शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे शैक्षणिक कामकाजही थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. पहिली ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. पहिली ते नववी व अकरावीच्या वर्गाच्या परीक्षा रद्द करून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर गुणांकन देण्याची सूचना केली आहे. अध्यापन बंद असले तरी अशैक्षणिक कामकाज मात्र सुरू होते; परंतु लाॅकडाऊनमुळे सध्या अशैक्षणिक कामकाजही बंद ठेवण्यात आले आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षा मे व जूनमध्ये घेण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. अद्याप त्याबाबतही पुढील सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. पहिली ते चाैथीपर्यंतचे अध्यापन ऑनलाइन सुरू होते. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले होते. नववी व अकरावीच्या परीक्षा सुरू असतानाच शासनाने परीक्षा रद्द करून गुणांकनाच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे ज्या शाळांमध्ये प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात आल्या, त्या शाळांमध्ये पेपर तपासणीचे काम सुरू होते. शिवाय पहिली ते नववी व अकरावीचे गुणांकन शाळा स्तरावर देण्याचे घोषित केल्याने शाळांमधून निकाल/गुणपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. वर्गनिहाय प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करण्यात येणार असून, १ मे पर्यंत निकाल घोषित करण्यात येणार होता; मात्र लाॅकडाऊनमुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही शाळांमध्ये येणे शक्य नाही. त्यामुळे शाळांनी निकाल १ मे नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे घोषित केले असून, पालकांना त्याबाबत सूचना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून दहावी व बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात येण्यापूर्वी शाळा अध्यापनासाठी बंदचे आदेश आल्यानंतर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन अध्यापन सुरू केले आहे. त्यासाठी दररोज शिक्षक शाळेत येत असत. अध्यापनासमवेत गुणपत्रिकेचे काम सुरू होते; मात्र सद्यस्थितीत ऑनलाइन अध्यापन करण्यात येणार असून, गुणपत्रिका तयार करण्याचे कामही शिक्षक घरूनच करणार आहेत. शासनाकडून कडक संचारबंदी शिथिल केल्यानंतरच शिक्षक शाळेत येणार आहेत. त्यामुळे यावर्षीही परीक्षा रद्द झाली असली तरी गुणपत्रके मेच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे; मात्र त्यासाठी शासनाकडून येणाऱ्या आदेशाची शाळांना प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात २५७४ प्राथमिक शाळा, ४५४ माध्यमिक शाळा, १४१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत; मात्र सध्या नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीचे वर्ग तर अकरावीच्या विद्यार्थ्यांना बारावीचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू असले तरी अन्य सर्व वर्गातील विद्यार्थी शासनाच्या पासच्या निर्णयामुळे निर्धास्त झाले आहेत.