शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सबलीकरण योजनेचे निकष अखेर बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:11 IST

शोभना कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजुरांसाठी राज्य शासनाने सुरू केलेली पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ठराविक जिल्हेवगळता कोकणासह इतर जिल्ह्यात ठप्प होती. यातील त्रुटी शासनाच्या निदर्शनास आल्याने आता या योजनेचे निकष बदलण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित ...

शोभना कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजुरांसाठी राज्य शासनाने सुरू केलेली पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ठराविक जिल्हेवगळता कोकणासह इतर जिल्ह्यात ठप्प होती. यातील त्रुटी शासनाच्या निदर्शनास आल्याने आता या योजनेचे निकष बदलण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती रत्नागिरी दौऱ्यावर आली असता ‘लोकमत’ने त्रुटी निदर्शनास आणून दिल्याहोत्या.अनुसूचित जाती नवबौद्धांमधील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढावेत, त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी, त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने १ एप्रिल २००४पासून ही योजना राज्यात सुरू केली. तिची अंमलबजावणी सन २००५पासून झाली. मात्र, जमीन उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून अनेक जिल्ह्यांनी हात झटकल्याने कोकणवगळता ठराविक जिल्ह्यांमध्ये या योजनेचे लाभार्थी होते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात २०१३ पर्यंत या योजनेचा एकही लाभार्थीनव्हता.त्यामुळे या योजनेत मध्यंतरी बदल करण्यात आला. त्यानुसार जमिनीचे दर ३ लाख प्रतिएकरी असे ठरवून देण्यात आले. ही जमीन जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून द्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. तरीही मुंबईसह कोकणातील जमिनीचे दर गगनाला भिडलेले असल्याने प्रतिएकर तीन लाख रूपये दराने जमीन मिळणे अशक्य होत होते. त्यामुळे ही योजना लाभार्थ्यांसाठी गाजरच होती. सामाजिक न्याय विभागातर्फे भारंभार योजना जाहीर केल्या जातात. मात्र, त्यांची अंमलबजावणी योग्य रितीने होते की नाही? याची शहानिशा होत नाही आणि झाली तर त्याच्यातील त्रुटी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना आखल्या जात नाहीत़ ही बाब तीन दिवसांसाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीच्या निदर्शनास आणून देताच या समितीचे सदस्य प्रकाश गजभिये यांनी आपण नागपूर येथील अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन दिले.दौºयानंतर या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला. त्यात या बाबी नमूद करण्यात आल्या. त्यानुसार पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत आता बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार बागायती जमीन खरेदीसाठी आठ लाख आणि कोरडवाहू जमिनीसाठी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेत ५० टक्के रक्कम शासन व ५० टक्के रक्कम लाभार्थीने भरायची होती. ती अटही आता शिथील करुन १०० टक्के अनुदान शासन देणार आहे.यासाठी जिल्हाधिकारी, सहाय्यक आयुक्त आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांची समिती तयार करण्यात येणार असून, जास्तीत जास्त लाभार्थींना जमीन देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग घेण्याविषयी जिल्हाधिकाºयांना याबाबतच्या सूचना देण्यात येणार आहेत.अर्थसहाय्य रकमेच्या रुपात : जमीन खरेदीसाठी सुधारित कार्यपद्धतीजिल्हाधिकारी यांनी प्रचलित रेडीरेकनरच्या किंमतीप्रमाणे जमीन विकत घेण्याचा प्रयत्न करावा. जमीन उपलब्ध होत नसेल तर जमिनीच्या मूल्याबाबत संबंधित जमीनमालकाशी वाटाघाटी कराव्यात, तरीही जमीन विकत मिळत नसल्यास रेडीरेकनरच्या दुप्पट किमतीपर्यंत वाढविण्यात यावी, तथापि ही रक्कम प्रतिएकरी ३ लाख इतक्या कमाल मर्यादेत असावी, अशी अट या योजनेत घालण्यात आली आहे.गतवर्षी १० ते १२ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती दौºयावर आली असता या कालावधीत लोकमतने केलेल्या मालिकेची दखल समितीने घेतली होती. त्यानुसार या समितीने शिफारस केल्याने गतवर्षी मिनी ट्रॅक्टर योजनेतही बदल करण्यात आला. त्यानुसार अर्थसहाय्य हे वस्तू स्वरुपात न देता ते रक्कम (३ लाख १५ हजार) स्वरूपात मिळण्यास प्रारंभ झाला आहे.