शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

कोरोनामुळे धबधब्यांवरील बंदी कायम; पावसाळी पर्यटन थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित होतात. त्यामुळे तरूणाई याकडे विशेष आकर्षित होते. श्रावण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित होतात. त्यामुळे तरूणाई याकडे विशेष आकर्षित होते. श्रावण महिन्यातील निसर्गसाैंदर्यात तर हे धबधबे अधिकच भर घालतात. पावसाची रिमझिम आणि उन्हाचा खेळ यामुळे धबधब्यांचा आनंद घ्यायला पर्यटकांची पावले आपोआप अशा धबधब्यांकडे वळतात. मात्र, काही वर्षांपासून काही धोकादायक धरणांजवळ दुर्घटना घडल्याने जिल्हा प्रशासनाने अशाठिकाणी जाण्यास बंदी घातली होती. त्यातच गेल्यावर्षापासून कोरोनाचे संकट जिल्ह्यात आल्याने नागरिकांना धबधब्यांवर जाण्यास घातलेली बंदी कायम आहे. त्यामुळे इथले पावसाळी पर्यटन थांबले आहे.

रत्नागिरी तालुक्यातील उक्षी, निवळी, रानपाट येथील धबधब्यांवर निसर्गप्रेमींची गर्दी मोठ्या प्रमाणावर दरवर्षी होत असते. शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यातील हे धबधबे पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या श्रमपरिहाराबरोबरच मौजमजेची ठिकाणे बनली आहेत. सुट्टीच्या दिवशी वर्षास्नानाचा आनंद घेण्यासाठी तरुण-तरुणींची याठिकाणी गर्दी होते. पानवल येथील धरणाच्या ठिकाणीही धबधब्याचा विलोभनीय आनंद मिळतो, तसेच हे सुरक्षित आणि शांत असे ठिकाण असल्याने अनेकांची याठिकाणी जाण्यासाठी पसंती असते. मात्र, बेभान झालेल्या तरुणाईकडून अतिउत्साहाच्या भरात अनुचित प्रकार घडतात. असे अनुचित प्रकार यापूर्वी घडल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी धबधब्यांवर सुरक्षेची माहिती देणारे फलक लावण्याची जबाबदारी त्या-त्या ग्रामपंचायतींकडे दिली हाेती. त्याच्या अमलबजावणीची जबाबदारी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली होती. या ठिकाणांवर कायमस्वरूपी जीवरक्षक नेमण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू होते. त्यातच आता कोरोनाचे संकट आल्याने हे सर्व धबधबे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद यावर्षीही पर्यटकांना दुर्लभ झाला आहे.