शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

साहित्य वादासाठी नाही, संवादासाठी

By admin | Updated: November 30, 2014 00:49 IST

मसापचे जिल्हास्तरीय संमेलन : अध्यक्ष अशोक बागवे यांचे नेमाडे यांना प्रत्युत्तर

गुहागर : साहित्य वादासाठी नाही, तर संवादासाठी आहे. जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत, हे या मातीत जन्मलेल्या केशवसुतांनी सांगितले आहे. अशा संमेलनावर टीका करणे हे दळभद्रीपणाचे लक्षण आहे, अशा खोचक शब्दांत नाव न घेता मराठी साहित्य परिषदेच्या गुहागर येथील संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग’ असे म्हणणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांना चोख उत्तर दिले. आजची पिढी ज्यात रमते ती इन्फर्मेशन म्हणजे फक्त माहिती आहे, ज्ञान नाही, असे सांगतानाच पुस्तके अमर आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.गुहागर पोलीस परेड मैदान येथे उर्विमाला साहित्यनगरीत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागरच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले, गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष जयदेव मोरे, सभापती राजेश बेंडल, तहसीलदार वैशाली पाटील, कवी श्रीराम दुर्गे, इंद्रजित भालेराव, संमेलनाचे कार्याध्यक्ष राजेंद्र आरेकर, मसापच्या प्रतिभा लिमये, पत्रकार संघाचे सत्यवान घाडे उपस्थित होते. विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या आपल्या भाषणात त्यांनी पाच पसायदाने उलगडली. ते म्हणाले की, ज्ञानेश्वरांचे पसायदान आपल्याला माहितीच आहे. दुसरे पसायदान संत तुकाराम महाराजांनी ‘हेची दान देगा देवा’ या अभंगातून मांडले. याच जिल्ह्यात जन्मलेल्या केशवसुतांनी ‘जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत’ या कवितेतून पसायदान मागितले आहे. बा. सी. मर्ढेकर यांनी ‘भंगू दे काठिण्य माझे’ या कवितेतून चौथे पसायदान, तर कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या कवितेतून पाचवे पसायदान मागितले आहे.माहिती व ज्ञानामध्ये फरक आहे. आजची पिढी केवळ माहितीच्या पाठी धावत आहे; पण पुस्तक हे अमर आहे. क्षर होत नाही त्याला अक्षर म्हणतात. या अक्षराचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी साहित्य संमेलने झाली पाहिजेत, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. साहित्य संमेलनाचे उद्घाटन ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते झाले. यावेळी स्मरणिका प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वरंडे व संजय गमरे यांनी केले. सकाळी ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. (प्रतिनिधी)