शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत येणार, आधीच निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
2
"माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
3
मराठा आंदोलन: सुट्टी असूनही मुंबई हायकोर्ट उघडले; जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी
4
मराठा आंदोलन: शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आझाद मैदानात, घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले... 
5
चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध
6
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुरुच राहणार; इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
7
सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी; लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसले आंदोलक
8
लेडी कंडक्टरला तब्बल ६१५९ कॉल, ३१५ मेसेज; ‘तो’ म्हणाला, ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर…'
9
ओलाचा शेअर रॉकेट बनला, ३० दिवसांत ४७% परतावा दिला; पाडला पैशांचा पाऊस; कारण काय?
10
"रशिया-भारत खांद्याला खांदा लावून प्रगती करतायत..."; PM मोदी आणि पुतिन यांच्यात दीर्घ चर्चा
11
७३ हजार सॅलरी असणाऱ्या पत्नीने पतीकडे मागितली पोटगी; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल
12
Women's World Cup 2025 Prize Money : महिला क्रिकेटला 'अच्छे दिन'; पुरुषांपेक्षाही अधिक बक्षीस
13
ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातूनही ओला इलेक्ट्रिकची उसळी; शेअरचा भाव ४७ टक्के वाढला; 'हा' निर्णय ठरला गेमचेंजर
14
सगळ्यांसमोर गळाभेट, एकाच गाडीतून प्रवास अन् हास्याचा खळखळाट! पुतिन-मोदींची मैत्री पाहून ट्रम्प यांचं टेन्शन वाढणार
15
Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका
16
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट! पास की नापास, काय आला निकाल? संघात स्थान मिळणार?
17
'पवित्र रिश्ता'मधली माझी पहिली मैत्रीण..., प्रियाच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावुक
18
सरकारी निर्णयाचा फटका! 'ही' कंपनी ६० कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता; CEO म्हणाले दुसरा पर्याय नाही
19
"मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे आम्ही सकारात्मकपणे बघतोय, पण..."; फडणवीसांनी सांगितला नेमका पेच!
20
मानसिक आजारी आईने २ मुलांना ३ वर्षे घरात कोंडले, त्यांनी सूर्यप्रकाशही पाहिला नाही

गणपत कदमांच्या पक्षत्यागाने काँग्रेस डळमळीत

By admin | Updated: August 28, 2014 22:24 IST

राजापूर तालुका : नौकेला आता नावाड्याची प्रतीक्षा...

राजापूर : माजी मंत्री भाई हातणकर यांच्यानंतर राजापूर तालुका काँग्रेसची जबाबदारी सांभाळणारे माजी आमदार गणपत कदम यांनी काँग्रेसचा त्याग करून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची डळमळीत झालेली नौका आता कोण सावरणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.नऊ वर्षांपूर्वी शिवसेनेचा त्याग करुन नारायण राणेंसमवेत काँग्रेसमध्ये दाखल झालेले सेनेचे तत्कालीन आमदार गणपत कदम यांनी नंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन २००९ साली काँग्रेसमधून पोटनिवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी विजयही संपादन केला होता. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास राजापूर तालुका सेनेचा बालेकिल्ला होता. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आणि नगर परिषदांसहीत ग्रामपंचायतीवर सेनेचेच वर्चस्व होते. मधल्या एक दशकाच्या कालखंडात पंचायत समितीसह जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा एकही सदस्य नव्हता. गणपत कदमांसमवेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रत्येकी तीन सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजापूर नगर परिषदेमधील शिवसेनेचे पाच आणि चार अपक्षांनी त्यावेळी काँग्रेस प्रवेश केल्याने सेनेच्या हातातील सत्ता उलथून नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आली होती. कदम यांनी सत्ताधारी काँग्रेसचा आमदार म्हणून चार वर्षे प्रतिनिधीत्व केले.मात्र, पक्षांतर्गत त्यांची परवड होत होती. ज्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस प्रवेश केला, त्या नारायण राणेंचीच पक्षात घुसमटत होतेय म्हटल्यावर आपले काय, असा विचार करत कदम यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे आता काँग्रेसचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.यापूर्वी माजी मंत्री ल. रं. हातणकर यांनी राजापूर तालुका काँग्रेसची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. गणपत कदमांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ती आपोआप कदमांच्या खांद्यावर येवून पडली. नऊ वर्षांच्या कालखंडात स्वत: कदम यांनी पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र, जुना-नवा वाद इथेही सुरु राहिला आणि त्यांना डावलले गेले. त्यातून निर्माण झालेल्या नाराजीतून कदमांनी पक्षत्याग केला आहे. त्यामुळे शिवसैनिकांत उत्साह पसरला असताना तालुका काँग्रेसला मात्र तो जोरदार धक्का मानला जात आहे. त्यामुळे आधीच बाळसं घेणारी काँग्रेसी नौका नावाड्याच्या शोधात आहे.विधान परिषद सदस्य हुस्नबानू खलिफे, प्रदेश प्रवक्ते हरिश रोग्ये, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर आदी मंडळींपैकी तालुका काँग्रेसचा अस्थिर झालेला डोलारा सांभाळण्याची जबाबदारी कोण पार पाडतो. त्यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी)