शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना भीतीने, मोबाईल वेडाने उडवली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पुरेशी झोप हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. मात्र, सध्या कोरोनाचे अनिष्ट सावट सर्वत्र पसरलेले ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पुरेशी झोप हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. मात्र, सध्या कोरोनाचे अनिष्ट सावट सर्वत्र पसरलेले आहे. सातत्याने होणाऱ्या लाॅकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग - व्यवसाय मंदीत आले आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्याने बेरोजगारी आली आहे. एकंदरीत आर्थिक संकटाबरोबरच कोरोनामुळे वाढलेल्या मृत्यूच्या प्रमाणामुळे प्रत्येकाच्या मनात कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. त्यातच अनेक वर्षांपासून असलेले मोबाईलचे वेड यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. या निद्रानाशाने अनेकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही बिघडू लागले आहे. अनेक व्याधींचा सामना करावा लागत आहे.

काहीजणांना रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे, मोबाईल खेळणे, लॅपटाॅपवर काम करत बसण्याची सवय असते. मात्र, यातून अनेक मानसिक आणि शारीरिक आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. सध्या कोरोनामुळे जीवाची भीती, आर्थिक विवंचना यामुळे झोपेचे गणितच बिघडले आहे. साहजिकच वेळेवर झोप न घेण्यामुळे निद्रानाश हा बहुसंख्य व्यक्तींना सतावू लागला आहे. काही यावर झोपेच्या गोळ्यांचा पर्याय शोधू लागल्याने यातून आणखी त्रासांना आमंत्रण दिले जात आहे.

झाेप कमी झाल्याचे दुष्परिणाम

नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

शरिरातील विषारी घटकांचे उत्सर्जन जागरणामुळे होत नाही. ते शरिरात राहिल्याने हानीकारक.

डोकेदुखी, अपचन, पित्त आदी शारीरिक त्रास वाढतात.

चीडचीड होणे, दिवसा झोप येणे, एकाग्रता कमी होणे आदी मानसिक आजार वाढतात.

उशिरापर्यंत मोबाईलवर राहिल्याने डोळ्यांचे विकार वाढतात.

मोबाईलवर जास्त काळ राहिल्याने नैराश्य वाढल्याचे दिसून आले आहे.

झाेप का उडते?

सध्या कोरोनाची भीती सर्वांच्या मनात असल्याने भीती आणि काळजी ही दोन महत्त्वाची कारणे झोप उडवणारी आहेत. त्यातच भीती घालविण्यासाठी मोबाईलवर राहण्यामुळेही झोप उडते.

व्यसनाधिनतेमुळेही मेंदू रात्री श्रांत न होता उत्तेजित राहात असल्यानेही झोप उडते. त्यामुळे आरोग्यासाठी पुरेशा झोपेची गरज असली तरीही अशा व्यक्तींना ती मिळत नाही.

दुर्धर शारीरिक आजार, मानसिक आजारांमुळेही झोप लागत नाही. त्यामुळे शारीरिक उपचारांबरोबरच मानसिक उपचारही महत्त्वाचे.

डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झाेपेची गाेळी नकाे?

काही व्यक्ती रात्री झोप आली नाही तर औषधाच्या दुकानातून स्वत: झोपेच्या गोळ्या आणतात. मात्र, त्या डाॅक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या जात नसल्याने किती डोस घ्यायचा, कधी घ्यायचा याचे प्रमाण त्यांना कळत नाही. त्यामुळे एका गोळीने झोप आली नाही तर दुसरी घेतात. यातून त्याचे व्यसन लागते.

झोप येत नसेल तर त्याची कारणे वेगवेगळी असतात. डाॅक्टरांकडून ती शोधली जातात आणि मगच योग्य उपचार केले जातात. मात्र, मनाप्रमाणे झोपेच्या गोळ्या दीर्घकाळ घेतल्यास त्याचे मेंदू तसेच किडनीवर दुष्परिणाम होतात. काहीवेळा गोळ्या जीवावरही बेततात.

झोप आरोग्यासाठी टाॅनिक आहे. मात्र, ती मिळाली नाही तर त्यातून अनेक शारीरिक, मानसिक त्रास होतात. झोप न येण्याची कारणे वेगवेगळी असतात. ती शोधून मगच त्यावर उपचार केले जातात. मात्र, त्यासाठी डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेत राहिल्यास हानीकारक ठरते. झोप येण्यासाठी मनातील काळजी काढून टाकायला हवी. दैनंदिन काम करत राहिल्यास शरीर आणि मेंदूही थकतो, त्यामुळे झोप येते. झोपण्याच्या आधी किमान दोन तास मोबाईल, टीव्ही दूर ठेवा, आहार हलका घ्या. प्रखर प्रकाश टाळा. महत्त्वाचे म्हणजे झोपणार आहे, अशी मेंदूला अर्धा तास आधी सूचना द्या.

- डाॅ. अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी.

डमी

स्टार ८५४