शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसला जिल्ह्यात नवसंजीवनीची आशा

By admin | Updated: July 9, 2015 00:00 IST

रत्नागिरी जिल्हा : शासनाविरोधात राणेंच्या नेतृत्त्वाखाली उद्या मोर्चा

रत्नागिरी : राज्य शासन अनेक पातळ्यांवर अपयशी असून, कोकणच्या समस्यांकडेही दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत कॉँग्रेसतर्फे राज्यभरात येत्या ९ व १० जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १० जुलै रोजी हा मोर्चा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली काढला जाणार आहे. प्रदेशाध्यक्षांचेच तसे निर्देश असल्याने या मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातून कॉँग्रेसला जिल्ह्यात नवसंजिवनी मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. वर्षभरापूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला दारूण पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी कोकणातही तीच स्थिती होती. त्यानंतरच्या जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत व जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही कॉँग्रेसची पीछेहाट झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील कॉँगे्रसची दीर्घकालीन सत्ता वर्षापूर्वी संपुष्टात आल्यानंतर भाजपप्रणीत सरकाविरोधात वातावरण इतक्या लवकर निर्माण होईल, असे कॉँग्रेसलाही वाटले नव्हते. फडणवीस सरकारच्या कारभाराचे शांतपणे निरीक्षण करणाऱ्या कॉँग्रेसला ही संधी चालून आली आहे. कॉँग्रेसच्याच योजना पुढे चालवणाऱ्या या सरकारने नवीन काय केले, घोटाळेच बाहेर येत आहेत, लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे आता याच मुद्द्यांवरून शासनाची कोंडी करण्यासाठी व जनतेमध्ये आपले स्थान पुन्हा भक्कम करण्यासाठी या मोर्चाचा उपयोग होणार असल्याची आशा कॉँग्रेसला वाटते आहे. त्यामुळेच प्रदेशचे जिल्हा प्रभारी शिंदे यांनी रत्नागिरीतील कॉँग्रेसच्या जिल्हा बैठकीत हीच आशा कार्यकर्त्यांमध्ये जागवली आहे. मरगळ झटकून कामाला लागा, असे निर्देशच त्यांनी दिले आहेत. येत्या शुक्रवारी सकाळी १० वाजता कॉँग्रेस भवनकडून हा मोर्चा नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली निघणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना शासनाच्या अपयशाबाबत व जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचे झालेले नुकसान यासारख्या महत्त्वाच्या समस्यांबाबतचे निवेदन दिले जाणार आहे. या मोर्चाला किती उपस्थिती राहील, याबाबत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी स्पष्ट उत्तर दिले नसले तरी मोर्चाला मोठी गर्दी असेल, शक्तीप्रदर्शन होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)राजकीय फटकेबाजी अन् प्रहाररत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात कॉँग्रेसच्या होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे करणार असल्याने यावेळी होणाऱ्या जाहीर सभांच्या वेळी राणे हे राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार प्रहार करतील, राजकीय फटकेबाजी होईल. त्यामुळे जिल्ह्यातील कॉँग्रेसचे सर्व प्रवाह या मोर्चात सहभागी होतील व त्याचा लाभ संघटनेला होईल, अशी अपेक्षा आता काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.