शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
5
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
6
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
7
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
8
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
9
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
10
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
12
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
13
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
14
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
15
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
16
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
17
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
18
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
19
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
20
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

कोरोना, तौक्तेने मच्छीमार बुडाले आर्थिक खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

वादळाचा सर्वात मोठा फटका मच्छीमारांसह आंबा बागायतदारांना बसला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मच्छीमार आणि आंबा बागायतदारांवर अवलंबून आहे. ...

वादळाचा सर्वात मोठा फटका मच्छीमारांसह आंबा बागायतदारांना बसला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मच्छीमार आणि आंबा बागायतदारांवर अवलंबून आहे. त्यामुळे मच्छीमार, आंबा बागायतदारांचे नुकसान हे सर्वांसाठीच तोट्याचे ठरणारे आहे. जिल्ह्याचे अर्थकारण हे या दोन्ही व्यवसायांवर असल्याने वादळ वाऱ्याचा फटका इतर व्यवसायांनाही बसला आहे. या व्यवसायांशी जोडधंदे आज कोरोनामुळे बंद अवस्थेत असले तरी लॉकडाऊन उठल्यानंतर सुरू होणाऱ्या इतर व्यवसायांवर होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे अर्थकारण हे दोन्ही व्यवसाय बुडाल्याने इतर व्यवसायांना घेऊन बुडणार हे निश्चित आहे.

कोरोनामुळे या दोन्ही व्यवसायांना जबर फटका बसलेला असतानाच ताैक्ते वादळाने त्यांना अडचणीत आणले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये छोटीमोठी वादळे येऊन गेली आणि त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार भरडला गेला. यंदाचा मासेमारी हंगामही मच्छीमारांसाठी तोट्यातच गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खराब हवामानामुळे मच्छीमारी अडचणीत असतानाच वादळाने त्यांच्या अडचणीत आणखीच भर घातली. त्यामुळे या चक्रीवादळाचा मोठा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला आहे. तौक्ते वादळामुळे आजही वातावरणावर परिणाम झालेला दिसून येत आहे. अजूनही वातावरण खोल समुद्रातील मासेमारीसाठी धोकादायक असल्याने मच्छीमार भीतीच्या छायेत वावरताना दिसून येत आहे. त्यामुळेच आजही सुमारे ३५०० नौका किनारी नांगरावर उभ्या आहेत. त्यातच अनेक नौका वादळामुळे एकमेकांवर आदळून आपटून नुकसानग्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून हे न भरून येणारे आहे. कारण आजपर्यंत झालेल्या वादळामध्ये मच्छीमार तसेच बागायतदारांना किती प्रमाणात नुकसानभरपाई शासनाकडून मिळाली, हे न सांगणाइतके आहे. कोणाचेही शासन असो मच्छीमार, बागायतदार हे मदतीच्या प्रतीक्षेत राहणार, ही व्यथा सांगणार कोणाला, असेच म्हणावे लागेल.

- रहिम दलाल