शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीत प्रश्नकर्त्यांच्या विषयाची बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:38 IST

रत्नागिरी : जिल्हाधिकारी यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत लोकशाही दिनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासून थातूरमातूर उत्तरे देत आजचा लोकशाही दिन ...

रत्नागिरी : जिल्हाधिकारी यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत लोकशाही दिनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासून थातूरमातूर उत्तरे देत आजचा लोकशाही दिन उरकण्यात आला. नागरिकांनी सादर केलेल्या समस्यांचे निराकरण योग्य त्या संबंधित कार्यालयाकडून न करता तक्रारकर्त्यांच्या निवेदनाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र समविचारी मंचचे बाबा ढोल्ये आणि जनजागृती संघाचे केशव भट यांनी केला.

लोकशाही दिन घेण्यात येणार असल्याची माहिती ऐनवेळी देण्यात आली तरीही जिल्हा प्रशासनाला आपल्या समस्या पूर्वनियोजित कळाव्यात म्हणून जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न ई-मेल द्वारे दाखल करण्यात आले. जनतेच्यावतीने समविचारी प्रमुख बाबा ढोल्ये यांनी रत्नागिरी बसस्थानकाचे रेंगाळलेले बांधकाम आणि ऑक्सिजन, फायर, इलेक्ट्रिकल ऑडिट अहवालाबाबत मागणी केली. जनजागृती संघाचे केशव भट यांनी टिळक आळी, रामनाका, आठवडा बाजार, गोखले नाका येथील पार्किंग व्यवस्था, समविचारी जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर यांनी शहरातील बंद सिग्नल यंत्रणा सुरू करण्याबाबत, संगमेश्वर समविचारी तालुकाध्यक्ष यांनी रत्नागिरी देवरुख व्हाया पांगरी मार्ग रस्त्याच्या दुरवस्थेबाबत,यासह अन्य दोन विषय तर समविचारी युवा कोकण प्रमुख राजाराम गावडे यांनी समाजातील घरगुती महिला कामगारसह किराणा दुकानात काम करणारे घरोघरी माल देणारे यांना प्राधान्याने लसीकरण करावे, युवा प्रमुख नीलेश आखाडे यांनी लसीकरणात ७५ वर्षांवरील व्यक्तींना ताटकळत न ठेवता ऑफलाइन लसीकरण करावे, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी कोव्हिशिल्ड पहिला डोस घेतलेल्या, ज्या नागरिकांची नावे रजिस्टर नाहीत ती करावी. ओमकार फडके यांनी शहरासह ग्रामीण रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात प्रश्न केला. रिफायनरी संदर्भात जनतेच्या मागणीचा रेटा वरिष्ठ पातळीवर का दिला जात नाही, अशी विचारणा प्रमोद खेडेकर यांनी केली. तन्मय पटवर्धन, मयुर नाईक, ॲड. सोनाली जैन, सचिन रायकर, नितिन मोने, विनय देसाई, संदेश मायनाक, प्रवीण नागवेकर,जगदीश अपकारे, आविष्कार नांदगावकर,अमृत गोरे, या समविचारींनी सहभाग घेतला होता.

सर्व तक्रारकर्त्यांनी आगाऊ ईमेल करून हा विषय कोणत्या खात्याशी संबंधित आहे आणि त्या खात्याच्या कोणत्या अधिकाऱ्यांकडून उत्तर अपेक्षित आहे, याचा स्पष्ट उल्लेख असूनही सरसकट संबंधित खात्याकडून उत्तर घेऊन कळविले जाईल, हे ठोकळेबाज उत्तर दिले जात होते. तसेच नगरपालिका मुख्याधिकारी हजर नसणे ही बाब गंभीर होती. झूम मिटिंगला हजर राहून आपला कॅमेरा बंद ठेवणारे अधिकारी हे संतापजनक होते, अशी माहिती जनजागृती संघाचे केशव भट यांनी दिली.

समविचारी प्रमुख बाबा ढोल्ये यांनी या लोकशाही दिनाबद्दल आपण कोकण आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. सादर केलेल्या निवेदनावर विषय कोणत्या विभागाशी सलग्न आहे, यासह अद्ययावत मसुदा बनविण्यासाठी ॲड.सूरज मोरे यांनी मार्गदर्शन केले.