शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
4
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
5
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
6
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
7
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
8
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
9
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
10
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
11
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
12
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
13
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
14
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
15
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
16
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
17
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
18
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
19
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
20
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप

कोरोनामुळे कलाकारांना करावा लागतोय संकटांचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. विविध यंत्रणांवर याचा परिणाम झाला आहे. ...

रत्नागिरी : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. विविध यंत्रणांवर याचा परिणाम झाला आहे. रंगभूमी क्षेत्रालाही याचा फटका बसला असून रंगमंचावरच उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

लॉकडाऊनमध्ये टीव्ही आणि मोबाईल वगळता मनोरंजनाची सर्वच साधने बंद आहेत. चित्रपटगृहे, नाट्यगृहांना टाळे लावण्यात आले आहे. गतवर्षीही लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. यावर्षी कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असल्यामुळे लॉकडाऊन शासनाला जाहीर करावे लागले. सद्यस्थितीत लॉकडाऊन लवकर संपणे अशक्य आहे, शिवाय संपले तरी सोशल डिस्टन्सिंगमुळे नाट्यगृहे लवकर खुली होणे अशक्य आहे. अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक केवळ नाटकांवर निर्भर आहेत. या सर्वांच्याच उपजीविकेला खीळ बसली आहे. काही कलाकारांनी आधीच्या बचतीवर गतवर्षी संकटावर काही प्रमाणात मात केली होती. मात्र गतवर्षी जानेवारीपासून कार्यक्रम सुरू झाले. जेमतेम दोन ते अडीच महिनेच कलाकारांना काम मिळाले. ज्या कलाकारांचा पूर्णवेळ नाटक किंवा कलेवर उदरनिर्वाह अवलंबून आहे, त्यांच्यापुढे खरा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊननंतरही व्यवसाय रुळावर यायला बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे हा पाच ते सहा महिन्यांचा काळ कसा काढायचा, असा प्रश्न कलाकारांपुढे पडला आहे.

लॉकडाऊनमधील महिनाभराचे प्रयोग, एकूण नाटके आणि निर्मिती संस्था यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वास्तविक हा हंगाम नाटकांचा आहे. पावसाळा सुरू झाल्यावर फारसे प्रयोग होत नाहीत. त्यामुळे निर्मात्यांपुढेही आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. नाटक बसविण्यासाठी केलेला खर्च उत्सव, जत्रेच्यानिमित्ताने नाटकांचे प्रयोग ठिकठिकाणी अल्प मोबदल्यात सादर करून संस्था भागवित असतात. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व प्रयोग रद्द करण्यात आल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. सध्या काही संस्थांकडून ऑनलाईन कथा, कविता, नाट्यवाचन, एकपात्री स्पर्धा आयोजित केल्या जात असून त्यासाठी मात्र चांगला प्रतिसाद लाभत आहे.

.................................

व्यावसायिक नाटके पूर्णपणे बंद असल्याने पडद्यामागच्या कलाकारांना काम नसल्याने त्यांच्यावर उपासमार ओढवली आहे. गतवर्षीप्रमाणे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कलेवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्यांवर उपासमार ओढवली आहे. लॉकडाऊन संपले तरी सोशल डिस्टन्सिंगमुळे नाट्यव्यवसाय सुरू होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व कलाकारांना शासनाकडून मदत करण्यात यावी.

- समीर इंदुलकर,

कार्याध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद, रत्नागिरी शाखा.