शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना भीतीने, मोबाईल वेडाने उडवली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पुरेशी झोप हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. मात्र, सध्या कोरोनाचे अनिष्ट सावट सर्वत्र पसरलेले ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पुरेशी झोप हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. मात्र, सध्या कोरोनाचे अनिष्ट सावट सर्वत्र पसरलेले आहे. सातत्याने होणाऱ्या लाॅकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग - व्यवसाय मंदीत आले आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्याने बेरोजगारी आली आहे. एकंदरीत आर्थिक संकटाबरोबरच कोरोनामुळे वाढलेल्या मृत्यूच्या प्रमाणामुळे प्रत्येकाच्या मनात कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. त्यातच अनेक वर्षांपासून असलेले मोबाईलचे वेड यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. या निद्रानाशाने अनेकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही बिघडू लागले आहे. अनेक व्याधींचा सामना करावा लागत आहे.

काहीजणांना रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे, मोबाईल खेळणे, लॅपटाॅपवर काम करत बसण्याची सवय असते. मात्र, यातून अनेक मानसिक आणि शारीरिक आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. सध्या कोरोनामुळे जीवाची भीती, आर्थिक विवंचना यामुळे झोपेचे गणितच बिघडले आहे. साहजिकच वेळेवर झोप न घेण्यामुळे निद्रानाश हा बहुसंख्य व्यक्तींना सतावू लागला आहे. काही यावर झोपेच्या गोळ्यांचा पर्याय शोधू लागल्याने यातून आणखी त्रासांना आमंत्रण दिले जात आहे.

झाेप कमी झाल्याचे दुष्परिणाम

नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

शरिरातील विषारी घटकांचे उत्सर्जन जागरणामुळे होत नाही. ते शरिरात राहिल्याने हानीकारक.

डोकेदुखी, अपचन, पित्त आदी शारीरिक त्रास वाढतात.

चीडचीड होणे, दिवसा झोप येणे, एकाग्रता कमी होणे आदी मानसिक आजार वाढतात.

उशिरापर्यंत मोबाईलवर राहिल्याने डोळ्यांचे विकार वाढतात.

मोबाईलवर जास्त काळ राहिल्याने नैराश्य वाढल्याचे दिसून आले आहे.

झाेप का उडते?

सध्या कोरोनाची भीती सर्वांच्या मनात असल्याने भीती आणि काळजी ही दोन महत्त्वाची कारणे झोप उडवणारी आहेत. त्यातच भीती घालविण्यासाठी मोबाईलवर राहण्यामुळेही झोप उडते.

व्यसनाधिनतेमुळेही मेंदू रात्री श्रांत न होता उत्तेजित राहात असल्यानेही झोप उडते. त्यामुळे आरोग्यासाठी पुरेशा झोपेची गरज असली तरीही अशा व्यक्तींना ती मिळत नाही.

दुर्धर शारीरिक आजार, मानसिक आजारांमुळेही झोप लागत नाही. त्यामुळे शारीरिक उपचारांबरोबरच मानसिक उपचारही महत्त्वाचे.

डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झाेपेची गाेळी नकाे?

काही व्यक्ती रात्री झोप आली नाही तर औषधाच्या दुकानातून स्वत: झोपेच्या गोळ्या आणतात. मात्र, त्या डाॅक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या जात नसल्याने किती डोस घ्यायचा, कधी घ्यायचा याचे प्रमाण त्यांना कळत नाही. त्यामुळे एका गोळीने झोप आली नाही तर दुसरी घेतात. यातून त्याचे व्यसन लागते.

झोप येत नसेल तर त्याची कारणे वेगवेगळी असतात. डाॅक्टरांकडून ती शोधली जातात आणि मगच योग्य उपचार केले जातात. मात्र, मनाप्रमाणे झोपेच्या गोळ्या दीर्घकाळ घेतल्यास त्याचे मेंदू तसेच किडनीवर दुष्परिणाम होतात. काहीवेळा गोळ्या जीवावरही बेततात.

झोप आरोग्यासाठी टाॅनिक आहे. मात्र, ती मिळाली नाही तर त्यातून अनेक शारीरिक, मानसिक त्रास होतात. झोप न येण्याची कारणे वेगवेगळी असतात. ती शोधून मगच त्यावर उपचार केले जातात. मात्र, त्यासाठी डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेत राहिल्यास हानीकारक ठरते. झोप येण्यासाठी मनातील काळजी काढून टाकायला हवी. दैनंदिन काम करत राहिल्यास शरीर आणि मेंदूही थकतो, त्यामुळे झोप येते. झोपण्याच्या आधी किमान दोन तास मोबाईल, टीव्ही दूर ठेवा, आहार हलका घ्या. प्रखर प्रकाश टाळा. महत्त्वाचे म्हणजे झोपणार आहे, अशी मेंदूला अर्धा तास आधी सूचना द्या.

- डाॅ. अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी.

डमी

स्टार ८५४