शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

CoronaVirus : लॉकडाऊनच्या ग्रहणात मासेमारी आटोपणार, जूनपासून मासेमारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 16:44 IST

गतवर्षी लांबलेला पाऊस, दोन मोठी वादळे, त्यानंतर अनेकदा आलेले वादळी वारे यामुळे मासेमारी खूपच तोट्यात सुरू होती. त्यातच या मासेमारीला लॉकडाऊनचे ग्रहण लागले आणि हंगामातील सर्वात महत्त्वाचा काळ नुकसानातच गेला. आता या ग्रहणातच मासेमारी हंगाम आटोपणार आहे. १ जूनपासून ६१ दिवसांसाठी मासेमारी बंद होणार आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या ग्रहणात मासेमारी आटोपणार, जूनपासून मासेमारी बंदउशिरापर्यंतचा पाऊस, वादळी वाऱ्यामुळे हैराण, मासेमारीला कोरोनाचाही मोठा फटका

रत्नागिरी : गतवर्षी लांबलेला पाऊस, दोन मोठी वादळे, त्यानंतर अनेकदा आलेले वादळी वारे यामुळे मासेमारी खूपच तोट्यात सुरू होती. त्यातच या मासेमारीला लॉकडाऊनचे ग्रहण लागले आणि हंगामातील सर्वात महत्त्वाचा काळ नुकसानातच गेला. आता या ग्रहणातच मासेमारी हंगाम आटोपणार आहे. १ जूनपासून ६१ दिवसांसाठी मासेमारी बंद होणार आहे.कोरोनामुळे मासेमारी हंगामाचे दोन महिने तरी वाया गेले आहेत. त्यातच अनेकदा वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मासेमारी बंद ठेवावी लागली होती़ त्यामुळे यंदा मासेमारी व्यवसाय तोट्यात असल्याने मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़.

त्यामुळे मासेमारी हंगामात बंदी कालावधीतही काही ठिकाणी यांत्रिकी नौकांच्यरा सहाय्याने जीवावर उदार होऊन अनेक मच्छिमार मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असल्याचे चित्र दिसून येते़ मिळणारे मासे मच्छि मार्केटमध्ये चढ्या भावाने विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईचा इशारा मच्छिमारांना दिला आहे़पावसाळ्यात मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यालगत येतात़ त्यामुळे या काळात मासेमारी पूर्ण बंद राहते. अर्थात नियमांचा भंग करून पावसाळ्याच्या दिवसांत समुद्र खवळलेला असतानाही बंदी कालावधीत काही नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करतच असल्याचे गेली काही वर्षे निदर्शनास येत आहे.

पर्ससीन नौकांवर बंदी असूनही गेल्या काही दिवसांत राजरोसपणे मासेमारी सुरु असल्याची तक्रार मच्छिमार सातत्याने करत आहेत. मात्र मत्स्य खात्याचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.नौकांचे पार्किंग फुल्लपावसाळ्याच्या दिवसांत मासेमारी हंगाम बंद असल्याने अनेक नौका किनारी लावण्यात येतात़ शासनाने ६१ दिवसांचा मासेमारी बंदी आदेश काढल्याने अनेक नौका मालकांची किनारी नौका लावण्यासाठी लगबग सुरु झाली आहे़. आता बंदरांवर नौका शाकारणीसाठी जागाच शिल्लक नसल्याने अनेक नौका किनाऱ्यावरच बंदरात नांगरावर उभ्या करुन ठेवल्याचे चित्र पाहावयास मिळते़

यंदाचा मासेमारी संपूर्ण हंगाम तोट्यात गेला़ कारण पावसाळा उशिरापर्यंत सुरु होता़ त्यानंतर अनेकदा वादळ व सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे मासेमारी बंद ठेवावी लागली होती़ त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने गेले दोन महिने मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली होती़ यंदाचा मासेमारी हंगाम यातच गेल्याने मच्छिमारांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे़ याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे़- शब्बीर वस्ता, मच्छिमार नेते, मिरकरवाडा, रत्नागिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार