शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

CoronaVirus Lockdown :नागरिकांचा मुक्त संचार सुरूच, संचारबंदीची भीतीच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 16:15 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली असली तरी सद्यपरिस्थितीत संचारबंदीची भीती लोकांमध्ये पाहायला मिळत नाही. नागरिकांचा मुक्त संचार सुरूच असून, दैनंदिन व्यवहारही नित्यनियमाने सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा मुक्त संचार सुरूच, संचारबंदीची भीतीच गायबअजून किती जणांवर कारवाई करावी

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली असली तरी सद्यपरिस्थितीत संचारबंदीची भीती लोकांमध्ये पाहायला मिळत नाही. नागरिकांचा मुक्त संचार सुरूच असून, दैनंदिन व्यवहारही नित्यनियमाने सुरू असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात कोरोनाचा एक रूग्ण आढळताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यादृष्टीने जिल्ह्याचा इतर जिल्ह्यांशी असलेला संपर्क तोडण्यासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर रत्नागिरीत येण्यास तसेच रत्नागिरीतून बाहेर जाण्यास कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. दिनांक २३ मार्चपासून ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत.कोरोनाविरोधातील या लढ्यात नागरिकांनी घरातच राहणे गरजेचे आहे. त्यासाठीच शासनाकडून संचारबंदी सर्वत्र लागू करण्यात आली आहे. मात्र, तरीही नागरिक काही ना काही कारण सांगून बाहेर पडत आहेत. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दुचाकी वाहनांवर बंदी घातली आहे. तरीही अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीसाठी असणारी वाहने, या सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी वगळून अन्य नागरिक फिरायला निघाल्यासारखे बाहेर पडत आहेत.रत्नागिरीनजिकच्या कुवारबाव, परिसरात अजूनही मुंबईतून नागरिक खुलेआम येत आहेत. शहरातील धनजी नाका येथील दुकानांमध्ये आजही नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मुख्य मार्ग सोडला तर अन्य भागात नागरिकांचा मुक्त संचार सुरू असून, विनाहेल्मेट गाडी चालवणे, नियम मोडून दुचाकीवरून मोबाईलवर संभाषण करणे, तीन सीट घेऊन जाणे असे गैरप्रकार सुरू आहेत. नागरिकांची नेहमीसारखी वर्दळ सुरू असल्याने संचारबंदी खरोखरच लागू आहे का, असा संभ्रम निर्माण होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी