शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

गणपत कदमांच्या पक्षत्यागाने काँग्रेस डळमळीत

By admin | Updated: August 28, 2014 22:24 IST

राजापूर तालुका : नौकेला आता नावाड्याची प्रतीक्षा...

राजापूर : माजी मंत्री भाई हातणकर यांच्यानंतर राजापूर तालुका काँग्रेसची जबाबदारी सांभाळणारे माजी आमदार गणपत कदम यांनी काँग्रेसचा त्याग करून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची डळमळीत झालेली नौका आता कोण सावरणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.नऊ वर्षांपूर्वी शिवसेनेचा त्याग करुन नारायण राणेंसमवेत काँग्रेसमध्ये दाखल झालेले सेनेचे तत्कालीन आमदार गणपत कदम यांनी नंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन २००९ साली काँग्रेसमधून पोटनिवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी विजयही संपादन केला होता. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास राजापूर तालुका सेनेचा बालेकिल्ला होता. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आणि नगर परिषदांसहीत ग्रामपंचायतीवर सेनेचेच वर्चस्व होते. मधल्या एक दशकाच्या कालखंडात पंचायत समितीसह जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा एकही सदस्य नव्हता. गणपत कदमांसमवेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रत्येकी तीन सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजापूर नगर परिषदेमधील शिवसेनेचे पाच आणि चार अपक्षांनी त्यावेळी काँग्रेस प्रवेश केल्याने सेनेच्या हातातील सत्ता उलथून नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आली होती. कदम यांनी सत्ताधारी काँग्रेसचा आमदार म्हणून चार वर्षे प्रतिनिधीत्व केले.मात्र, पक्षांतर्गत त्यांची परवड होत होती. ज्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस प्रवेश केला, त्या नारायण राणेंचीच पक्षात घुसमटत होतेय म्हटल्यावर आपले काय, असा विचार करत कदम यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे आता काँग्रेसचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.यापूर्वी माजी मंत्री ल. रं. हातणकर यांनी राजापूर तालुका काँग्रेसची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. गणपत कदमांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ती आपोआप कदमांच्या खांद्यावर येवून पडली. नऊ वर्षांच्या कालखंडात स्वत: कदम यांनी पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र, जुना-नवा वाद इथेही सुरु राहिला आणि त्यांना डावलले गेले. त्यातून निर्माण झालेल्या नाराजीतून कदमांनी पक्षत्याग केला आहे. त्यामुळे शिवसैनिकांत उत्साह पसरला असताना तालुका काँग्रेसला मात्र तो जोरदार धक्का मानला जात आहे. त्यामुळे आधीच बाळसं घेणारी काँग्रेसी नौका नावाड्याच्या शोधात आहे.विधान परिषद सदस्य हुस्नबानू खलिफे, प्रदेश प्रवक्ते हरिश रोग्ये, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर आदी मंडळींपैकी तालुका काँग्रेसचा अस्थिर झालेला डोलारा सांभाळण्याची जबाबदारी कोण पार पाडतो. त्यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी)