शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

कोरोनाच्या डेल्टा प्लसने वाढविली रत्नागिरीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच आता जिल्ह्यात डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचे नऊ रुग्ण जिल्ह्यात सापडल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे.

जिल्ह्यात काेरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागल्याने आधीच अपुरे मनुष्यबळ असलेल्या आरोग्य यंत्रणेच्या कसोटीचा कस लागत आहे. गेल्या सव्वा वर्षापासून आरोग्य यंत्रणेचा कोरोनाशी लढा सुरू असतानाच आता पुन्हा डेल्टा व्हेरिएंटचे तब्बल नऊ रुग्ण संगमेश्वर तालुक्यात नोंदविण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दिवसेंदिवस कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन पराकोटीचे प्रयत्न करीत असताना आता संगमेश्वर तालुक्यात सापडलेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांमुळे प्रशासनाच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे.

त्यातच हे रुग्ण डेल्टा प्लसचे नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी रात्री आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी रत्नागिरीत डेल्टा प्लसचे नऊ रुग्ण असल्याचा गाैप्य स्फोट केल्याने जिल्हा प्रशासन पेचात आले आहे. नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याने संगमेश्वर तालुक्यातील माभळे, धामणी, नावडी, कसबा, कोंडगाव ही पाच गावे १४ दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात आली असून, सुमारे साडेसहा हजारपेक्षा अधिक नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात काय खबरदारी घेतली जातेय?

संगमेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये परदेशातून सुमारे ३० ते ३५ व्यक्ती दाखल झाल्या होत्या. ब्रिटनसारख्या देशात डेल्टा प्लसच्या व्हेरिएंटचे म्युटेशन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे सर्वच देशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे याच कालावधीत संगमेश्वर तालुक्यात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे प्रशासन दक्ष झाले होते. त्यामुळे या तालुक्यातील पाच गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली. या गावांमधील साडे सहा हजार नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी १४२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला असून, अन्य दक्षता घेतली जात आहे.

जिल्ह्यात दररोज दहा हजार टेस्टिंग सुरू

मार्चपासून रत्त्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची संख्या भरमसाठ वाढू लागली आहे. फेब्रुवारीअखेर ११ हजारापर्यंत रुग्ण आणि कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ३५० होती.

मात्र, मार्च महिन्यात शिमगोत्सवानंतर रुग्णसंख्येचा विस्फोट होत गेला. आतापर्यंत ही संख्या ५९ हजारांवर पोहोचली आहे. १,६७१ जणांचे मृत्यू झाले आहेत.

कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात वाढला आहे. त्यामुळे गावांमधील कुटुंबेच बाधित होऊ लागली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाला कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दिवसाला दहा हजार चाचण्यांचे नियोजन प्रशासनाने केले आहे.