शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रांच्या ४४ रुग्णवाहिकांची स्थिती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:29 IST

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या ६८ पैकी ४४ रुग्णवाहिकांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ...

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या ६८ पैकी ४४ रुग्णवाहिकांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्वत:च्या रुग्णवाहिका घ्याव्यात, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री परब यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, समाजकल्याण सभापती कदम व अन्य उपस्थित होते. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष जाधव हेही ऑनलाईन सहभागी झाले होते.

यावेळी कोरोना स्थितीचा आढावा घेतानाच एकूण आरोग्याच्या परिस्थितीवरही चर्चा झाली. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांचा प्रश्नही समोर आला. जाधव यांनी ६८ पैकी ४४ रुग्णवाहिकांची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होते. हे रुग्णांच्या जीविताला धोकादायक ठरू शकतात. त्यासाठी नादुरुस्त झालेल्या रुग्णवाहिका बदलणे आवश्यक आहे, असे निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, पालकमंत्र्यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन १५ रुग्णवाहिका जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्याचवेळी राज्याच्या ग्रामविकास विभागाकडूनही काही रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती अध्यक्ष जाधव यांनी पालकमंत्र्यांना दिली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी या रुग्णवाहिका मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार असल्याची पालकमंत्र्यांनी ग्वाही दिली.