारांची क्षमता

जिल्ह्याची दररोज अगदी २५ हजार डोस देण्याची क्षमता आहे. सध्या दररोज जेवढी लस येत आहे, तेवढ्या लसींचे आपण नियोजन करीत आहोत. त्यामुळे आता राज्याकडून येणारा कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्हीही लसींचा पुरवठा अधिक येत आहे.

- डाॅ. इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी

लसीकरण कमी होण्याचे कारण

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, जिल्ह्याला लस अपुरी मिळत असल्याने जिल्ह्यात सध्या जेमतेम २५ टक्के नागरिकांचेच लसीकरण झालेले आहे.