शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. रत्नागिरी तालुक्यात दररोज १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. रत्नागिरी तालुक्यात दररोज १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते. मात्र, आता रत्नागिरी तालुक्यातील रुग्णांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ लागला आहे.

अजूनही मासेमारी ठप्पच

रत्नागिरी : कोरोनासह चक्रीवादळामुळे मासेमारी बंद ठेवावी लागल्यामुळे मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. आधीच मच्छीमार तोट्यात असल्याने वादळी वातावरणाचा अजूनही परिणाम आहे. खोल समुद्रातील वादळ अजूनही निवळलेले नाही. त्यामुळे मासेमारी बंदच ठेवण्यात आली आहे.

मजुरांची उपासमारी

खेड : कोरोनामुळे हातावर पोट असलेल्या मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काेरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये दानशूरांनी मोठ्या प्रमाणात गरीब, मजुरांना अन्नधान्याची मदत केली होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचे प्रमाण वाढले असले, तरी मदत करणाऱ्यांनी हात आखडते घेतले आहेत.

काजू व्यावसायिकांचे नुकसान

लांजा : जिल्ह्यात काजू बियांच्या व्यवसायातून माेठ्या प्रमाणात लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, हा व्यवसाय सीझननुसार असल्याने एप्रिल, मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात चालतो. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत या व्यवसायाला ग्रहण लागले आहे. त्यामुळे काजू बी व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

लसींचा कमी प्रमाणात पुरवठा

राजापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असला, तरी लसी मिळण्याचे प्रमाण फार कमी आहे. शासनाकडून जसा लसींचा पुरवठा करण्यात येतो, त्याप्रमाणे लसीकरण सुरू करण्यात येते. लसीकरणाचे महत्त्व लोकांना समजू लागल्याने, लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी वाढू लागली आहे.

पावसामुळे चिखलाचे साम्राज्य

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेकडून गेले वर्षभर खोदाईचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी पाइपलाइन टाकण्यासाठी तसेच खासगी कंपनीकडूनही केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. त्यातच पाऊस पडल्याने खोदाईच्या मातीमुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

मासळी बाजारात शुकशुकाट

रत्नागिरी : चक्रीवादळामुळे मच्छीमारांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण पसरलेले आहे. वादळामुळे फयानच्या आठवणीने आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यावेळी अनेक मच्छीमारांना जीव गमवावा लागला होता. त्या भीतीने चक्रीवादळामुळे मच्छीमारांनी नौका नांगरावर ठेवणे पसंत केले. त्यामुळे मासळी बाजारात शुकशुकाट पसरलेला आहे.