शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भाेसले यांचे पुण्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:38 IST

खेड : तालुक्यातील कुंभाड येथील मूळ रहिवासी असलेले रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. विजय भोसले यांचे (६२) प्रदीर्घ आजाराने ...

खेड : तालुक्यातील कुंभाड येथील मूळ रहिवासी असलेले रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. विजय भोसले यांचे (६२) प्रदीर्घ आजाराने सोमवारी ५ जून रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांची जिल्ह्यात वेगळी ओळख होती. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

नाबार्डमध्ये नोकरी सांभाळून विजय भोसले यांनी उमेदीच्या काळात नाबार्डच्या युनियनचे सरचिटणीस पद सांभाळले होते. तरुणपणी त्यांच्यावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव पडल्यामुळे पक्षाचा सक्रिय समर्पित कार्यकर्ता म्हणून खेड तालुक्यात काम करण्यास सुरुवात केली. खेड तालुक्यात त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अनेक राजकीय घडामोडींमध्ये आपला मतप्रवाह टिकवून ठेवू शकला. त्यांच्या अभ्यासू व एकनिष्ठ कार्यप्रणालीमुळे पक्षश्रेष्ठींनी रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये त्यांना काम करण्याची संधी दिली. जिल्हा काँग्रेसचे दीर्घकाळ सरचिटणीस पद संभाळल्यानंतर दोन वर्षांपूर्वी ॲड. भोसले यांच्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू ठेवले. जिल्हास्तरावर त्यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदाेलनेही करण्यात आली. कोरोनाच्या काळातही ते सक्रिय हाेते. समाजकारण व राजकारणात काँग्रेस पक्षाचे स्थान अबाधित ठेवण्याचा त्यांनी सर्वोपरी प्रयत्न केला. त्यांच्या निधनाचे वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात धडकताच अनेकांनी शाेक व्यक्त केला.

-------------------------------------------

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. विजय भोसले हे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. राजकारण व समाजकारण यामध्ये संघर्षासोबत सामंजस्य व समाज हिताची जबाबदारी ओळखून योग्य भूमिका पार पडण्याचे कौशल्य असलेला एक थोर राजकीय कार्यकर्ता आपल्यातून दूर गेला आहे.

- वैभव खेडेकर, नगराध्यक्ष, खेड

--------------------------

विजय भोसले यांच्या निधनाने आम्हाला धक्का बसला आहे. गेली काही वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरत असताना ॲड. विजय भोसले यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी आपले मोठे योगदान दिले आहे. सध्या जिल्हाध्यक्षपद भूषवित असताना काँग्रेस पक्ष मजबूत होण्याच्या दृष्टीने त्यांचे सातत्याने प्रयत्न होते. त्यांच्या निधनाने रत्नागिरी जिल्ह्याच्या काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रशांत यादव, तालुकाध्यक्ष, चिपळूण