शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

कोरोनाचा एप्रिल महिन्यात हाहा:कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:30 IST

जिल्ह्यात गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. जानेवारी, फेब्रुवारी आणि १५ मार्चपर्यंत ही संख्या कमी होती. ...

जिल्ह्यात गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. जानेवारी, फेब्रुवारी आणि १५ मार्चपर्यंत ही संख्या कमी होती. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग कमी होतोय, असा दिलासा नागरिकांबरोबरच आरोग्य यंत्रणेलाही वाटू लागला होता. मात्र, शिमगोत्सवात गावाला येणाऱ्या चाकरमान्यांमुळे हा धोका वाढणार आहे, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्याकडून नागरिकांना सातत्याने देण्यात येत होत्या. मात्र, शिमगोत्सवासाठी बाहेरून येणारे आणि जिल्ह्यातीलही नागरिक यांच्याकडून दाखविण्यात आलेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा धोका वाढला. परिणामी, रुग्णसंख्या भरमसाट वाढू लागली. १ ते १५ मार्च या कालावधीत २८७ असलेली संख्या १६ ते ३१ मार्च या कालावधीत ७८८ वर पोहोचली. १५ दिवसांत ५२१ नव्या रुग्णांची भर पडली. तर १ ते १६ एप्रिल या कालावधीत नव्या रुग्णसंख्येने साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. १८ मार्च २०२० ते १६ एप्रिल २०२१ या कालावधीतील एकूण रुग्णसंख्या आता १४,५६० वर पोहोचली आहे. प्रत्येक दिवशी आदल्या दिवशीच्या संख्येत १०० पेक्षा अधिक रुग्णांची भर पडू लागली आहे. सध्या रुग्णसंख्येचा चढता आलेख पाहता एप्रिलअखेर ही संख्या दुपटीपेक्षा अधिक होण्याचा धोका व्यक्त होत आहे.

शिमगोत्सवासाठी येणाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने लसीकरण तसेच कोरोना चाचणी करून येणे बंधनकारक केले होते. मात्र, तरीही या नियमांचे उल्लंघन करून आलेले थेट घरात पाेहोचले. त्यामुळे महिनाभरात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला. शिमगोत्सवाच्या काळात कोरोनाचा चढता आलेख पाहता १६ मार्च ते १६ एप्रिल या महिनाभराच्या कालावधीत तब्बल ४,३२९ नवे रुग्ण सापडले आहेत. अजूनही तपासणीसाठी पुढे येणाऱ्यांची संख्या कमी असल्याने कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत ४२९ जणांचे मृत्यू झाले आहेत. आता दिवसाला सहाशे पेक्षाही जास्त रुग्ण सापडू लागल्याने आता आरोग्य यंत्रणेवर अधिकाधिक ताण येत आहे.

१) एप्रिलमध्ये हाहाकार

१८ मार्चपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांकडून कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला. त्यामुळे १६ ते ३१ मार्च या कालावधीत ७८८ इतकी झाली. तर १ ते १६ एप्रिल या कालावधीत ही संख्या ३५४१ वर पोहोचली. १६ मार्च ते १६ एप्रिल या एक महिन्यात तब्बल ४३२९ इतके नवे रुग्ण वाढले. तर या महिन्यात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे.

२) वाढती रुग्णसंख्या चिंताजनक

जिल्ह्यात १६ एप्रिल अखेर १९४२ इतके रुग्ण सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी १०६४ रुग्ण गृह विलगीकरणात असून उर्वरित जिल्ह्यातील विविध शासकीय, खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील चार कोरोना रुग्णालयात ३५०, सात कोरोना आरोग्य केंद्रात (डी.सी.एच.सी.) ११७, आणि १० कोविड केअर सेंटरमध्ये (सी.सी.सी.) ४११ रुग्ण उपचार घेत आहेत.

३) जम्बो कोविड सेंटर

वाढती संख्या पाहाता आता जिल्ह्यातील रुग्णांसाठी अधिक खाटा निर्माण करणे हे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ५०० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केली. त्यादृष्टीने आता जलद गतीने पावले उचलण्यात येत आहेत.