शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

कोरोनामुळे धबधब्यांवरील बंदी कायम; पावसाळी पर्यटन थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित होतात. त्यामुळे तरूणाई याकडे विशेष आकर्षित होते. श्रावण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित होतात. त्यामुळे तरूणाई याकडे विशेष आकर्षित होते. श्रावण महिन्यातील निसर्गसाैंदर्यात तर हे धबधबे अधिकच भर घालतात. पावसाची रिमझिम आणि उन्हाचा खेळ यामुळे धबधब्यांचा आनंद घ्यायला पर्यटकांची पावले आपोआप अशा धबधब्यांकडे वळतात. मात्र, काही वर्षांपासून काही धोकादायक धरणांजवळ दुर्घटना घडल्याने जिल्हा प्रशासनाने अशाठिकाणी जाण्यास बंदी घातली होती. त्यातच गेल्यावर्षापासून कोरोनाचे संकट जिल्ह्यात आल्याने नागरिकांना धबधब्यांवर जाण्यास घातलेली बंदी कायम आहे. त्यामुळे इथले पावसाळी पर्यटन थांबले आहे.

रत्नागिरी तालुक्यातील उक्षी, निवळी, रानपाट येथील धबधब्यांवर निसर्गप्रेमींची गर्दी मोठ्या प्रमाणावर दरवर्षी होत असते. शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यातील हे धबधबे पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या श्रमपरिहाराबरोबरच मौजमजेची ठिकाणे बनली आहेत. सुट्टीच्या दिवशी वर्षास्नानाचा आनंद घेण्यासाठी तरुण-तरुणींची याठिकाणी गर्दी होते. पानवल येथील धरणाच्या ठिकाणीही धबधब्याचा विलोभनीय आनंद मिळतो, तसेच हे सुरक्षित आणि शांत असे ठिकाण असल्याने अनेकांची याठिकाणी जाण्यासाठी पसंती असते. मात्र, बेभान झालेल्या तरुणाईकडून अतिउत्साहाच्या भरात अनुचित प्रकार घडतात. असे अनुचित प्रकार यापूर्वी घडल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी धबधब्यांवर सुरक्षेची माहिती देणारे फलक लावण्याची जबाबदारी त्या-त्या ग्रामपंचायतींकडे दिली हाेती. त्याच्या अमलबजावणीची जबाबदारी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली होती. या ठिकाणांवर कायमस्वरूपी जीवरक्षक नेमण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू होते. त्यातच आता कोरोनाचे संकट आल्याने हे सर्व धबधबे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद यावर्षीही पर्यटकांना दुर्लभ झाला आहे.