शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

जनमानसात संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

एकीकडे सरकार कोरोनाशी लढा देत असतानाच नियमातील शिथिलता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करत आहे. वास्तविक कोरोनामुळे आर्थिक व्यवस्था डबघाईला ...

एकीकडे सरकार कोरोनाशी लढा देत असतानाच नियमातील शिथिलता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करत आहे. वास्तविक कोरोनामुळे आर्थिक व्यवस्था डबघाईला आली आहे. खासगी आस्थापनांसह शासकीय आस्थापनांना याचा फटका बसला आहे. अनेक उद्योग, व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. कित्येकांचे रोजगार बुडाले आहेत. एकूणच आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वच व्यवस्था कोरोना संपण्याची वाट पाहात आहेत. गतवर्षी कोरोनामुळे लाॅकडाऊन झाल्यानंतर आलेले मुंबईकर गणपतीनंतरच मुंबईकडे गेले होते. त्यामुळे गतवर्षी जादा गाड्या फारच कमी आल्या होत्या. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एस. टी., रेल्वेचे आरक्षण करुन येणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा आनंद भाविकांना घेता यावा, यासाठी शासनाने योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. जेणेकरून भाविकांनाही त्रास होणार नाही व सण आनंदाने साजरा करून ते पुन्हा मुंबईकडे परततील. शिवाय तिसरी लाट रोखता यावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येत असतानाच राजकीय नेत्यांनी त्याला पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. यासंबंधीच्या निर्णयातील वारंवार बदलामुळे भाविकांमध्ये नाराजी तर आहेच शिवाय नेमके काय करावे, याचा गोंधळ अधिक आहे. रेल्वेच्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करण्याची नियमावली प्रशासनाने जारी केली आहे. मात्र, कोकण रेल्वे प्रवासी संघाकडून नियम रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, रेल्वे रोकोचा इशाराही दिला आहे.

गतवर्षी तर सात दिवसांच्या विलगीकरणाची सक्ती असल्याने मुंबईकडून येणाऱ्या सर्व गाड्या कोरोना तपासणी केंद्रावर नेण्यात येत होत्या. मात्र, यावर्षी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असताना नियमातील शिथिलता नेमके काय साधणार आहे. महामार्ग असो वा ग्रामीण भागात आलेल्या मुंबईकरांची नोंद केली जाणार आहे. मात्र, नोंद शंभर टक्के होईल का, याबाबत शंका आहे. नोंद करणे सोपे नाही. वास्तविक सणासुदीच्या काळात ग्राम कृती दलांची जबाबदारी वाढली आहे.

शासनाने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांना नाराज न करता सर्वांच्या आरोग्य हिताबाबत योग्य निर्णय लागू करणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांनीही प्रशासन घेत असलेल्या निर्णयाला पाठिंबा देणे आवश्यक आहे. भाविकांचे व जनतेेने आरोग्य सुरक्षेसाठी शासनाच्या निर्णयाचे पालन करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास कोरोना संक्रमण संपण्यास मदत होणार आहे.