शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

कोरोना भीतीने, मोबाईल वेडाने उडवली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पुरेशी झोप हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. मात्र, सध्या कोरोनाचे अनिष्ट सावट सर्वत्र पसरलेले ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पुरेशी झोप हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. मात्र, सध्या कोरोनाचे अनिष्ट सावट सर्वत्र पसरलेले आहे. सातत्याने होणाऱ्या लाॅकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग - व्यवसाय मंदीत आले आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्याने बेरोजगारी आली आहे. एकंदरीत आर्थिक संकटाबरोबरच कोरोनामुळे वाढलेल्या मृत्यूच्या प्रमाणामुळे प्रत्येकाच्या मनात कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. त्यातच अनेक वर्षांपासून असलेले मोबाईलचे वेड यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. या निद्रानाशाने अनेकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही बिघडू लागले आहे. अनेक व्याधींचा सामना करावा लागत आहे.

काहीजणांना रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे, मोबाईल खेळणे, लॅपटाॅपवर काम करत बसण्याची सवय असते. मात्र, यातून अनेक मानसिक आणि शारीरिक आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. सध्या कोरोनामुळे जीवाची भीती, आर्थिक विवंचना यामुळे झोपेचे गणितच बिघडले आहे. साहजिकच वेळेवर झोप न घेण्यामुळे निद्रानाश हा बहुसंख्य व्यक्तींना सतावू लागला आहे. काही यावर झोपेच्या गोळ्यांचा पर्याय शोधू लागल्याने यातून आणखी त्रासांना आमंत्रण दिले जात आहे.

झाेप कमी झाल्याचे दुष्परिणाम

नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

शरिरातील विषारी घटकांचे उत्सर्जन जागरणामुळे होत नाही. ते शरिरात राहिल्याने हानीकारक.

डोकेदुखी, अपचन, पित्त आदी शारीरिक त्रास वाढतात.

चीडचीड होणे, दिवसा झोप येणे, एकाग्रता कमी होणे आदी मानसिक आजार वाढतात.

उशिरापर्यंत मोबाईलवर राहिल्याने डोळ्यांचे विकार वाढतात.

मोबाईलवर जास्त काळ राहिल्याने नैराश्य वाढल्याचे दिसून आले आहे.

झाेप का उडते?

सध्या कोरोनाची भीती सर्वांच्या मनात असल्याने भीती आणि काळजी ही दोन महत्त्वाची कारणे झोप उडवणारी आहेत. त्यातच भीती घालविण्यासाठी मोबाईलवर राहण्यामुळेही झोप उडते.

व्यसनाधिनतेमुळेही मेंदू रात्री श्रांत न होता उत्तेजित राहात असल्यानेही झोप उडते. त्यामुळे आरोग्यासाठी पुरेशा झोपेची गरज असली तरीही अशा व्यक्तींना ती मिळत नाही.

दुर्धर शारीरिक आजार, मानसिक आजारांमुळेही झोप लागत नाही. त्यामुळे शारीरिक उपचारांबरोबरच मानसिक उपचारही महत्त्वाचे.

डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झाेपेची गाेळी नकाे?

काही व्यक्ती रात्री झोप आली नाही तर औषधाच्या दुकानातून स्वत: झोपेच्या गोळ्या आणतात. मात्र, त्या डाॅक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या जात नसल्याने किती डोस घ्यायचा, कधी घ्यायचा याचे प्रमाण त्यांना कळत नाही. त्यामुळे एका गोळीने झोप आली नाही तर दुसरी घेतात. यातून त्याचे व्यसन लागते.

झोप येत नसेल तर त्याची कारणे वेगवेगळी असतात. डाॅक्टरांकडून ती शोधली जातात आणि मगच योग्य उपचार केले जातात. मात्र, मनाप्रमाणे झोपेच्या गोळ्या दीर्घकाळ घेतल्यास त्याचे मेंदू तसेच किडनीवर दुष्परिणाम होतात. काहीवेळा गोळ्या जीवावरही बेततात.

झोप आरोग्यासाठी टाॅनिक आहे. मात्र, ती मिळाली नाही तर त्यातून अनेक शारीरिक, मानसिक त्रास होतात. झोप न येण्याची कारणे वेगवेगळी असतात. ती शोधून मगच त्यावर उपचार केले जातात. मात्र, त्यासाठी डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेत राहिल्यास हानीकारक ठरते. झोप येण्यासाठी मनातील काळजी काढून टाकायला हवी. दैनंदिन काम करत राहिल्यास शरीर आणि मेंदूही थकतो, त्यामुळे झोप येते. झोपण्याच्या आधी किमान दोन तास मोबाईल, टीव्ही दूर ठेवा, आहार हलका घ्या. प्रखर प्रकाश टाळा. महत्त्वाचे म्हणजे झोपणार आहे, अशी मेंदूला अर्धा तास आधी सूचना द्या.

- डाॅ. अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी.

डमी

स्टार ८५४