शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गणपत कदमांच्या पक्षत्यागाने काँग्रेस डळमळीत

By admin | Updated: August 28, 2014 22:24 IST

राजापूर तालुका : नौकेला आता नावाड्याची प्रतीक्षा...

राजापूर : माजी मंत्री भाई हातणकर यांच्यानंतर राजापूर तालुका काँग्रेसची जबाबदारी सांभाळणारे माजी आमदार गणपत कदम यांनी काँग्रेसचा त्याग करून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची डळमळीत झालेली नौका आता कोण सावरणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.नऊ वर्षांपूर्वी शिवसेनेचा त्याग करुन नारायण राणेंसमवेत काँग्रेसमध्ये दाखल झालेले सेनेचे तत्कालीन आमदार गणपत कदम यांनी नंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन २००९ साली काँग्रेसमधून पोटनिवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी विजयही संपादन केला होता. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास राजापूर तालुका सेनेचा बालेकिल्ला होता. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आणि नगर परिषदांसहीत ग्रामपंचायतीवर सेनेचेच वर्चस्व होते. मधल्या एक दशकाच्या कालखंडात पंचायत समितीसह जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा एकही सदस्य नव्हता. गणपत कदमांसमवेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रत्येकी तीन सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजापूर नगर परिषदेमधील शिवसेनेचे पाच आणि चार अपक्षांनी त्यावेळी काँग्रेस प्रवेश केल्याने सेनेच्या हातातील सत्ता उलथून नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आली होती. कदम यांनी सत्ताधारी काँग्रेसचा आमदार म्हणून चार वर्षे प्रतिनिधीत्व केले.मात्र, पक्षांतर्गत त्यांची परवड होत होती. ज्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस प्रवेश केला, त्या नारायण राणेंचीच पक्षात घुसमटत होतेय म्हटल्यावर आपले काय, असा विचार करत कदम यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे आता काँग्रेसचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.यापूर्वी माजी मंत्री ल. रं. हातणकर यांनी राजापूर तालुका काँग्रेसची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. गणपत कदमांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ती आपोआप कदमांच्या खांद्यावर येवून पडली. नऊ वर्षांच्या कालखंडात स्वत: कदम यांनी पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र, जुना-नवा वाद इथेही सुरु राहिला आणि त्यांना डावलले गेले. त्यातून निर्माण झालेल्या नाराजीतून कदमांनी पक्षत्याग केला आहे. त्यामुळे शिवसैनिकांत उत्साह पसरला असताना तालुका काँग्रेसला मात्र तो जोरदार धक्का मानला जात आहे. त्यामुळे आधीच बाळसं घेणारी काँग्रेसी नौका नावाड्याच्या शोधात आहे.विधान परिषद सदस्य हुस्नबानू खलिफे, प्रदेश प्रवक्ते हरिश रोग्ये, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर आदी मंडळींपैकी तालुका काँग्रेसचा अस्थिर झालेला डोलारा सांभाळण्याची जबाबदारी कोण पार पाडतो. त्यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी)