शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेत्यांच्या भूमिकेत विरोधाभास ?

By admin | Updated: May 26, 2015 00:53 IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प : उलट-सुलट वक्तव्यामुळे प्रकल्पग्रस्तही पडले बुचकाळ्यात...

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेने सातत्याने व ठाम राहात विरोधाची भूमिका घेतली आहे. मात्र, शिवसेनेअंतर्गत काही नेत्यांची याबाबतची भूमिका तळ्यातमळ्यात असल्यासारखी जाहीर होत असून, मूळ भूमिकेशी विरोधाभास निर्माण करणारी ठरत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. जैतापूर प्रकल्प आता महत्त्वाच्या टप्प्यावर असताना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवसेनेला प्रकल्प होणारच, असे स्पष्टपणे सांगितलेले असताना शिवसेनेतच होणाऱ्या उलटसुलट वक्तव्यांनी प्रकल्पग्रस्तही आता बुचकाळ्यात पडल्याचे बोलले जात आहे.शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या प्रकल्पाला जैतापूरवासीयांचा तीव्र विरोध असल्याने शिवसेनेचाही या प्रकल्पाला कडवा विरोध राहील. हा प्रकल्प कोणत्याही स्थितीत होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यातच राज्य विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती तुटली अन भाजपाने जैतापूर प्रकल्पाचा उघड पुरस्कार केला. शिवसेनेनेही विरोध सोडून प्रकल्पाला पाठिंबा द्यावा, असे सुचविले. त्यातून सातत्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये राजकीय ठिणग्या उडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे मंत्री व जिल्ह्याचे सुपुत्र रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नाही, प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे अन्य नेते या प्रकल्पाला आपला प्रखर विरोध असल्याचे जाहीर करीत असताना कदम यांच्या या विधानाने जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेतच विरोधाभास असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. कदम यांच्या वक्तव्यानंतर दोनच दिवसांत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे कडवे विरोधक म्हणून नेहमी पुढे असणारे आमदार राजन साळवी व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पस्थळी हल्लाबोल केला. प्रकल्पस्थळी काम कोठे सुरू आहे, याची माहिती घेऊन आत सुरू असलेले काम बंद पाडले. आतील यंत्रे कंपनीच्या गेटबाहेर काढायला लावली. कंपनीजवळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या एकूणच स्थितीवरून प्रकल्पाबाबत कडवी भूमिका व तळ्यात मळ्यात भूमिका समोर आल्याने हा विरोधाभास संपणार की काही चमत्कार घडणार, याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत. (प्रतिनिधी)