शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. रत्नागिरी तालुक्यात दररोज १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. रत्नागिरी तालुक्यात दररोज १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते. मात्र, आता रत्नागिरी तालुक्यातील रुग्णांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ लागला आहे.

अजूनही मासेमारी ठप्पच

रत्नागिरी : कोरोनासह चक्रीवादळामुळे मासेमारी बंद ठेवावी लागल्यामुळे मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. आधीच मच्छीमार तोट्यात असल्याने वादळी वातावरणाचा अजूनही परिणाम आहे. खोल समुद्रातील वादळ अजूनही निवळलेले नाही. त्यामुळे मासेमारी बंदच ठेवण्यात आली आहे.

मजुरांची उपासमारी

खेड : कोरोनामुळे हातावर पोट असलेल्या मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काेरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये दानशूरांनी मोठ्या प्रमाणात गरीब, मजुरांना अन्नधान्याची मदत केली होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचे प्रमाण वाढले असले, तरी मदत करणाऱ्यांनी हात आखडते घेतले आहेत.

काजू व्यावसायिकांचे नुकसान

लांजा : जिल्ह्यात काजू बियांच्या व्यवसायातून माेठ्या प्रमाणात लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, हा व्यवसाय सीझननुसार असल्याने एप्रिल, मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात चालतो. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत या व्यवसायाला ग्रहण लागले आहे. त्यामुळे काजू बी व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

लसींचा कमी प्रमाणात पुरवठा

राजापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असला, तरी लसी मिळण्याचे प्रमाण फार कमी आहे. शासनाकडून जसा लसींचा पुरवठा करण्यात येतो, त्याप्रमाणे लसीकरण सुरू करण्यात येते. लसीकरणाचे महत्त्व लोकांना समजू लागल्याने, लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी वाढू लागली आहे.

पावसामुळे चिखलाचे साम्राज्य

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेकडून गेले वर्षभर खोदाईचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी पाइपलाइन टाकण्यासाठी तसेच खासगी कंपनीकडूनही केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. त्यातच पाऊस पडल्याने खोदाईच्या मातीमुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

मासळी बाजारात शुकशुकाट

रत्नागिरी : चक्रीवादळामुळे मच्छीमारांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण पसरलेले आहे. वादळामुळे फयानच्या आठवणीने आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यावेळी अनेक मच्छीमारांना जीव गमवावा लागला होता. त्या भीतीने चक्रीवादळामुळे मच्छीमारांनी नौका नांगरावर ठेवणे पसंत केले. त्यामुळे मासळी बाजारात शुकशुकाट पसरलेला आहे.