शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

जनमानसात संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

एकीकडे सरकार कोरोनाशी लढा देत असतानाच नियमातील शिथिलता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करत आहे. वास्तविक कोरोनामुळे आर्थिक व्यवस्था डबघाईला ...

एकीकडे सरकार कोरोनाशी लढा देत असतानाच नियमातील शिथिलता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करत आहे. वास्तविक कोरोनामुळे आर्थिक व्यवस्था डबघाईला आली आहे. खासगी आस्थापनांसह शासकीय आस्थापनांना याचा फटका बसला आहे. अनेक उद्योग, व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. कित्येकांचे रोजगार बुडाले आहेत. एकूणच आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वच व्यवस्था कोरोना संपण्याची वाट पाहात आहेत. गतवर्षी कोरोनामुळे लाॅकडाऊन झाल्यानंतर आलेले मुंबईकर गणपतीनंतरच मुंबईकडे गेले होते. त्यामुळे गतवर्षी जादा गाड्या फारच कमी आल्या होत्या. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एस. टी., रेल्वेचे आरक्षण करुन येणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा आनंद भाविकांना घेता यावा, यासाठी शासनाने योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. जेणेकरून भाविकांनाही त्रास होणार नाही व सण आनंदाने साजरा करून ते पुन्हा मुंबईकडे परततील. शिवाय तिसरी लाट रोखता यावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येत असतानाच राजकीय नेत्यांनी त्याला पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. यासंबंधीच्या निर्णयातील वारंवार बदलामुळे भाविकांमध्ये नाराजी तर आहेच शिवाय नेमके काय करावे, याचा गोंधळ अधिक आहे. रेल्वेच्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करण्याची नियमावली प्रशासनाने जारी केली आहे. मात्र, कोकण रेल्वे प्रवासी संघाकडून नियम रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, रेल्वे रोकोचा इशाराही दिला आहे.

गतवर्षी तर सात दिवसांच्या विलगीकरणाची सक्ती असल्याने मुंबईकडून येणाऱ्या सर्व गाड्या कोरोना तपासणी केंद्रावर नेण्यात येत होत्या. मात्र, यावर्षी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असताना नियमातील शिथिलता नेमके काय साधणार आहे. महामार्ग असो वा ग्रामीण भागात आलेल्या मुंबईकरांची नोंद केली जाणार आहे. मात्र, नोंद शंभर टक्के होईल का, याबाबत शंका आहे. नोंद करणे सोपे नाही. वास्तविक सणासुदीच्या काळात ग्राम कृती दलांची जबाबदारी वाढली आहे.

शासनाने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांना नाराज न करता सर्वांच्या आरोग्य हिताबाबत योग्य निर्णय लागू करणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांनीही प्रशासन घेत असलेल्या निर्णयाला पाठिंबा देणे आवश्यक आहे. भाविकांचे व जनतेेने आरोग्य सुरक्षेसाठी शासनाच्या निर्णयाचे पालन करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास कोरोना संक्रमण संपण्यास मदत होणार आहे.