शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

जनमानसात संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

एकीकडे सरकार कोरोनाशी लढा देत असतानाच नियमातील शिथिलता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करत आहे. वास्तविक कोरोनामुळे आर्थिक व्यवस्था डबघाईला ...

एकीकडे सरकार कोरोनाशी लढा देत असतानाच नियमातील शिथिलता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करत आहे. वास्तविक कोरोनामुळे आर्थिक व्यवस्था डबघाईला आली आहे. खासगी आस्थापनांसह शासकीय आस्थापनांना याचा फटका बसला आहे. अनेक उद्योग, व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. कित्येकांचे रोजगार बुडाले आहेत. एकूणच आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वच व्यवस्था कोरोना संपण्याची वाट पाहात आहेत. गतवर्षी कोरोनामुळे लाॅकडाऊन झाल्यानंतर आलेले मुंबईकर गणपतीनंतरच मुंबईकडे गेले होते. त्यामुळे गतवर्षी जादा गाड्या फारच कमी आल्या होत्या. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एस. टी., रेल्वेचे आरक्षण करुन येणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा आनंद भाविकांना घेता यावा, यासाठी शासनाने योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. जेणेकरून भाविकांनाही त्रास होणार नाही व सण आनंदाने साजरा करून ते पुन्हा मुंबईकडे परततील. शिवाय तिसरी लाट रोखता यावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येत असतानाच राजकीय नेत्यांनी त्याला पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. यासंबंधीच्या निर्णयातील वारंवार बदलामुळे भाविकांमध्ये नाराजी तर आहेच शिवाय नेमके काय करावे, याचा गोंधळ अधिक आहे. रेल्वेच्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करण्याची नियमावली प्रशासनाने जारी केली आहे. मात्र, कोकण रेल्वे प्रवासी संघाकडून नियम रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, रेल्वे रोकोचा इशाराही दिला आहे.

गतवर्षी तर सात दिवसांच्या विलगीकरणाची सक्ती असल्याने मुंबईकडून येणाऱ्या सर्व गाड्या कोरोना तपासणी केंद्रावर नेण्यात येत होत्या. मात्र, यावर्षी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असताना नियमातील शिथिलता नेमके काय साधणार आहे. महामार्ग असो वा ग्रामीण भागात आलेल्या मुंबईकरांची नोंद केली जाणार आहे. मात्र, नोंद शंभर टक्के होईल का, याबाबत शंका आहे. नोंद करणे सोपे नाही. वास्तविक सणासुदीच्या काळात ग्राम कृती दलांची जबाबदारी वाढली आहे.

शासनाने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांना नाराज न करता सर्वांच्या आरोग्य हिताबाबत योग्य निर्णय लागू करणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांनीही प्रशासन घेत असलेल्या निर्णयाला पाठिंबा देणे आवश्यक आहे. भाविकांचे व जनतेेने आरोग्य सुरक्षेसाठी शासनाच्या निर्णयाचे पालन करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास कोरोना संक्रमण संपण्यास मदत होणार आहे.