शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

नैसर्गिक पध्दतीने शेतीतून संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

मेहरुन नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील चिंचखरी येथील हेमंत फाटक गेली ३९ वर्षे शेती करीत असून ...

मेहरुन नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील चिंचखरी येथील हेमंत फाटक गेली ३९ वर्षे शेती करीत असून गेली दहा वर्षे तरी शंभर टक्के सेंद्रिय पध्दतीने शेती करीत आहेत. सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब फाटक यांनी केला आहे. पावसाळी भातशेती, भातशेतीनंतर कडधान्य व उन्हाळी बागायतीतून उत्पन्न मिळवित आहेत.

पारंपरिक पध्दतीने भातशेती करीत असतानाच सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक पध्दतीने प्रभावित झालेल्या फाटक सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.

गेली पाच वर्षे त्यांनी भाताच्या दहा जातींचे संवर्धन केले आहे. कसदार आणि दर्जेदार तांदळाची ते विक्री करीत आहेत. नैसर्गिक शेती व्यवस्थापनामुळे त्यांनी निर्माण केलेल्या आरोग्यदायी तांदळाला वाढती मागणी आहे.

नैसर्गिक शेती करतानाच एकाच जातीचे भात बियाणे न वापरता वेगवेगळी बियाणे लागवडीसाठी वापरत आहेत. त्यात पारंपरिक भात बियाणांपासून संशोधन केंद्राने विकसित केलेल्या नवीन बियाणांचाही समावेश आहे. इंद्रायणी, वाडाकोलम, घनसाळ, काळं भात, सारथी, खारल (स्थानिक लाल भात), दोडक (लाल भात), रत्नागिरी ७ आणि अशा वाणांचे संवर्धन केले आहे.

दोनशे नारळ, शंभर हापूस व शंभर केशर आंब्याची लागवड केली आहे. केशरची लागवड मात्र त्यांनी घनपध्दतीने केली आहे. कोणतेही रासायनिक खत न वापरता घन जीवामृत, जीवामृत आणि आंबट ताकाचा वापर ते करत आहेत.

वेगवेगळी लागवड

शेती करीत असतानाच पाळेकर यांचा प्रभाव पडल्याने नैसर्गिक शेतीकडे फाटक वळले आहेत. भातामधून मोठे उत्पादन मिळण्याची अपेक्षा न ठेवता आरोग्यदायी तांदूळ पिकविण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली दहा वेगवेगळ्या जातीच्या बियाणांची लागवड यशस्वीपणे सुरू आहे.