शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या पोस्टमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:33 IST

रत्नागिरी : कोरोनाचे संकट वाढत असतानाच त्याचे गांभीर्य नसलेल्यांकडून सोशल मीडियावर उलटसुलट अफवांना पीक आले आहे. लाॅकडाऊन काळातील प्रशासनाच्या ...

रत्नागिरी : कोरोनाचे संकट वाढत असतानाच त्याचे गांभीर्य नसलेल्यांकडून सोशल मीडियावर उलटसुलट अफवांना पीक आले आहे. लाॅकडाऊन काळातील प्रशासनाच्या नियमावलीबाबतही व्हाॅटस ॲपवर पसरविल्या जाणाऱ्या खोट्या पोस्टमुळे व्यापारी आणि नागरिक यांच्यात संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे.

प्रशासनाकडून लाॅकडाऊन काळात काढल्या जाणाऱ्या नियमावलीबाबत सातत्याने माहिती दिली जात आहे. ही देताना अधिकृत अधिकाऱ्याच्या सहीनिशी ही नियमावली प्रसिद्ध केली जात आहे. मात्र काही वेळा त्या नियमावलीशी साधर्म्य दाखविणारे मुद्दे टाकून नागरिक तसेच व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सोमवारीही अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहतील, अशी पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. मात्र, त्यावर कुठल्याही अधिकाऱ्याचे नाव व शिक्का नव्हता. मात्र, ही पोस्ट सर्वत्र फिरत असल्याने व्यापाऱ्यांनीही ही पोस्ट खरी आहे की काय, याविषयी शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांना हे खरे असल्याचे वाटल्याने हायसे वाटले.

मात्र, याबाबत स्थानिक प्रशासनाकडे विचारणा करता ही पोस्ट अफवा असल्याचे सांगण्यात आले.

सध्या अशा अनेक खोट्या पोस्ट व्हायरल करण्याचा प्रयत्न केेला जात असल्याने सद्य परिस्थितीत गोंधळलेल्या नागरिकांच्या मनातील गोंधळ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अशा लोकांवरही कडक निर्बंध आणावेत व अशा खोट्या अफवा पसरविण्यापासून रोखावे, अशी मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

कोट

नागरिकांनी कुठल्याही खोट्या पोस्टवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून नियमावली काढली जाते, ती अधिकृत सही तसेच शिक्क्यासह असते. त्यामुळे नागरिकांनी याबाबत शहानिशा करूनच त्यावर विश्वास ठेवावा.

- शशिकांत जाधव, तहसीलदार, रत्नागिरी