शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

पावसामुळे पिकाचे नुकसान

By admin | Updated: September 30, 2014 00:14 IST

शेतकरी चिंतातूर : हळवे भातपीक धोक्यात येण्याची चिन्हे

कुवे : नवरात्रोत्सवात सतत पडणाऱ्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भातपिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. ओल्या दुष्काळाचीही शक्यता आहे.बहुतांश शेतकरी ९० दिवसांमध्ये तयार होणारे हळवे बियाणे वापरतात. हळवी भातशेती सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तयार होते. यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केल्याने भातपीक आॅक्टोबर महिन्यात कापणीला योग्य होईल, असा अंदाज शेतकरीवर्गाने वर्तवला आहे. मात्र, या नवरात्रोत्सवात सतत पडणाऱ्या पावसामुळे तयार भातपीक आडवे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.कुवे परिसरातील भातशेतीवर कीड, तर काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने भातशेती पूर्णपणे आडवी होत आहे. बहुतांश ठिकाणी कीड आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.पावसाप्रमाणे वन्य प्राण्यांकडूनही भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. रानटी प्राणी भाताच्या लोंबी तोंडत असल्याने जनावरांच्या उपद्रवामध्ये भातपिकाचे संरक्षण करणे शेतकरीवर्गाला अवघड झाले आहे.सतत पडणाऱ्या या पावसामुळे आता यावर्षी भात कापणीचा हंगाम लांबणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. भातपीक तयार झाले असून, आणखी १५ ते २० दिवसांनी कापणीला सुरुवात होणार आहे. मात्र, पावसाच्या या रोजच्या हजेरीमुळे हा हंगाम दिवाळीपर्यंत लांबणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. भात कापणीचा हंगाम सुरू होत असल्याने व मध्ये पडणाऱ्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यात वादळी पावसाने काही कालावधी थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे प्रमाण वाढले आहे. भातशेतीच्या हळव्या पिकावर पावसाचे सावट असून हे पिक हातचे जाईल याबाबत शेतकरी साशंक असून सततच्या पावसामुळे लांजा, देवरूख, राजापूर, दापोली, खेड या भागातील भातशेती धोक्यात ्आली ्आहे. याबाबत तज्ञानी भिती व्यक्त केली जात आहे. कोकणात यंदा पावसाची सरासरी ओलांडली असून उरलेल्या कालावधीत अजून पाऊस पडला तर शेतकऱ्यांच्या हातचे पिक जाणार आहे. पावसाच्या संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निवडणूक काळानंतर काय करता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)सतत पडणाऱ्या पावसामुळे ओल्या दुष्काळाची नांदी.पावसामुळे भातपीक आडवे होऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.उकाडा वाढला.नवरात्रोत्सवात पावसाची हजेरी कायम.भातशेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान.भातशेतीचा कापणीचा हंगाम लांबणार.कोकणात यंदा पावसाची सरासरी पूर्ण झाली. हा पाऊस दसऱ्याला पूर्ण थांबतो. यंदा नवरात्रात सायंकाळी पाऊस पडत असल्याने दांडियाप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच हळव्या शेतीचे नुकसान होत आहे. लांजा तालुक्यात भातशेतीला फटका बसत आहे.