शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे धबधब्यांवरील बंदी कायम; पावसाळी पर्यटन थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित होतात. त्यामुळे तरूणाई याकडे विशेष आकर्षित होते. श्रावण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित होतात. त्यामुळे तरूणाई याकडे विशेष आकर्षित होते. श्रावण महिन्यातील निसर्गसाैंदर्यात तर हे धबधबे अधिकच भर घालतात. पावसाची रिमझिम आणि उन्हाचा खेळ यामुळे धबधब्यांचा आनंद घ्यायला पर्यटकांची पावले आपोआप अशा धबधब्यांकडे वळतात. मात्र, काही वर्षांपासून काही धोकादायक धरणांजवळ दुर्घटना घडल्याने जिल्हा प्रशासनाने अशाठिकाणी जाण्यास बंदी घातली होती. त्यातच गेल्यावर्षापासून कोरोनाचे संकट जिल्ह्यात आल्याने नागरिकांना धबधब्यांवर जाण्यास घातलेली बंदी कायम आहे. त्यामुळे इथले पावसाळी पर्यटन थांबले आहे.

रत्नागिरी तालुक्यातील उक्षी, निवळी, रानपाट येथील धबधब्यांवर निसर्गप्रेमींची गर्दी मोठ्या प्रमाणावर दरवर्षी होत असते. शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यातील हे धबधबे पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या श्रमपरिहाराबरोबरच मौजमजेची ठिकाणे बनली आहेत. सुट्टीच्या दिवशी वर्षास्नानाचा आनंद घेण्यासाठी तरुण-तरुणींची याठिकाणी गर्दी होते. पानवल येथील धरणाच्या ठिकाणीही धबधब्याचा विलोभनीय आनंद मिळतो, तसेच हे सुरक्षित आणि शांत असे ठिकाण असल्याने अनेकांची याठिकाणी जाण्यासाठी पसंती असते. मात्र, बेभान झालेल्या तरुणाईकडून अतिउत्साहाच्या भरात अनुचित प्रकार घडतात. असे अनुचित प्रकार यापूर्वी घडल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी धबधब्यांवर सुरक्षेची माहिती देणारे फलक लावण्याची जबाबदारी त्या-त्या ग्रामपंचायतींकडे दिली हाेती. त्याच्या अमलबजावणीची जबाबदारी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली होती. या ठिकाणांवर कायमस्वरूपी जीवरक्षक नेमण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू होते. त्यातच आता कोरोनाचे संकट आल्याने हे सर्व धबधबे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद यावर्षीही पर्यटकांना दुर्लभ झाला आहे.