शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य वादासाठी नाही, संवादासाठी

By admin | Updated: November 30, 2014 00:49 IST

मसापचे जिल्हास्तरीय संमेलन : अध्यक्ष अशोक बागवे यांचे नेमाडे यांना प्रत्युत्तर

गुहागर : साहित्य वादासाठी नाही, तर संवादासाठी आहे. जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत, हे या मातीत जन्मलेल्या केशवसुतांनी सांगितले आहे. अशा संमेलनावर टीका करणे हे दळभद्रीपणाचे लक्षण आहे, अशा खोचक शब्दांत नाव न घेता मराठी साहित्य परिषदेच्या गुहागर येथील संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग’ असे म्हणणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांना चोख उत्तर दिले. आजची पिढी ज्यात रमते ती इन्फर्मेशन म्हणजे फक्त माहिती आहे, ज्ञान नाही, असे सांगतानाच पुस्तके अमर आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.गुहागर पोलीस परेड मैदान येथे उर्विमाला साहित्यनगरीत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागरच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले, गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष जयदेव मोरे, सभापती राजेश बेंडल, तहसीलदार वैशाली पाटील, कवी श्रीराम दुर्गे, इंद्रजित भालेराव, संमेलनाचे कार्याध्यक्ष राजेंद्र आरेकर, मसापच्या प्रतिभा लिमये, पत्रकार संघाचे सत्यवान घाडे उपस्थित होते. विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या आपल्या भाषणात त्यांनी पाच पसायदाने उलगडली. ते म्हणाले की, ज्ञानेश्वरांचे पसायदान आपल्याला माहितीच आहे. दुसरे पसायदान संत तुकाराम महाराजांनी ‘हेची दान देगा देवा’ या अभंगातून मांडले. याच जिल्ह्यात जन्मलेल्या केशवसुतांनी ‘जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत’ या कवितेतून पसायदान मागितले आहे. बा. सी. मर्ढेकर यांनी ‘भंगू दे काठिण्य माझे’ या कवितेतून चौथे पसायदान, तर कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या कवितेतून पाचवे पसायदान मागितले आहे.माहिती व ज्ञानामध्ये फरक आहे. आजची पिढी केवळ माहितीच्या पाठी धावत आहे; पण पुस्तक हे अमर आहे. क्षर होत नाही त्याला अक्षर म्हणतात. या अक्षराचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी साहित्य संमेलने झाली पाहिजेत, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. साहित्य संमेलनाचे उद्घाटन ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते झाले. यावेळी स्मरणिका प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वरंडे व संजय गमरे यांनी केले. सकाळी ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. (प्रतिनिधी)