शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

लसीकरणाचा गोंधळ कायम; नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांची होतेय फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

रत्नागिरी : लसच्या अपुऱ्या साठ्याबरोबरच कमी येणाऱ्या पुरवठ्यामुळे त्याचे नियोजन करताना जिल्हा प्रशासनाची होणारी तारांबळ यामुळेे गेल्या काही दिवसांपासून ...

रत्नागिरी : लसच्या अपुऱ्या साठ्याबरोबरच कमी येणाऱ्या पुरवठ्यामुळे त्याचे नियोजन करताना जिल्हा प्रशासनाची होणारी तारांबळ यामुळेे गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाचा गोधळ कायम आहे. त्यातच आता १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू झाल्याने या गोंधळात अधिकच भर पडली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यात सर्वत्रच लसीच तुटवडा जाणवू लागला आहे. १५ जानेवारीपासून लसीकरण प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्यानंतर कोमाॅर्बिड व्यक्तींना लसीकरण सुरू झाले. मात्र, काही दिवसातच ६० वर्षांवरील व्यक्तींना आणि पाठोपाठ सरसकट ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची घोषणा करण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव याच कालावधीत वाढल्याने त्यानंतर मात्र लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली. लसीचा पुरवठा कमी आणि लस घेणाऱ्यांची संख्या जास्त यामुळे लस आल्यानंतर ती किती जणांना द्यायची, याबाबत आरोग्य यंत्रणेचा गोंधळ उडाला आहे. आधीच लस अपुरी, त्यातच आता २ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनाही सरसकट लस देण्यास सुुरुवात झाली आहे.

याआधी जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक लसीकरण केंद्रे होती. आता ती कमी करून ती आता केवळ १४ करण्यात आली आहेत. दिवसाला केवळ १०० ते २०० इतपत डोस या केंद्रांमध्ये वितरीत होत आहेत. त्यामुळे नागरिक ते मिळविण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून केंद्रांवर गर्दी करत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या नियोजनाचा पूर्णत: बाेजवारा उडाला आहे. त्याचबरोबर सकाळपासून डोससाठी येणाऱ्या नागरिकांचीही रखडपट्टी होत असल्याने अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेतील घोळ कायम आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी योग्य नियोजन करूनच ही मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

चौकट

उपलब्धतेनुसार टोकन

प्रत्येक लसीकरण केंद्रावर प्रत्येक दिवसासाठी जेवढे डोस उपलब्ध होतील, त्याची माहिती बाहेर फलकावर लावावी. वयाेगटानुसार प्राधान्य क्रम ठरवून टोकनप्रमाणे लस देण्यात यावी.

वयोगटानुसार प्राधान्य द्यावे

मधुमेही, रक्तदाब आदी गंभीर आजार असलेल्या व्यक्ती किंवा ६० वर्षांवरील व्यक्ती यांना प्राधान्यक्रमाने लस मिळावी. त्यानंतर कमी वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात यावी. असं नियोजन केल्यास नागरिक गर्दी करणार नाहीत.

योग्य नियोजन हवेच

रत्नागिरी शहरातील तीन लसीकरण केंद्रात सकाळी ९ ते ३ या वेळेत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी तर त्यानंतर ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण करण्यात आले. मात्र, प्रत्येक केंद्रांवर किती डोस आले आहेत, हे माहीत नसल्याने सर्वच वयोगटातील नागरिकांची सकाळी ७ वाजल्यापासूनच गर्दी झाली. त्यातच जेष्ठ नागरिकांंना भरदुपारी बोलावल्याने अनेकांना उन्हात उभे रहाण्याची वेळ आली. हजारोंची गर्दी आणि लस कमी, यामुळे नागरिकांचा संयम सुटला. अखेर पोलीस कुमक मागवावी लागली. यात ज्येष्ठ नागरिकांना धक्क्काबुक्कीही झाली. एवढे होऊनही काहींना लस मिळालीच नाही. त्यामुळे याबाबत योग्य नियाेजन होणे गरजेचे आहे.

नागरिकांचा संयमही महत्त्वाचा

सध्या कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. सध्या अपुरे मनुष्यबळ असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आहेच. अशातच लस मिळविण्यासाठी लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग न पाळता कोरोनाचा प्रसार वाढवू नये. यासाठी त्यांचाही संयम महत्त्वाचा आहे.

कोटसाठी

रत्नागिरीतील मिस्त्री हायस्कूल येथे १८ ते ४४ आणि ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी मंगळवारी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ठेवला होता. मात्र, सकाळी १८ वरील आणि भरदुपारी ४५ वरील नागरिकांना डोस देण्यात आला. डोस अतिशय कमी होते. मात्र, त्याची कल्पना नागरिकांना नसल्याने या केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून लस घेणारे आणि त्यांच्या नातेवाइकांनी गर्दी केली. मात्र, ज्येष्ठांना उन्हात अनेक तास उभे रहावे लागल्याने त्यांचे हाल झाले. खरतर दोन्ही वयोगटासाठी लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्र ठेवायला हवे होते.

सुखदा सारोळकर, संचालिका लर्निंग पाॅईंट, रत्नागिरी