शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

कोरोनामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने लक्ष देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना संकट असतानाही एस.टी. कर्मचारी जीव धोक्यात टाकून सेवा बजावत आहेत. त्यामुळे कोरोना काळात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना संकट असतानाही एस.टी. कर्मचारी जीव धोक्यात टाकून सेवा बजावत आहेत. त्यामुळे कोरोना काळात कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत साळवी यांनी केली आहे. विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे.

बस व विश्रांतीगृहाचे स्वच्छ व निर्जंतुकीकरण सातत्याने केले जात नाही, याबाबत प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे. चालक, वाहक व यांत्रिकी कामगार यांच्या कोविड तपासणी किंवा लसीकरण याबाबतीत वेळीच योग्य नियोजन केलेले नाही. मध्यवर्ती कार्यालयाच्या कामगिरी लावताना रोटेशन पद्धतीने लावून सर्वांना सारखे काम व संक्रमणापासून बचाव होईल असे नियोजन करणे आवश्यक असताना, तसे नियोजन न करणे. उपस्थिती मर्यादित ठेवाव्यात अशा सूचना असतानाही चालक, वाहक यांना हजेरीसाठी आगारात बोलावणे. विभागीय कार्यशाळा, विभागीय कार्यालय व आगारस्तरावरचे यांत्रिक कर्मचारी यांचे चुकीचे नियोजन करून गर्दी एकत्र करणे. अत्यावश्यक सेवा म्हणून काम सुरू ठेवणे अशा सूचना असतानाही शिवशाही प्रशिक्षण ही बाब आत्ताची तातडीची नसताना कामगारांना बेकायदेशीर एकत्र करणे. समय वेतनश्रेणी, तात्पुरती समय वेतनश्रेणी, रोजंदारी चालक-वाहक अशी गटवारी असून सामान्य परिस्थिती असताना, त्यांना कामगिरी लावण्याची आपल्याकडे प्रचलित पद्धत आहे. मध्यवर्ती कार्यालयाच्या तशा सूचना नसताना चुकीच्या, बेकायदेशीर, शासनाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात व उद्देश विचारात न घेता कामगिरीचे चुकीचे नियोजन करून तात्पुरती समय वेतनश्रेणी व रोजंदारी गटातील कामगारांना कामगिरी न लावून कामगारांची उपासमार होईल अशी अमानवी कार्यप्रणाली राबविण्यात येते.

राज्यातील इतर विभागांपेक्षा आपल्या विभागात वेगळी कार्यप्रणाली राबवून कामगारांच्या जीविताशी खेळ सुरू आहे. कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून शासनाने आर्थिक मदत करूनही आगार व्यवस्थापकांनी चुकीचे अहवाल तयार करून कोरोना कालावधीतील कामगारांना पगार आजपर्यंत न मिळू देणे आदी सर्व बाबी अतिशय महत्त्वाच्या व योग्य वेळी सोडविण्याच्या असून त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विनाविलंब कार्यप्रणालीत बदल व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे.