शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

साहित्य वादासाठी नाही, संवादासाठी

By admin | Updated: November 30, 2014 00:49 IST

मसापचे जिल्हास्तरीय संमेलन : अध्यक्ष अशोक बागवे यांचे नेमाडे यांना प्रत्युत्तर

गुहागर : साहित्य वादासाठी नाही, तर संवादासाठी आहे. जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत, हे या मातीत जन्मलेल्या केशवसुतांनी सांगितले आहे. अशा संमेलनावर टीका करणे हे दळभद्रीपणाचे लक्षण आहे, अशा खोचक शब्दांत नाव न घेता मराठी साहित्य परिषदेच्या गुहागर येथील संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग’ असे म्हणणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांना चोख उत्तर दिले. आजची पिढी ज्यात रमते ती इन्फर्मेशन म्हणजे फक्त माहिती आहे, ज्ञान नाही, असे सांगतानाच पुस्तके अमर आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.गुहागर पोलीस परेड मैदान येथे उर्विमाला साहित्यनगरीत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागरच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले, गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष जयदेव मोरे, सभापती राजेश बेंडल, तहसीलदार वैशाली पाटील, कवी श्रीराम दुर्गे, इंद्रजित भालेराव, संमेलनाचे कार्याध्यक्ष राजेंद्र आरेकर, मसापच्या प्रतिभा लिमये, पत्रकार संघाचे सत्यवान घाडे उपस्थित होते. विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या आपल्या भाषणात त्यांनी पाच पसायदाने उलगडली. ते म्हणाले की, ज्ञानेश्वरांचे पसायदान आपल्याला माहितीच आहे. दुसरे पसायदान संत तुकाराम महाराजांनी ‘हेची दान देगा देवा’ या अभंगातून मांडले. याच जिल्ह्यात जन्मलेल्या केशवसुतांनी ‘जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत’ या कवितेतून पसायदान मागितले आहे. बा. सी. मर्ढेकर यांनी ‘भंगू दे काठिण्य माझे’ या कवितेतून चौथे पसायदान, तर कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या कवितेतून पाचवे पसायदान मागितले आहे.माहिती व ज्ञानामध्ये फरक आहे. आजची पिढी केवळ माहितीच्या पाठी धावत आहे; पण पुस्तक हे अमर आहे. क्षर होत नाही त्याला अक्षर म्हणतात. या अक्षराचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी साहित्य संमेलने झाली पाहिजेत, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. साहित्य संमेलनाचे उद्घाटन ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते झाले. यावेळी स्मरणिका प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वरंडे व संजय गमरे यांनी केले. सकाळी ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. (प्रतिनिधी)