शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

कोरोना, तौक्तेने मच्छीमार बुडाले आर्थिक खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

वादळाचा सर्वात मोठा फटका मच्छीमारांसह आंबा बागायतदारांना बसला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मच्छीमार आणि आंबा बागायतदारांवर अवलंबून आहे. ...

वादळाचा सर्वात मोठा फटका मच्छीमारांसह आंबा बागायतदारांना बसला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मच्छीमार आणि आंबा बागायतदारांवर अवलंबून आहे. त्यामुळे मच्छीमार, आंबा बागायतदारांचे नुकसान हे सर्वांसाठीच तोट्याचे ठरणारे आहे. जिल्ह्याचे अर्थकारण हे या दोन्ही व्यवसायांवर असल्याने वादळ वाऱ्याचा फटका इतर व्यवसायांनाही बसला आहे. या व्यवसायांशी जोडधंदे आज कोरोनामुळे बंद अवस्थेत असले तरी लॉकडाऊन उठल्यानंतर सुरू होणाऱ्या इतर व्यवसायांवर होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे अर्थकारण हे दोन्ही व्यवसाय बुडाल्याने इतर व्यवसायांना घेऊन बुडणार हे निश्चित आहे.

कोरोनामुळे या दोन्ही व्यवसायांना जबर फटका बसलेला असतानाच ताैक्ते वादळाने त्यांना अडचणीत आणले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये छोटीमोठी वादळे येऊन गेली आणि त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार भरडला गेला. यंदाचा मासेमारी हंगामही मच्छीमारांसाठी तोट्यातच गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खराब हवामानामुळे मच्छीमारी अडचणीत असतानाच वादळाने त्यांच्या अडचणीत आणखीच भर घातली. त्यामुळे या चक्रीवादळाचा मोठा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला आहे. तौक्ते वादळामुळे आजही वातावरणावर परिणाम झालेला दिसून येत आहे. अजूनही वातावरण खोल समुद्रातील मासेमारीसाठी धोकादायक असल्याने मच्छीमार भीतीच्या छायेत वावरताना दिसून येत आहे. त्यामुळेच आजही सुमारे ३५०० नौका किनारी नांगरावर उभ्या आहेत. त्यातच अनेक नौका वादळामुळे एकमेकांवर आदळून आपटून नुकसानग्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून हे न भरून येणारे आहे. कारण आजपर्यंत झालेल्या वादळामध्ये मच्छीमार तसेच बागायतदारांना किती प्रमाणात नुकसानभरपाई शासनाकडून मिळाली, हे न सांगणाइतके आहे. कोणाचेही शासन असो मच्छीमार, बागायतदार हे मदतीच्या प्रतीक्षेत राहणार, ही व्यथा सांगणार कोणाला, असेच म्हणावे लागेल.

- रहिम दलाल