शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

कोरोना संकटाबरोबरच आता जिल्हावासीयांना पुराची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

रत्नागिरी : यावर्षी पाऊस अधिक होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मान्सून सुरू होतानाच आता येत्या १९ ...

रत्नागिरी : यावर्षी पाऊस अधिक होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मान्सून सुरू होतानाच आता येत्या १९ जूनपासून पाच दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून आवश्यक ती उपाययोजना करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

रत्नागिरी, चिपळूण, खेड, गुहागर, संगमेश्वर आणि राजापूर या सहा तालुक्यांमधील एकूण ३१ गावे पूरप्रवण गावे म्हणून घोषित करण्यात आली असून ४५ दरड प्रवण गावे आहेत. अतिवृष्टीत या गावांमध्ये पूर येण्याचा तसेच दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अशा गावांमधील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात महामार्गावर काही घाटांमध्ये दरड कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात घडतात. त्यादृष्टीनेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व नगरपालिका, नगरपंचायती यांनाही कचऱ्यामुळे पाणी तुंबणार नाही, यासाठी शहरांमधली गटारे उघडी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी महावितरणला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पावसाळ्यात संभाव्य आपत्तींचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही कार्यरत राहणार आहे.

अग्निशमन यंत्रणा सज्ज

जिल्ह्यात आतापर्यंत स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात नव्हती. मात्र, गेल्या वर्षी एम. आय. डी. सी. स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे पावसाळ्यात ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते.

पावसाळ्यात काही वेळा आपत्ती आल्यास जिल्ह्यातील खासगी कंपन्यांची तातडीने मदत घेण्यात येते.

रत्नागिरीतही जे. एस. डब्ल्यू, फिनोलेक्स या कंपनीच्या अग्निशमन यंत्रणेचे नेहमी सहकार्य मिळते.

धोकादायक इमारती आणि झाडेेेे....

रत्नागिरीत ८९ आणि चिपळूण शहरात सुमारे ३० धोकादायक इमारती आहेत. पावसाळ्याचा धोका लक्षात घेऊन या इमारतींना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील धोकादायक झाडे कोसळून आपत्ती आल्यास ते झाड हटविण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

धोकादायक इमारती, झाडे कोसळून जीवितहानी अथवा अन्य नुकसान होऊ नये, यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश सर्व पालिका आणि तालुक्यांना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात सावित्री, वसिष्ठी, शास्त्री, कोदवली, वाघोटण आदी प्रमुख पाच नद्या असून त्यांच्या सहा उपनद्या आहेत. अतिवृष्टीत या नद्यांना पूर आल्यास परिसरालगतच्या गावांतील लोकांना धोका निर्माण होतो. नदीलगत असलेली ३१ गावे पूरग्रस्त गावे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. पावसाळ्यात येणाऱ्या आपत्ती तसेच अन्य आपत्तींची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. यात सर्व यंत्रणांचा समावेश आहे. आपत्तीच्या स्वरूपावरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित यंत्रणेला माहिती देऊन तातडीच्या मदतकार्यासाठी पाचारण केले जाते.