शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

खेडमध्ये पावणेतीन कोटींचे नुकसान

By admin | Updated: September 25, 2016 00:57 IST

पावसाचा जोर कमी : कुंभार्ली घाटातही दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक संथ गतीने

रत्नागिरी : दोन दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पडझडीच्या तसेच रस्ते खचण्याच्या घटना घडल्या आहेत. खेड बाजारपेठेत पाणी घुसल्याने १२९ दुकानांचे २ कोटी ८६ लाखांचे नुकसान झाले आहे. तर संगमेश्वरातील सोनगिरी नदीचा प्रवाह बदलल्याने या भागातील घरांना धोका निर्माण झाला आहे. शनिवारी पावसाचा जोर थोडासा कमी झाल्याने खेडमधील जगबुडी, नारिंगी आणि चोरद नदीचे पाणी ओसरू लागले आहे. चिपळूणमधील परशुराम तसेच कुंभार्ली घाटात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. शनिवारी शहरातील भाट्ये किनाऱ्यावर एक मृतदेह आढळून आला. शुक्रवार सकाळपासून शनिवार सकाळपर्यंत २४ तासांत जिल्ह्यात तब्बल ९७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सरासरी १०७ मि.मी. (सुमारे ४ इंच) पाऊस जिल्ह्यात पडला आहे. गुरुवारप्रमाणेच शुक्रवारीही सर्वांत जास्त पाऊस खेड तालुक्यात पडला आहे. शनिवारी मात्र सर्वच भागांमधील पावसाचा जोर कमी झाला आहे. शुक्रवारी रात्री ९.१५ च्या सुमारास परशुराम घाटात तिसऱ्यांदा दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक पुन्हा थांबवण्यात आली. दरड बाजूला करण्याचे काम तत्काळ हाती घेण्यात आले. पहाटेपर्यंत येथून एकेरी वाहतूक सुरू केली. जगबुडी नदी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. एकीकडे परशुराम घाटातील वाहतुकीला ब्रेक लागलेला असताना दुसरीकडे मध्यरात्री चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात दरड कोसळली. त्यामुळे हा मार्गही ठप्प झाला. परशुराम घाटात वाहतूक खोळंबून राहू नये, यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या कुंभार्ली घाटातून वळवण्यात आल्या होत्या. मात्र, तेथेही दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. शनिवारी दुपारी १२च्या सुमारास ही वाहतूक पूर्ववत झाली. अर्थात तेथेही एकेरी वाहतूकच सुरू आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान खेड तालुक्यात झाले आहे. खेड बाजारपेठेत पाणी घुसल्याने १२९ दुकानांचे २ कोटी ८६ लाखांचे नुकसान झाले आहे. चिपळूणमधील कुर्ली (धनगरवाडी) येथील अंतर्गत रस्ता खचला असून, खेरशेत येथे साकव कोसळला आहे. मंडणगड तालुक्यात आंबवली येथील दीपक रहाटे यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले असून, वेलोते येथील सीताराम भगते, कोंडगाव येथील रमेश रेवाळे यांच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यातील केळवली (निखारेवाडी) येथील विलास खाडे यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच धाऊलवल्ली येथे एका घराच्या पडवीची भिंत कोसळली आहे. जिल्ह्यात दापोली तालुक्यातील कोंडे (कदमवाडी) येथील राजाराम कदम यांचा बैल पुराच्या पाण्यात वाहून गेला. तर मांदवली येथील अनंत भानत यांच्या घरामध्ये नदीचे पाणी घुसले. गुहागर तालुक्यातील वेलदुरे येथील शंकर कोळथनकर यांच्या घराचे अंशत: तर अंजनवेल येथील एका घराचे पूर्णत: नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी येथील सीताराम महाडिक यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातही पेठकिल्ला, कोळंबे, शिरगाव येथेही अंशत: नुकसान झाले आहे. नाचणे -नारायणमळी गावात जिल्हा परिषदेचा रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. याबाबतची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) बाजारपेठेतच घुसले पाणी; १२९ दुकानांना फटका गुरुवारी रात्री खेड बाजारपेठेत पाणी घुसले, त्यामुळे तब्बल १२९ दुकानांना त्याचा फटका बसला. या दुकानांचे २ कोटी ८६ लाख १0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेत पाणी घुसल्याने एकाचवेळी एवढ्या दुकानांचे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची गेल्या अनेक वर्षातील ही पहिलीच घटना आहे.त्यामुळे खेडमधे पावसाचा आजवरचा सर्वांंत मोठा फटका आहे.