शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

कल्टारचा वापर सुरू

By admin | Updated: July 22, 2014 22:48 IST

आंब्याला खत : शेतकऱ्यांनी स्वीकारला पर्याय

रत्नागिरी : आंबापीक लवकर घेण्यासाठी शेतकरी सर्रास कल्टारचा वापर करू लागले आहेत. आॅगस्टच्या मध्यापर्यंत काम सुरू राहणार आहे. आंब्याचे हमखास व हंगामापेक्षा लवकर पीक घेण्यासाठी शेतकरी कल्टारचा वापर करीत आहेत. अवेळची थंडी, पाऊस तसेच उच्चत्तम तापमानामुळे पिकावर परिणाम होतो. परिणामी हमखास पीक मिळविण्यासाठी कल्टार पर्याय ठरत आहे. साडेपाच ते सहा हजार रूपये दराने कल्टारची विक्री सुरू आहे. जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा कलम बागांची लागवड करण्यात आली आहे. कल्टारबरोबरच रासायनिक खताचा वापरही शेतकरी करू लागले आहेत. खतामुळे झाडाला पोषक घटक उपलब्ध होतात. शिवाय कल्टारमुळे उत्पादकता वाढते. त्यामुळे कल्टारच्या वापराशिवाय शेतकऱ्यांपुढे आता पर्याय राहिलेला नाही.जूनमध्ये शेतकऱ्यांनी कलमांना खत घालण्यास सुरूवात केली. मात्र, पावसाअभावी शेतकऱ्यांनी खत घालणे थांबवले होते. परंतु आषाढी एकादशीपासून पाऊस सुरू झाल्यामुळे खत व कल्टार घालण्याच्या कामाला वेग आला आहे. अद्याप भातशेती लागवडीचे काम सुरू असल्याने कल्टार व खते घालण्याच्या कामाला मजूरवर्ग उपलब्ध होत नाही. पावसाची उघडीप पाहून शेतकरी कल्टार घालीत असलेले दिसून येत आहेत. पाच ते साडेपाच हजार रूपये लिटर दराने कल्टारची विक्री सुरू आहे. कल्टारसाठी रोख पैसे मोजावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना कल्टार अनुदानावर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)-हमखास व हंगामापेक्षा लवकर पीक घेण्यासाठी शेतकरी कल्टारचा वापर.-अवेळची थंडी, पाऊस तसेच उच्चत्तम तापमानामुळे पिकावर परिणाम.