शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

नैसर्गिक पध्दतीने शेतीतून संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

मेहरुन नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील चिंचखरी येथील हेमंत फाटक गेली ३९ वर्षे शेती करीत असून ...

मेहरुन नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील चिंचखरी येथील हेमंत फाटक गेली ३९ वर्षे शेती करीत असून गेली दहा वर्षे तरी शंभर टक्के सेंद्रिय पध्दतीने शेती करीत आहेत. सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब फाटक यांनी केला आहे. पावसाळी भातशेती, भातशेतीनंतर कडधान्य व उन्हाळी बागायतीतून उत्पन्न मिळवित आहेत.

पारंपरिक पध्दतीने भातशेती करीत असतानाच सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक पध्दतीने प्रभावित झालेल्या फाटक सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.

गेली पाच वर्षे त्यांनी भाताच्या दहा जातींचे संवर्धन केले आहे. कसदार आणि दर्जेदार तांदळाची ते विक्री करीत आहेत. नैसर्गिक शेती व्यवस्थापनामुळे त्यांनी निर्माण केलेल्या आरोग्यदायी तांदळाला वाढती मागणी आहे.

नैसर्गिक शेती करतानाच एकाच जातीचे भात बियाणे न वापरता वेगवेगळी बियाणे लागवडीसाठी वापरत आहेत. त्यात पारंपरिक भात बियाणांपासून संशोधन केंद्राने विकसित केलेल्या नवीन बियाणांचाही समावेश आहे. इंद्रायणी, वाडाकोलम, घनसाळ, काळं भात, सारथी, खारल (स्थानिक लाल भात), दोडक (लाल भात), रत्नागिरी ७ आणि अशा वाणांचे संवर्धन केले आहे.

दोनशे नारळ, शंभर हापूस व शंभर केशर आंब्याची लागवड केली आहे. केशरची लागवड मात्र त्यांनी घनपध्दतीने केली आहे. कोणतेही रासायनिक खत न वापरता घन जीवामृत, जीवामृत आणि आंबट ताकाचा वापर ते करत आहेत.

वेगवेगळी लागवड

शेती करीत असतानाच पाळेकर यांचा प्रभाव पडल्याने नैसर्गिक शेतीकडे फाटक वळले आहेत. भातामधून मोठे उत्पादन मिळण्याची अपेक्षा न ठेवता आरोग्यदायी तांदूळ पिकविण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली दहा वेगवेगळ्या जातीच्या बियाणांची लागवड यशस्वीपणे सुरू आहे.