शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

न्यायालयाचा आरक्षण रद्दचा निर्णय दु:खदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

रत्नागिरी : मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये नैराश्याची भावना निर्माण ...

रत्नागिरी : मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली असून, या समाजातील नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय कमालीचा दु:खदायी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पुढच्या पिढीवर वाईट परिणाम

मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय अतिशय दु:खदायक असा आहे. हा निर्णय ‘न भूतो न भविष्यति,’ असाच म्हणायला हवा. या निर्णयाचा वाईट परिणाम मराठा समाजातील पुढच्या पिढीवर होणार आहे. आम्ही सध्या काेरोनामुळे थांबलो आहोत. ही परिस्थिती निवळली की मात्र, मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारणार आहोत. कोरोनापेक्षाही हानिकारक असा हा निर्णय आहे.

केशवराव इंदुलकर, कार्याध्यक्ष मराठा मंडळ, रत्नागिरी

दु:खदायी निकाल

न्यायालयाच्या या निर्णयाने अतीव दु:ख झाले आहे. त्यामुळे यावर काय भाष्य करावे, हेच सुचत नाही. त्यामुळे याबाबत प्रतिक्रिया देण्याइतपतही मन:स्थिती नाही, एवढे दु:ख झाले आहे. न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, धक्कादायक असाच आहे.