शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात पावसाची संततधार, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:42 IST

राजापूर : राजापूर शहर आणि तालुका परिसरात रविवारपासून मान्सूनच्या पावासाने चांगलाच जोर धरला आहे. रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर ...

राजापूर : राजापूर शहर आणि तालुका परिसरात रविवारपासून मान्सूनच्या पावासाने चांगलाच जोर धरला आहे. रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर पावसाने संततधार धरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर संततधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदीकिनाऱ्यालगत असलेले व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. रविवारी तालुक्यात १२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर तालुक्यात एकूण ४९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याने १० ते १२ जून या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली हाेती. मात्र, या दोन दिवसांत तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी हाेते. मात्र, रविवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही संततधार पावसाचा तडाखा बसला. राजापूर शहरातील गुजराळी येथील श्रीदेव लक्ष्मी नारायण गणपती देवस्थानाच्या मागील संरक्षण भिंत कोसळली आहे. राजापूर–बुरंबेवाडी रस्त्यावर पाणी आले असून, गोवळ तेलेखन बुरंबेवाडी रस्त्यावरील पन्हळेतर्फ राजापूर येथील मोरी एका बाजूने खचली आहे, तर उन्हाळेमार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोरीवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

आठ-दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनंतर सोमवारी सकाळी राजापूर शहर बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, संततधार पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे अनेकांनी लागलीच काढता पाय घेत घर गाठले. दरम्यान, संततधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे.

शासनाने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस ‘हाय अलर्ट’ घोषित केला आहे. नागरिकांनी या दोन दिवसांच्या काळात कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे, तर वादळी वाऱ्यामुळे पडझड होण्याची शक्यता असल्याने सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.