शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. रत्नागिरी तालुक्यात दररोज १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. रत्नागिरी तालुक्यात दररोज १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते. मात्र, आता रत्नागिरी तालुक्यातील रुग्णांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ लागला आहे.

अजूनही मासेमारी ठप्पच

रत्नागिरी : कोरोनासह चक्रीवादळामुळे मासेमारी बंद ठेवावी लागल्यामुळे मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. आधीच मच्छीमार तोट्यात असल्याने वादळी वातावरणाचा अजूनही परिणाम आहे. खोल समुद्रातील वादळ अजूनही निवळलेले नाही. त्यामुळे मासेमारी बंदच ठेवण्यात आली आहे.

मजुरांची उपासमारी

खेड : कोरोनामुळे हातावर पोट असलेल्या मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काेरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये दानशूरांनी मोठ्या प्रमाणात गरीब, मजुरांना अन्नधान्याची मदत केली होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचे प्रमाण वाढले असले, तरी मदत करणाऱ्यांनी हात आखडते घेतले आहेत.

काजू व्यावसायिकांचे नुकसान

लांजा : जिल्ह्यात काजू बियांच्या व्यवसायातून माेठ्या प्रमाणात लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, हा व्यवसाय सीझननुसार असल्याने एप्रिल, मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात चालतो. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत या व्यवसायाला ग्रहण लागले आहे. त्यामुळे काजू बी व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

लसींचा कमी प्रमाणात पुरवठा

राजापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असला, तरी लसी मिळण्याचे प्रमाण फार कमी आहे. शासनाकडून जसा लसींचा पुरवठा करण्यात येतो, त्याप्रमाणे लसीकरण सुरू करण्यात येते. लसीकरणाचे महत्त्व लोकांना समजू लागल्याने, लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी वाढू लागली आहे.

पावसामुळे चिखलाचे साम्राज्य

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेकडून गेले वर्षभर खोदाईचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी पाइपलाइन टाकण्यासाठी तसेच खासगी कंपनीकडूनही केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. त्यातच पाऊस पडल्याने खोदाईच्या मातीमुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

मासळी बाजारात शुकशुकाट

रत्नागिरी : चक्रीवादळामुळे मच्छीमारांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण पसरलेले आहे. वादळामुळे फयानच्या आठवणीने आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यावेळी अनेक मच्छीमारांना जीव गमवावा लागला होता. त्या भीतीने चक्रीवादळामुळे मच्छीमारांनी नौका नांगरावर ठेवणे पसंत केले. त्यामुळे मासळी बाजारात शुकशुकाट पसरलेला आहे.