शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोरोना, तौक्तेने मच्छीमार बुडाले आर्थिक खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

वादळाचा सर्वात मोठा फटका मच्छीमारांसह आंबा बागायतदारांना बसला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मच्छीमार आणि आंबा बागायतदारांवर अवलंबून आहे. ...

वादळाचा सर्वात मोठा फटका मच्छीमारांसह आंबा बागायतदारांना बसला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मच्छीमार आणि आंबा बागायतदारांवर अवलंबून आहे. त्यामुळे मच्छीमार, आंबा बागायतदारांचे नुकसान हे सर्वांसाठीच तोट्याचे ठरणारे आहे. जिल्ह्याचे अर्थकारण हे या दोन्ही व्यवसायांवर असल्याने वादळ वाऱ्याचा फटका इतर व्यवसायांनाही बसला आहे. या व्यवसायांशी जोडधंदे आज कोरोनामुळे बंद अवस्थेत असले तरी लॉकडाऊन उठल्यानंतर सुरू होणाऱ्या इतर व्यवसायांवर होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे अर्थकारण हे दोन्ही व्यवसाय बुडाल्याने इतर व्यवसायांना घेऊन बुडणार हे निश्चित आहे.

कोरोनामुळे या दोन्ही व्यवसायांना जबर फटका बसलेला असतानाच ताैक्ते वादळाने त्यांना अडचणीत आणले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये छोटीमोठी वादळे येऊन गेली आणि त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार भरडला गेला. यंदाचा मासेमारी हंगामही मच्छीमारांसाठी तोट्यातच गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खराब हवामानामुळे मच्छीमारी अडचणीत असतानाच वादळाने त्यांच्या अडचणीत आणखीच भर घातली. त्यामुळे या चक्रीवादळाचा मोठा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला आहे. तौक्ते वादळामुळे आजही वातावरणावर परिणाम झालेला दिसून येत आहे. अजूनही वातावरण खोल समुद्रातील मासेमारीसाठी धोकादायक असल्याने मच्छीमार भीतीच्या छायेत वावरताना दिसून येत आहे. त्यामुळेच आजही सुमारे ३५०० नौका किनारी नांगरावर उभ्या आहेत. त्यातच अनेक नौका वादळामुळे एकमेकांवर आदळून आपटून नुकसानग्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून हे न भरून येणारे आहे. कारण आजपर्यंत झालेल्या वादळामध्ये मच्छीमार तसेच बागायतदारांना किती प्रमाणात नुकसानभरपाई शासनाकडून मिळाली, हे न सांगणाइतके आहे. कोणाचेही शासन असो मच्छीमार, बागायतदार हे मदतीच्या प्रतीक्षेत राहणार, ही व्यथा सांगणार कोणाला, असेच म्हणावे लागेल.

- रहिम दलाल