शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कोरोनामुळे धबधब्यांवरील बंदी कायम; पावसाळी पर्यटन थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित होतात. त्यामुळे तरूणाई याकडे विशेष आकर्षित होते. श्रावण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित होतात. त्यामुळे तरूणाई याकडे विशेष आकर्षित होते. श्रावण महिन्यातील निसर्गसाैंदर्यात तर हे धबधबे अधिकच भर घालतात. पावसाची रिमझिम आणि उन्हाचा खेळ यामुळे धबधब्यांचा आनंद घ्यायला पर्यटकांची पावले आपोआप अशा धबधब्यांकडे वळतात. मात्र, काही वर्षांपासून काही धोकादायक धरणांजवळ दुर्घटना घडल्याने जिल्हा प्रशासनाने अशाठिकाणी जाण्यास बंदी घातली होती. त्यातच गेल्यावर्षापासून कोरोनाचे संकट जिल्ह्यात आल्याने नागरिकांना धबधब्यांवर जाण्यास घातलेली बंदी कायम आहे. त्यामुळे इथले पावसाळी पर्यटन थांबले आहे.

रत्नागिरी तालुक्यातील उक्षी, निवळी, रानपाट येथील धबधब्यांवर निसर्गप्रेमींची गर्दी मोठ्या प्रमाणावर दरवर्षी होत असते. शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यातील हे धबधबे पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या श्रमपरिहाराबरोबरच मौजमजेची ठिकाणे बनली आहेत. सुट्टीच्या दिवशी वर्षास्नानाचा आनंद घेण्यासाठी तरुण-तरुणींची याठिकाणी गर्दी होते. पानवल येथील धरणाच्या ठिकाणीही धबधब्याचा विलोभनीय आनंद मिळतो, तसेच हे सुरक्षित आणि शांत असे ठिकाण असल्याने अनेकांची याठिकाणी जाण्यासाठी पसंती असते. मात्र, बेभान झालेल्या तरुणाईकडून अतिउत्साहाच्या भरात अनुचित प्रकार घडतात. असे अनुचित प्रकार यापूर्वी घडल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी धबधब्यांवर सुरक्षेची माहिती देणारे फलक लावण्याची जबाबदारी त्या-त्या ग्रामपंचायतींकडे दिली हाेती. त्याच्या अमलबजावणीची जबाबदारी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली होती. या ठिकाणांवर कायमस्वरूपी जीवरक्षक नेमण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू होते. त्यातच आता कोरोनाचे संकट आल्याने हे सर्व धबधबे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद यावर्षीही पर्यटकांना दुर्लभ झाला आहे.