शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

कोरोना संकटाबरोबरच आता जिल्हावासीयांना पुराची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

रत्नागिरी : यावर्षी पाऊस अधिक होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मान्सून सुरू होतानाच आता येत्या १९ ...

रत्नागिरी : यावर्षी पाऊस अधिक होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मान्सून सुरू होतानाच आता येत्या १९ जूनपासून पाच दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून आवश्यक ती उपाययोजना करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

रत्नागिरी, चिपळूण, खेड, गुहागर, संगमेश्वर आणि राजापूर या सहा तालुक्यांमधील एकूण ३१ गावे पूरप्रवण गावे म्हणून घोषित करण्यात आली असून ४५ दरड प्रवण गावे आहेत. अतिवृष्टीत या गावांमध्ये पूर येण्याचा तसेच दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अशा गावांमधील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात महामार्गावर काही घाटांमध्ये दरड कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात घडतात. त्यादृष्टीनेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व नगरपालिका, नगरपंचायती यांनाही कचऱ्यामुळे पाणी तुंबणार नाही, यासाठी शहरांमधली गटारे उघडी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी महावितरणला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पावसाळ्यात संभाव्य आपत्तींचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही कार्यरत राहणार आहे.

अग्निशमन यंत्रणा सज्ज

जिल्ह्यात आतापर्यंत स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात नव्हती. मात्र, गेल्या वर्षी एम. आय. डी. सी. स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे पावसाळ्यात ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते.

पावसाळ्यात काही वेळा आपत्ती आल्यास जिल्ह्यातील खासगी कंपन्यांची तातडीने मदत घेण्यात येते.

रत्नागिरीतही जे. एस. डब्ल्यू, फिनोलेक्स या कंपनीच्या अग्निशमन यंत्रणेचे नेहमी सहकार्य मिळते.

धोकादायक इमारती आणि झाडेेेे....

रत्नागिरीत ८९ आणि चिपळूण शहरात सुमारे ३० धोकादायक इमारती आहेत. पावसाळ्याचा धोका लक्षात घेऊन या इमारतींना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील धोकादायक झाडे कोसळून आपत्ती आल्यास ते झाड हटविण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

धोकादायक इमारती, झाडे कोसळून जीवितहानी अथवा अन्य नुकसान होऊ नये, यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश सर्व पालिका आणि तालुक्यांना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात सावित्री, वसिष्ठी, शास्त्री, कोदवली, वाघोटण आदी प्रमुख पाच नद्या असून त्यांच्या सहा उपनद्या आहेत. अतिवृष्टीत या नद्यांना पूर आल्यास परिसरालगतच्या गावांतील लोकांना धोका निर्माण होतो. नदीलगत असलेली ३१ गावे पूरग्रस्त गावे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. पावसाळ्यात येणाऱ्या आपत्ती तसेच अन्य आपत्तींची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. यात सर्व यंत्रणांचा समावेश आहे. आपत्तीच्या स्वरूपावरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित यंत्रणेला माहिती देऊन तातडीच्या मदतकार्यासाठी पाचारण केले जाते.