शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

CoronaVirus Lockdown : रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून कडक धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:55 IST

प्रशासनाने वेळोवेळी ताकीद देऊनही नागरिक मोठ्या प्रमाणावर दुचाकी घेऊन रस्त्यावर येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत दुचाकींना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हा आदेश जाहीर केला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून कडक धोरण कोरोनाला रोखण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

रत्नागिरी : प्रशासनाने वेळोवेळी ताकीद देऊनही नागरिक मोठ्या प्रमाणावर दुचाकी घेऊन रस्त्यावर येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत दुचाकींना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हा आदेश जाहीर केला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, देवरुख, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या नगर परिषद व नगर पंचायत हद्दीमधील दुचाकी वाहनांना २८ तारखेच्या मध्यरात्रीपासून पुढील आदेश होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमधून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना वगळण्यात आले आहे.

या आदेशाची शुक्रवारपासूनच अंमलबजावणी होणार होती. परंतु लोकांच्या जीवनाश्यक गरजेकरिता प्रशासनाने कडक धोरण स्वीकारले नव्हते. परंतु नागरिकांनी त्याचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर शनिवारी वाहने रस्त्यावर आणली त्यामुळे लोकांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने हा कडक निर्णय घेतला.यापुढे सर्वसामान्य नागरिक दुचाकी घेऊन रस्त्यावर येऊ शकणार नाहीत. असे कोणी आल्यास आता त्यांच्यावर कडक कारवाई करणेत येणार आहे. याआधी प्रशासनाने चारचाकी व तीनचाकी व अवजड वाहनांवर जिल्ह्यात बंदी घातली आहे. लोकांना दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेतला जात असल्याने अखेर प्रशासनाला कडक धोरण स्वीकारण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी