शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

CoronaVirus : लॉकडाऊनच्या ग्रहणात मासेमारी आटोपणार, जूनपासून मासेमारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 16:44 IST

गतवर्षी लांबलेला पाऊस, दोन मोठी वादळे, त्यानंतर अनेकदा आलेले वादळी वारे यामुळे मासेमारी खूपच तोट्यात सुरू होती. त्यातच या मासेमारीला लॉकडाऊनचे ग्रहण लागले आणि हंगामातील सर्वात महत्त्वाचा काळ नुकसानातच गेला. आता या ग्रहणातच मासेमारी हंगाम आटोपणार आहे. १ जूनपासून ६१ दिवसांसाठी मासेमारी बंद होणार आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या ग्रहणात मासेमारी आटोपणार, जूनपासून मासेमारी बंदउशिरापर्यंतचा पाऊस, वादळी वाऱ्यामुळे हैराण, मासेमारीला कोरोनाचाही मोठा फटका

रत्नागिरी : गतवर्षी लांबलेला पाऊस, दोन मोठी वादळे, त्यानंतर अनेकदा आलेले वादळी वारे यामुळे मासेमारी खूपच तोट्यात सुरू होती. त्यातच या मासेमारीला लॉकडाऊनचे ग्रहण लागले आणि हंगामातील सर्वात महत्त्वाचा काळ नुकसानातच गेला. आता या ग्रहणातच मासेमारी हंगाम आटोपणार आहे. १ जूनपासून ६१ दिवसांसाठी मासेमारी बंद होणार आहे.कोरोनामुळे मासेमारी हंगामाचे दोन महिने तरी वाया गेले आहेत. त्यातच अनेकदा वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मासेमारी बंद ठेवावी लागली होती़ त्यामुळे यंदा मासेमारी व्यवसाय तोट्यात असल्याने मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़.

त्यामुळे मासेमारी हंगामात बंदी कालावधीतही काही ठिकाणी यांत्रिकी नौकांच्यरा सहाय्याने जीवावर उदार होऊन अनेक मच्छिमार मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असल्याचे चित्र दिसून येते़ मिळणारे मासे मच्छि मार्केटमध्ये चढ्या भावाने विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईचा इशारा मच्छिमारांना दिला आहे़पावसाळ्यात मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यालगत येतात़ त्यामुळे या काळात मासेमारी पूर्ण बंद राहते. अर्थात नियमांचा भंग करून पावसाळ्याच्या दिवसांत समुद्र खवळलेला असतानाही बंदी कालावधीत काही नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करतच असल्याचे गेली काही वर्षे निदर्शनास येत आहे.

पर्ससीन नौकांवर बंदी असूनही गेल्या काही दिवसांत राजरोसपणे मासेमारी सुरु असल्याची तक्रार मच्छिमार सातत्याने करत आहेत. मात्र मत्स्य खात्याचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.नौकांचे पार्किंग फुल्लपावसाळ्याच्या दिवसांत मासेमारी हंगाम बंद असल्याने अनेक नौका किनारी लावण्यात येतात़ शासनाने ६१ दिवसांचा मासेमारी बंदी आदेश काढल्याने अनेक नौका मालकांची किनारी नौका लावण्यासाठी लगबग सुरु झाली आहे़. आता बंदरांवर नौका शाकारणीसाठी जागाच शिल्लक नसल्याने अनेक नौका किनाऱ्यावरच बंदरात नांगरावर उभ्या करुन ठेवल्याचे चित्र पाहावयास मिळते़

यंदाचा मासेमारी संपूर्ण हंगाम तोट्यात गेला़ कारण पावसाळा उशिरापर्यंत सुरु होता़ त्यानंतर अनेकदा वादळ व सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे मासेमारी बंद ठेवावी लागली होती़ त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने गेले दोन महिने मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली होती़ यंदाचा मासेमारी हंगाम यातच गेल्याने मच्छिमारांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे़ याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे़- शब्बीर वस्ता, मच्छिमार नेते, मिरकरवाडा, रत्नागिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार