शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: मोदी यांनी दहशतवादाविरूद्धचे धोरण जगासमोर ठेवले- राजनाथ सिंह
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

शिवसेना नेत्यांच्या भूमिकेत विरोधाभास ?

By admin | Updated: May 26, 2015 00:53 IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प : उलट-सुलट वक्तव्यामुळे प्रकल्पग्रस्तही पडले बुचकाळ्यात...

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेने सातत्याने व ठाम राहात विरोधाची भूमिका घेतली आहे. मात्र, शिवसेनेअंतर्गत काही नेत्यांची याबाबतची भूमिका तळ्यातमळ्यात असल्यासारखी जाहीर होत असून, मूळ भूमिकेशी विरोधाभास निर्माण करणारी ठरत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. जैतापूर प्रकल्प आता महत्त्वाच्या टप्प्यावर असताना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवसेनेला प्रकल्प होणारच, असे स्पष्टपणे सांगितलेले असताना शिवसेनेतच होणाऱ्या उलटसुलट वक्तव्यांनी प्रकल्पग्रस्तही आता बुचकाळ्यात पडल्याचे बोलले जात आहे.शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या प्रकल्पाला जैतापूरवासीयांचा तीव्र विरोध असल्याने शिवसेनेचाही या प्रकल्पाला कडवा विरोध राहील. हा प्रकल्प कोणत्याही स्थितीत होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यातच राज्य विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती तुटली अन भाजपाने जैतापूर प्रकल्पाचा उघड पुरस्कार केला. शिवसेनेनेही विरोध सोडून प्रकल्पाला पाठिंबा द्यावा, असे सुचविले. त्यातून सातत्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये राजकीय ठिणग्या उडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे मंत्री व जिल्ह्याचे सुपुत्र रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नाही, प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे अन्य नेते या प्रकल्पाला आपला प्रखर विरोध असल्याचे जाहीर करीत असताना कदम यांच्या या विधानाने जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेतच विरोधाभास असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. कदम यांच्या वक्तव्यानंतर दोनच दिवसांत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे कडवे विरोधक म्हणून नेहमी पुढे असणारे आमदार राजन साळवी व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पस्थळी हल्लाबोल केला. प्रकल्पस्थळी काम कोठे सुरू आहे, याची माहिती घेऊन आत सुरू असलेले काम बंद पाडले. आतील यंत्रे कंपनीच्या गेटबाहेर काढायला लावली. कंपनीजवळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या एकूणच स्थितीवरून प्रकल्पाबाबत कडवी भूमिका व तळ्यात मळ्यात भूमिका समोर आल्याने हा विरोधाभास संपणार की काही चमत्कार घडणार, याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत. (प्रतिनिधी)