शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

कोरोना तपासणी तंत्रज्ञांना परत कामावर घेणार : सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्ण कमी झाल्यामुळे कोरोना तपासणी केंद्रांवरील अनेक तंत्रज्ञ कमी करण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता ...

रत्नागिरी : कोरोना रुग्ण कमी झाल्यामुळे कोरोना तपासणी केंद्रांवरील अनेक तंत्रज्ञ कमी करण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यासह एकूण १० जिल्ह्यांमधील तंत्रज्ञांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

अनेक ठिकाणी कोविड सेंटर्स बंद करण्यात आली आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ती पुन्हा सुरू होतील का, असा प्रश्न करण्यात आला असता मंत्री सामंत यांनी सांगितले की, सद्य:स्थितीत रुग्णसंख्या घटली आहे. रत्नागिरीत १०० पेक्षा कमी रुग्ण सापडत आहेत. अजून परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, जर १५० पेक्षा जास्त रुग्ण रोज सापडू लागले तर बंद केलेली कोविड सेंटर्स पुन्हा सुरू करावी लागतील, अशी सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

रुग्ण आणि चाचण्या कमी झाल्यामुळे कोरोना तपासणी केंद्रांवरील अनेक तंत्रज्ञ कमी करण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे त्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि अन्य काही अशा दहा जिल्ह्यांबाबत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.