शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे पिकाचे नुकसान

By admin | Updated: September 30, 2014 00:14 IST

शेतकरी चिंतातूर : हळवे भातपीक धोक्यात येण्याची चिन्हे

कुवे : नवरात्रोत्सवात सतत पडणाऱ्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भातपिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. ओल्या दुष्काळाचीही शक्यता आहे.बहुतांश शेतकरी ९० दिवसांमध्ये तयार होणारे हळवे बियाणे वापरतात. हळवी भातशेती सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तयार होते. यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केल्याने भातपीक आॅक्टोबर महिन्यात कापणीला योग्य होईल, असा अंदाज शेतकरीवर्गाने वर्तवला आहे. मात्र, या नवरात्रोत्सवात सतत पडणाऱ्या पावसामुळे तयार भातपीक आडवे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.कुवे परिसरातील भातशेतीवर कीड, तर काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने भातशेती पूर्णपणे आडवी होत आहे. बहुतांश ठिकाणी कीड आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.पावसाप्रमाणे वन्य प्राण्यांकडूनही भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. रानटी प्राणी भाताच्या लोंबी तोंडत असल्याने जनावरांच्या उपद्रवामध्ये भातपिकाचे संरक्षण करणे शेतकरीवर्गाला अवघड झाले आहे.सतत पडणाऱ्या या पावसामुळे आता यावर्षी भात कापणीचा हंगाम लांबणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. भातपीक तयार झाले असून, आणखी १५ ते २० दिवसांनी कापणीला सुरुवात होणार आहे. मात्र, पावसाच्या या रोजच्या हजेरीमुळे हा हंगाम दिवाळीपर्यंत लांबणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. भात कापणीचा हंगाम सुरू होत असल्याने व मध्ये पडणाऱ्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यात वादळी पावसाने काही कालावधी थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे प्रमाण वाढले आहे. भातशेतीच्या हळव्या पिकावर पावसाचे सावट असून हे पिक हातचे जाईल याबाबत शेतकरी साशंक असून सततच्या पावसामुळे लांजा, देवरूख, राजापूर, दापोली, खेड या भागातील भातशेती धोक्यात ्आली ्आहे. याबाबत तज्ञानी भिती व्यक्त केली जात आहे. कोकणात यंदा पावसाची सरासरी ओलांडली असून उरलेल्या कालावधीत अजून पाऊस पडला तर शेतकऱ्यांच्या हातचे पिक जाणार आहे. पावसाच्या संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निवडणूक काळानंतर काय करता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)सतत पडणाऱ्या पावसामुळे ओल्या दुष्काळाची नांदी.पावसामुळे भातपीक आडवे होऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.उकाडा वाढला.नवरात्रोत्सवात पावसाची हजेरी कायम.भातशेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान.भातशेतीचा कापणीचा हंगाम लांबणार.कोकणात यंदा पावसाची सरासरी पूर्ण झाली. हा पाऊस दसऱ्याला पूर्ण थांबतो. यंदा नवरात्रात सायंकाळी पाऊस पडत असल्याने दांडियाप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच हळव्या शेतीचे नुकसान होत आहे. लांजा तालुक्यात भातशेतीला फटका बसत आहे.