शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

कॉँग्रेसला जिल्ह्यात नवसंजीवनीची आशा

By admin | Updated: July 9, 2015 00:00 IST

रत्नागिरी जिल्हा : शासनाविरोधात राणेंच्या नेतृत्त्वाखाली उद्या मोर्चा

रत्नागिरी : राज्य शासन अनेक पातळ्यांवर अपयशी असून, कोकणच्या समस्यांकडेही दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत कॉँग्रेसतर्फे राज्यभरात येत्या ९ व १० जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १० जुलै रोजी हा मोर्चा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली काढला जाणार आहे. प्रदेशाध्यक्षांचेच तसे निर्देश असल्याने या मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातून कॉँग्रेसला जिल्ह्यात नवसंजिवनी मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. वर्षभरापूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला दारूण पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी कोकणातही तीच स्थिती होती. त्यानंतरच्या जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत व जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही कॉँग्रेसची पीछेहाट झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील कॉँगे्रसची दीर्घकालीन सत्ता वर्षापूर्वी संपुष्टात आल्यानंतर भाजपप्रणीत सरकाविरोधात वातावरण इतक्या लवकर निर्माण होईल, असे कॉँग्रेसलाही वाटले नव्हते. फडणवीस सरकारच्या कारभाराचे शांतपणे निरीक्षण करणाऱ्या कॉँग्रेसला ही संधी चालून आली आहे. कॉँग्रेसच्याच योजना पुढे चालवणाऱ्या या सरकारने नवीन काय केले, घोटाळेच बाहेर येत आहेत, लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे आता याच मुद्द्यांवरून शासनाची कोंडी करण्यासाठी व जनतेमध्ये आपले स्थान पुन्हा भक्कम करण्यासाठी या मोर्चाचा उपयोग होणार असल्याची आशा कॉँग्रेसला वाटते आहे. त्यामुळेच प्रदेशचे जिल्हा प्रभारी शिंदे यांनी रत्नागिरीतील कॉँग्रेसच्या जिल्हा बैठकीत हीच आशा कार्यकर्त्यांमध्ये जागवली आहे. मरगळ झटकून कामाला लागा, असे निर्देशच त्यांनी दिले आहेत. येत्या शुक्रवारी सकाळी १० वाजता कॉँग्रेस भवनकडून हा मोर्चा नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली निघणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना शासनाच्या अपयशाबाबत व जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचे झालेले नुकसान यासारख्या महत्त्वाच्या समस्यांबाबतचे निवेदन दिले जाणार आहे. या मोर्चाला किती उपस्थिती राहील, याबाबत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी स्पष्ट उत्तर दिले नसले तरी मोर्चाला मोठी गर्दी असेल, शक्तीप्रदर्शन होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)राजकीय फटकेबाजी अन् प्रहाररत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात कॉँग्रेसच्या होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे करणार असल्याने यावेळी होणाऱ्या जाहीर सभांच्या वेळी राणे हे राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार प्रहार करतील, राजकीय फटकेबाजी होईल. त्यामुळे जिल्ह्यातील कॉँग्रेसचे सर्व प्रवाह या मोर्चात सहभागी होतील व त्याचा लाभ संघटनेला होईल, अशी अपेक्षा आता काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.