शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

CoronaVirus : लॉकडाऊनच्या ग्रहणात मासेमारी आटोपणार, जूनपासून मासेमारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 16:44 IST

गतवर्षी लांबलेला पाऊस, दोन मोठी वादळे, त्यानंतर अनेकदा आलेले वादळी वारे यामुळे मासेमारी खूपच तोट्यात सुरू होती. त्यातच या मासेमारीला लॉकडाऊनचे ग्रहण लागले आणि हंगामातील सर्वात महत्त्वाचा काळ नुकसानातच गेला. आता या ग्रहणातच मासेमारी हंगाम आटोपणार आहे. १ जूनपासून ६१ दिवसांसाठी मासेमारी बंद होणार आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या ग्रहणात मासेमारी आटोपणार, जूनपासून मासेमारी बंदउशिरापर्यंतचा पाऊस, वादळी वाऱ्यामुळे हैराण, मासेमारीला कोरोनाचाही मोठा फटका

रत्नागिरी : गतवर्षी लांबलेला पाऊस, दोन मोठी वादळे, त्यानंतर अनेकदा आलेले वादळी वारे यामुळे मासेमारी खूपच तोट्यात सुरू होती. त्यातच या मासेमारीला लॉकडाऊनचे ग्रहण लागले आणि हंगामातील सर्वात महत्त्वाचा काळ नुकसानातच गेला. आता या ग्रहणातच मासेमारी हंगाम आटोपणार आहे. १ जूनपासून ६१ दिवसांसाठी मासेमारी बंद होणार आहे.कोरोनामुळे मासेमारी हंगामाचे दोन महिने तरी वाया गेले आहेत. त्यातच अनेकदा वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मासेमारी बंद ठेवावी लागली होती़ त्यामुळे यंदा मासेमारी व्यवसाय तोट्यात असल्याने मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़.

त्यामुळे मासेमारी हंगामात बंदी कालावधीतही काही ठिकाणी यांत्रिकी नौकांच्यरा सहाय्याने जीवावर उदार होऊन अनेक मच्छिमार मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असल्याचे चित्र दिसून येते़ मिळणारे मासे मच्छि मार्केटमध्ये चढ्या भावाने विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईचा इशारा मच्छिमारांना दिला आहे़पावसाळ्यात मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यालगत येतात़ त्यामुळे या काळात मासेमारी पूर्ण बंद राहते. अर्थात नियमांचा भंग करून पावसाळ्याच्या दिवसांत समुद्र खवळलेला असतानाही बंदी कालावधीत काही नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करतच असल्याचे गेली काही वर्षे निदर्शनास येत आहे.

पर्ससीन नौकांवर बंदी असूनही गेल्या काही दिवसांत राजरोसपणे मासेमारी सुरु असल्याची तक्रार मच्छिमार सातत्याने करत आहेत. मात्र मत्स्य खात्याचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.नौकांचे पार्किंग फुल्लपावसाळ्याच्या दिवसांत मासेमारी हंगाम बंद असल्याने अनेक नौका किनारी लावण्यात येतात़ शासनाने ६१ दिवसांचा मासेमारी बंदी आदेश काढल्याने अनेक नौका मालकांची किनारी नौका लावण्यासाठी लगबग सुरु झाली आहे़. आता बंदरांवर नौका शाकारणीसाठी जागाच शिल्लक नसल्याने अनेक नौका किनाऱ्यावरच बंदरात नांगरावर उभ्या करुन ठेवल्याचे चित्र पाहावयास मिळते़

यंदाचा मासेमारी संपूर्ण हंगाम तोट्यात गेला़ कारण पावसाळा उशिरापर्यंत सुरु होता़ त्यानंतर अनेकदा वादळ व सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे मासेमारी बंद ठेवावी लागली होती़ त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने गेले दोन महिने मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली होती़ यंदाचा मासेमारी हंगाम यातच गेल्याने मच्छिमारांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे़ याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे़- शब्बीर वस्ता, मच्छिमार नेते, मिरकरवाडा, रत्नागिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार