शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

नागरिकांची केंद्रांवर होतेय गर्दी; पण लसीकरणासाठी लसच कुठाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात लसीकरणासाठी ज्येष्ठांबरोबरच आता अन्य नागरिकही गर्दी करू लागलेत. मात्र, जिल्ह्यात येणारी लस अपुरी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात लसीकरणासाठी ज्येष्ठांबरोबरच आता अन्य नागरिकही गर्दी करू लागलेत. मात्र, जिल्ह्यात येणारी लस अपुरी असल्याने लसीकरण केंद्रावर जाऊनही अनेकांना परत यावे लागत आहे. सध्या जिल्ह्यात दररोज २५ हजार डोस देण्याची आरोग्य यंत्रणेची क्षमता असली तरीही तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्याची टक्केवारी रोडावलेली आहे.

केंद्र शासनाने आता १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस देण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यात १८ वर्षांवरील सुमारे १३ लाख नागरिक आहेत. त्यांपैकी आतापर्यंत तीन लाख ४९ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटाला लस देणे तात्पुरते थांबविण्यात आले आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देणे सुरू झाले आहे. परंतु सध्या ४५ वरील वयोगटालाच लस मिळेनाशी झाली आहे. जिल्ह्याला होणारा लसीचा पुरवठाच अपुरा असल्याने सध्या लसीकरण सुरू असलेल्या १३६ केंद्रांना ५० ते २०० डोस एवढेच मिळतात. त्यामुळे देताना नागरिकांमध्ये वाद होत आहे.

लसीकरण कमी होण्याचे कारण

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, जिल्ह्याला लस अपुरी मिळत असल्याने जिल्ह्यात सध्या जेमतेम २५ टक्के नागरिकांचेच लसीकरण झालेले आहे.

केवळ २७ टक्केच लसीकरण झाले.....

जिल्ह्यात १८ वर्षांवरील सुमारे १३ लाख नागरिक आहेत. यांपैकी सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याची घोषणा केली होती. मात्र, लस अपुरी पडू लागल्याने या वयोगटाचे लसीकरण थांबविले आहे.

सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली असली तरी अजूनही दोन्ही लसींचा पुरवठा तेवढ्या प्रमाणात होत नाही.

जिल्ह्यातील १३६ केंद्रांवर सध्या लसीकरण होत असले तरीही या केंद्रांना क्षमतेपेक्षा कमी लसपुरवठा होत असल्याने ती कुणाला देणार, ही समस्या निर्माण होत आहे.

जिल्ह्याची दररोज २५ हजारांची क्षमता

जिल्ह्याची दररोज अगदी २५ हजार डोस देण्याची क्षमता आहे. सध्या दररोज जेवढी लस येत आहे, तेवढ्या लसींचे आपण नियोजन करीत आहोत. त्यामुळे आता राज्याकडून येणारा कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्हीही लसींचा पुरवठा अधिक येत आहे.

- डाॅ. इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी

लसीकरण कमी होण्याचे कारण

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, जिल्ह्याला लस अपुरी मिळत असल्याने जिल्ह्यात सध्या जेमतेम २५ टक्के नागरिकांचेच लसीकरण झालेले आहे.