शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

लसीकरणाचा गोंधळ कायम; नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांची होतेय फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

रत्नागिरी : लसच्या अपुऱ्या साठ्याबरोबरच कमी येणाऱ्या पुरवठ्यामुळे त्याचे नियोजन करताना जिल्हा प्रशासनाची होणारी तारांबळ यामुळेे गेल्या काही दिवसांपासून ...

रत्नागिरी : लसच्या अपुऱ्या साठ्याबरोबरच कमी येणाऱ्या पुरवठ्यामुळे त्याचे नियोजन करताना जिल्हा प्रशासनाची होणारी तारांबळ यामुळेे गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाचा गोधळ कायम आहे. त्यातच आता १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू झाल्याने या गोंधळात अधिकच भर पडली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यात सर्वत्रच लसीच तुटवडा जाणवू लागला आहे. १५ जानेवारीपासून लसीकरण प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्यानंतर कोमाॅर्बिड व्यक्तींना लसीकरण सुरू झाले. मात्र, काही दिवसातच ६० वर्षांवरील व्यक्तींना आणि पाठोपाठ सरसकट ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची घोषणा करण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव याच कालावधीत वाढल्याने त्यानंतर मात्र लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली. लसीचा पुरवठा कमी आणि लस घेणाऱ्यांची संख्या जास्त यामुळे लस आल्यानंतर ती किती जणांना द्यायची, याबाबत आरोग्य यंत्रणेचा गोंधळ उडाला आहे. आधीच लस अपुरी, त्यातच आता २ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनाही सरसकट लस देण्यास सुुरुवात झाली आहे.

याआधी जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक लसीकरण केंद्रे होती. आता ती कमी करून ती आता केवळ १४ करण्यात आली आहेत. दिवसाला केवळ १०० ते २०० इतपत डोस या केंद्रांमध्ये वितरीत होत आहेत. त्यामुळे नागरिक ते मिळविण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून केंद्रांवर गर्दी करत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या नियोजनाचा पूर्णत: बाेजवारा उडाला आहे. त्याचबरोबर सकाळपासून डोससाठी येणाऱ्या नागरिकांचीही रखडपट्टी होत असल्याने अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेतील घोळ कायम आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी योग्य नियोजन करूनच ही मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

चौकट

उपलब्धतेनुसार टोकन

प्रत्येक लसीकरण केंद्रावर प्रत्येक दिवसासाठी जेवढे डोस उपलब्ध होतील, त्याची माहिती बाहेर फलकावर लावावी. वयाेगटानुसार प्राधान्य क्रम ठरवून टोकनप्रमाणे लस देण्यात यावी.

वयोगटानुसार प्राधान्य द्यावे

मधुमेही, रक्तदाब आदी गंभीर आजार असलेल्या व्यक्ती किंवा ६० वर्षांवरील व्यक्ती यांना प्राधान्यक्रमाने लस मिळावी. त्यानंतर कमी वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात यावी. असं नियोजन केल्यास नागरिक गर्दी करणार नाहीत.

योग्य नियोजन हवेच

रत्नागिरी शहरातील तीन लसीकरण केंद्रात सकाळी ९ ते ३ या वेळेत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी तर त्यानंतर ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण करण्यात आले. मात्र, प्रत्येक केंद्रांवर किती डोस आले आहेत, हे माहीत नसल्याने सर्वच वयोगटातील नागरिकांची सकाळी ७ वाजल्यापासूनच गर्दी झाली. त्यातच जेष्ठ नागरिकांंना भरदुपारी बोलावल्याने अनेकांना उन्हात उभे रहाण्याची वेळ आली. हजारोंची गर्दी आणि लस कमी, यामुळे नागरिकांचा संयम सुटला. अखेर पोलीस कुमक मागवावी लागली. यात ज्येष्ठ नागरिकांना धक्क्काबुक्कीही झाली. एवढे होऊनही काहींना लस मिळालीच नाही. त्यामुळे याबाबत योग्य नियाेजन होणे गरजेचे आहे.

नागरिकांचा संयमही महत्त्वाचा

सध्या कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. सध्या अपुरे मनुष्यबळ असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आहेच. अशातच लस मिळविण्यासाठी लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग न पाळता कोरोनाचा प्रसार वाढवू नये. यासाठी त्यांचाही संयम महत्त्वाचा आहे.

कोटसाठी

रत्नागिरीतील मिस्त्री हायस्कूल येथे १८ ते ४४ आणि ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी मंगळवारी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ठेवला होता. मात्र, सकाळी १८ वरील आणि भरदुपारी ४५ वरील नागरिकांना डोस देण्यात आला. डोस अतिशय कमी होते. मात्र, त्याची कल्पना नागरिकांना नसल्याने या केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून लस घेणारे आणि त्यांच्या नातेवाइकांनी गर्दी केली. मात्र, ज्येष्ठांना उन्हात अनेक तास उभे रहावे लागल्याने त्यांचे हाल झाले. खरतर दोन्ही वयोगटासाठी लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्र ठेवायला हवे होते.

सुखदा सारोळकर, संचालिका लर्निंग पाॅईंट, रत्नागिरी