शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

कोरोनामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने लक्ष देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना संकट असतानाही एस.टी. कर्मचारी जीव धोक्यात टाकून सेवा बजावत आहेत. त्यामुळे कोरोना काळात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना संकट असतानाही एस.टी. कर्मचारी जीव धोक्यात टाकून सेवा बजावत आहेत. त्यामुळे कोरोना काळात कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत साळवी यांनी केली आहे. विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे.

बस व विश्रांतीगृहाचे स्वच्छ व निर्जंतुकीकरण सातत्याने केले जात नाही, याबाबत प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे. चालक, वाहक व यांत्रिकी कामगार यांच्या कोविड तपासणी किंवा लसीकरण याबाबतीत वेळीच योग्य नियोजन केलेले नाही. मध्यवर्ती कार्यालयाच्या कामगिरी लावताना रोटेशन पद्धतीने लावून सर्वांना सारखे काम व संक्रमणापासून बचाव होईल असे नियोजन करणे आवश्यक असताना, तसे नियोजन न करणे. उपस्थिती मर्यादित ठेवाव्यात अशा सूचना असतानाही चालक, वाहक यांना हजेरीसाठी आगारात बोलावणे. विभागीय कार्यशाळा, विभागीय कार्यालय व आगारस्तरावरचे यांत्रिक कर्मचारी यांचे चुकीचे नियोजन करून गर्दी एकत्र करणे. अत्यावश्यक सेवा म्हणून काम सुरू ठेवणे अशा सूचना असतानाही शिवशाही प्रशिक्षण ही बाब आत्ताची तातडीची नसताना कामगारांना बेकायदेशीर एकत्र करणे. समय वेतनश्रेणी, तात्पुरती समय वेतनश्रेणी, रोजंदारी चालक-वाहक अशी गटवारी असून सामान्य परिस्थिती असताना, त्यांना कामगिरी लावण्याची आपल्याकडे प्रचलित पद्धत आहे. मध्यवर्ती कार्यालयाच्या तशा सूचना नसताना चुकीच्या, बेकायदेशीर, शासनाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात व उद्देश विचारात न घेता कामगिरीचे चुकीचे नियोजन करून तात्पुरती समय वेतनश्रेणी व रोजंदारी गटातील कामगारांना कामगिरी न लावून कामगारांची उपासमार होईल अशी अमानवी कार्यप्रणाली राबविण्यात येते.

राज्यातील इतर विभागांपेक्षा आपल्या विभागात वेगळी कार्यप्रणाली राबवून कामगारांच्या जीविताशी खेळ सुरू आहे. कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून शासनाने आर्थिक मदत करूनही आगार व्यवस्थापकांनी चुकीचे अहवाल तयार करून कोरोना कालावधीतील कामगारांना पगार आजपर्यंत न मिळू देणे आदी सर्व बाबी अतिशय महत्त्वाच्या व योग्य वेळी सोडविण्याच्या असून त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विनाविलंब कार्यप्रणालीत बदल व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे.