शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची केंद्रांवर होतेय गर्दी; पण लसीकरणासाठी लसच कुठाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात लसीकरणासाठी ज्येष्ठांबरोबरच आता अन्य नागरिकही गर्दी करू लागलेत. मात्र, जिल्ह्यात येणारी लस अपुरी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात लसीकरणासाठी ज्येष्ठांबरोबरच आता अन्य नागरिकही गर्दी करू लागलेत. मात्र, जिल्ह्यात येणारी लस अपुरी असल्याने लसीकरण केंद्रावर जाऊनही अनेकांना परत यावे लागत आहे. सध्या जिल्ह्यात दररोज २५ हजार डोस देण्याची आरोग्य यंत्रणेची क्षमता असली तरीही तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्याची टक्केवारी रोडावलेली आहे.

केंद्र शासनाने आता १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस देण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यात १८ वर्षांवरील सुमारे १३ लाख नागरिक आहेत. त्यांपैकी आतापर्यंत तीन लाख ४९ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटाला लस देणे तात्पुरते थांबविण्यात आले आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देणे सुरू झाले आहे. परंतु सध्या ४५ वरील वयोगटालाच लस मिळेनाशी झाली आहे. जिल्ह्याला होणारा लसीचा पुरवठाच अपुरा असल्याने सध्या लसीकरण सुरू असलेल्या १३६ केंद्रांना ५० ते २०० डोस एवढेच मिळतात. त्यामुळे देताना नागरिकांमध्ये वाद होत आहे.

लसीकरण कमी होण्याचे कारण

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, जिल्ह्याला लस अपुरी मिळत असल्याने जिल्ह्यात सध्या जेमतेम २५ टक्के नागरिकांचेच लसीकरण झालेले आहे.

केवळ २७ टक्केच लसीकरण झाले.....

जिल्ह्यात १८ वर्षांवरील सुमारे १३ लाख नागरिक आहेत. यांपैकी सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याची घोषणा केली होती. मात्र, लस अपुरी पडू लागल्याने या वयोगटाचे लसीकरण थांबविले आहे.

सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली असली तरी अजूनही दोन्ही लसींचा पुरवठा तेवढ्या प्रमाणात होत नाही.

जिल्ह्यातील १३६ केंद्रांवर सध्या लसीकरण होत असले तरीही या केंद्रांना क्षमतेपेक्षा कमी लसपुरवठा होत असल्याने ती कुणाला देणार, ही समस्या निर्माण होत आहे.

जिल्ह्याची दररोज २५ हजारांची क्षमता

जिल्ह्याची दररोज अगदी २५ हजार डोस देण्याची क्षमता आहे. सध्या दररोज जेवढी लस येत आहे, तेवढ्या लसींचे आपण नियोजन करीत आहोत. त्यामुळे आता राज्याकडून येणारा कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्हीही लसींचा पुरवठा अधिक येत आहे.

- डाॅ. इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी

लसीकरण कमी होण्याचे कारण

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, जिल्ह्याला लस अपुरी मिळत असल्याने जिल्ह्यात सध्या जेमतेम २५ टक्के नागरिकांचेच लसीकरण झालेले आहे.