शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

CoronaVirus Lockdown :नागरिकांचा मुक्त संचार सुरूच, संचारबंदीची भीतीच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 16:15 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली असली तरी सद्यपरिस्थितीत संचारबंदीची भीती लोकांमध्ये पाहायला मिळत नाही. नागरिकांचा मुक्त संचार सुरूच असून, दैनंदिन व्यवहारही नित्यनियमाने सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा मुक्त संचार सुरूच, संचारबंदीची भीतीच गायबअजून किती जणांवर कारवाई करावी

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली असली तरी सद्यपरिस्थितीत संचारबंदीची भीती लोकांमध्ये पाहायला मिळत नाही. नागरिकांचा मुक्त संचार सुरूच असून, दैनंदिन व्यवहारही नित्यनियमाने सुरू असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात कोरोनाचा एक रूग्ण आढळताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यादृष्टीने जिल्ह्याचा इतर जिल्ह्यांशी असलेला संपर्क तोडण्यासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर रत्नागिरीत येण्यास तसेच रत्नागिरीतून बाहेर जाण्यास कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. दिनांक २३ मार्चपासून ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत.कोरोनाविरोधातील या लढ्यात नागरिकांनी घरातच राहणे गरजेचे आहे. त्यासाठीच शासनाकडून संचारबंदी सर्वत्र लागू करण्यात आली आहे. मात्र, तरीही नागरिक काही ना काही कारण सांगून बाहेर पडत आहेत. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दुचाकी वाहनांवर बंदी घातली आहे. तरीही अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीसाठी असणारी वाहने, या सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी वगळून अन्य नागरिक फिरायला निघाल्यासारखे बाहेर पडत आहेत.रत्नागिरीनजिकच्या कुवारबाव, परिसरात अजूनही मुंबईतून नागरिक खुलेआम येत आहेत. शहरातील धनजी नाका येथील दुकानांमध्ये आजही नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मुख्य मार्ग सोडला तर अन्य भागात नागरिकांचा मुक्त संचार सुरू असून, विनाहेल्मेट गाडी चालवणे, नियम मोडून दुचाकीवरून मोबाईलवर संभाषण करणे, तीन सीट घेऊन जाणे असे गैरप्रकार सुरू आहेत. नागरिकांची नेहमीसारखी वर्दळ सुरू असल्याने संचारबंदी खरोखरच लागू आहे का, असा संभ्रम निर्माण होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी