शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
8
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
9
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
10
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
11
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
12
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
13
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
14
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
15
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
16
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
17
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
18
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
19
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
20
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!

कोरोनामुळे कलाकारांना करावा लागतोय संकटांचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. विविध यंत्रणांवर याचा परिणाम झाला आहे. ...

रत्नागिरी : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. विविध यंत्रणांवर याचा परिणाम झाला आहे. रंगभूमी क्षेत्रालाही याचा फटका बसला असून रंगमंचावरच उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

लॉकडाऊनमध्ये टीव्ही आणि मोबाईल वगळता मनोरंजनाची सर्वच साधने बंद आहेत. चित्रपटगृहे, नाट्यगृहांना टाळे लावण्यात आले आहे. गतवर्षीही लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. यावर्षी कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असल्यामुळे लॉकडाऊन शासनाला जाहीर करावे लागले. सद्यस्थितीत लॉकडाऊन लवकर संपणे अशक्य आहे, शिवाय संपले तरी सोशल डिस्टन्सिंगमुळे नाट्यगृहे लवकर खुली होणे अशक्य आहे. अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक केवळ नाटकांवर निर्भर आहेत. या सर्वांच्याच उपजीविकेला खीळ बसली आहे. काही कलाकारांनी आधीच्या बचतीवर गतवर्षी संकटावर काही प्रमाणात मात केली होती. मात्र गतवर्षी जानेवारीपासून कार्यक्रम सुरू झाले. जेमतेम दोन ते अडीच महिनेच कलाकारांना काम मिळाले. ज्या कलाकारांचा पूर्णवेळ नाटक किंवा कलेवर उदरनिर्वाह अवलंबून आहे, त्यांच्यापुढे खरा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊननंतरही व्यवसाय रुळावर यायला बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे हा पाच ते सहा महिन्यांचा काळ कसा काढायचा, असा प्रश्न कलाकारांपुढे पडला आहे.

लॉकडाऊनमधील महिनाभराचे प्रयोग, एकूण नाटके आणि निर्मिती संस्था यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वास्तविक हा हंगाम नाटकांचा आहे. पावसाळा सुरू झाल्यावर फारसे प्रयोग होत नाहीत. त्यामुळे निर्मात्यांपुढेही आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. नाटक बसविण्यासाठी केलेला खर्च उत्सव, जत्रेच्यानिमित्ताने नाटकांचे प्रयोग ठिकठिकाणी अल्प मोबदल्यात सादर करून संस्था भागवित असतात. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व प्रयोग रद्द करण्यात आल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. सध्या काही संस्थांकडून ऑनलाईन कथा, कविता, नाट्यवाचन, एकपात्री स्पर्धा आयोजित केल्या जात असून त्यासाठी मात्र चांगला प्रतिसाद लाभत आहे.

.................................

व्यावसायिक नाटके पूर्णपणे बंद असल्याने पडद्यामागच्या कलाकारांना काम नसल्याने त्यांच्यावर उपासमार ओढवली आहे. गतवर्षीप्रमाणे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कलेवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्यांवर उपासमार ओढवली आहे. लॉकडाऊन संपले तरी सोशल डिस्टन्सिंगमुळे नाट्यव्यवसाय सुरू होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व कलाकारांना शासनाकडून मदत करण्यात यावी.

- समीर इंदुलकर,

कार्याध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद, रत्नागिरी शाखा.