शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

कोरोना याेद्धे पुन्हा तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST

रत्नागिरी : गेल्या सुमारे पावणेदोन वर्षांपासून सर्वत्र कोरोनाचे संकट सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन ...

रत्नागिरी : गेल्या सुमारे पावणेदोन वर्षांपासून सर्वत्र कोरोनाचे संकट सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, यासाठी आरोग्य, पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाची सर्वच यंत्रणा प्रयत्न करीत असून अहोरात्र त्यांचे कार्य सुरू आहे. या गणेशात्सवातही सर्व नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आता पुन्हा हे कोरोना योद्धे सज्ज झाले आहेत.

सध्या जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. दर दिवशी लाखोंनी चाकरमानी मुंबईतून कोकणात दाखल होत आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी होवू लागल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई सध्या कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनले आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवात म्हणजेच गेल्या वर्षी आॅगस्ट - सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढले होते. त्यामुळे या गणेशोत्सवात कोरोनाचे विघ्न येवू नये म्हणून पुन्हा कोरोना योद्धे सज्ज झाल आहेत.

जिल्ह्यात सर्व नागरिक गणेशोत्सव साजरा करताना हे कोरोना योद्धे मात्र, आपला सण बाजुला ठेवून आपल्या कर्तव्यावर तैनात आहेत. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची विविध तपासणी नाक्यांवर माहिती घेतली जात आहे. यासाठी पोलीस, आरोग्य तसेच शिक्षक आदी कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. तसेच गावात आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या ग्राम कृतीदलाचे सदस्य गावात येणाऱ्यांचे दरदिवशी सर्वेक्षण करीत आहेत. त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत का, आरटीपीसीआर चाचणी झाली आहे का, कुठला त्रास आहे का, आदी माहिती संकलित केली जात आहे. ज्यांचे लसीकरणही झालेले नाही किंवा आरटीपीसीआर चाचणी झालेली नाही, अशांची गावी आल्यानंतर या कृती दलाच्या माध्यमातूच चाचणी केली जात आहे. पाॅझिटिव्ह आल्यास त्यांना विलगीकरणात दाखल करण्याची जबाबदारीही या कृती दलांकडे सोपविण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी पोलीसमित्र म्हणून जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीत पोलीस आणि शिक्षक मित्र पुन्हा प्रत्येक शहरांमध्ये वाहन प्रवेश हद्दींवर वाहनांची तपासणी करीत आहेत. एस.टी. आगार, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. तिथेही विविध विभागांचे कर्मचारी कार्यरत आहेत.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या आरोग्य, पोलीस, महसूल, शिक्षण आदी विभाग सध्या आपले सण विसरून नागरिकांसाठी दिवसरात्र परिश्रम करीत आहेत. नागरिकांचा गणेशोत्सव आनंदात साजरा व्हावा, सर्व कोरोनापासून सुरक्षित रहावेत, यासाठी तत्परतेने आपले कार्य करीत आहेत.