शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

कोरोनामुळे मंडप व्यावसायिकांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST

रत्नागिरी : कोरोनाचे पडसाद विविध क्षेत्रावर उमटले आहेत. मंडप व्यवसाय तसेच संलग्न विविध व्यवसायही यामुळे ...

रत्नागिरी : कोरोनाचे पडसाद विविध क्षेत्रावर उमटले आहेत. मंडप व्यवसाय तसेच संलग्न विविध व्यवसायही यामुळे संकटात आले आहेत. कोरोनामुळे विविध गणेशोत्सव मंडळांनी उत्सव रद्द केले आहेत. विविध कार्यक्रमांना मंडळांनी फाटा देत सामाजिक उपक्रमांवर भर दिल्याने मंडप व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

लग्न, स्वागत सोहळे यासह राजकीय नेत्यांच्या सभा, दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम यामुळे मंडप व्यावसायिकांचा व्यवसाय चालतो. या व्यवसायाशी संलग्न भोजन, साऊंड सिस्टीम, फुलांची सजावट, विद्युत रोषणाईकार, बँडवाले या व्यवसायांनाही फटका बसला आहे. लग्नासाठी शासनाने परवानगी देताना काही निर्बंध शिथिल केले आहेत. मंडप व्यावसायिक सतत नवीन सजावटीसाठी आग्रही असल्याने डिसेंबर व मार्चमध्ये त्यांना दोनवेळा खरेदी करावी लागते.

जिल्ह्यात छोटेमोठे अडीच हजार मंडप व्यावसायिक आहेत. जिल्ह्यात सार्वजनिक गणेशमूर्तींची संख्या मोजकीच असल्याने मोजक्या मंडळींना काम मिळते. परंतु, वर्षभर छोटेमोठे काम सर्वांनाच मिळते. गेल्या - दीड वर्षांत कोरोना व निर्बंधामुळे लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे. गणेशोत्सवात मंडप व्यावसायिकांचा बऱ्यापैकी व्यवसाय होतो. परंतु, कोरोनामुळे अनेक मंडळांनी उत्सव रद्द केला आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे काहींनी गणेशमूर्ती आणून धार्मिक कार्यक्रमावरच भर दिला. त्यामुळे मूर्तीसाठी छोटा मंडप टाकण्यात आला, तर काही ठिकाणी कार्यालयांच्या आवारातच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

गणेशोत्सवात व लग्न समारंभात मंडपाला चांगली मागणी असते. मात्र, गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असून, लग्नसोहळेही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत होत आहेत. त्यामुळे कामगारांना काम राहिलेले नसल्याने मंडप व संलग्न व्यवसायातील कामगारांवर संकट ओढावले आहे. संबंधित व्यवसायातील कौशल्यपूर्ण कारागिरांना सोडून चालत नसल्याने व्यावसायिकांना त्यांना वेतन द्यावेच लागत आहे. मात्र, अन्य सहायक कामगारांवर उपासमार ओढावली आहे.

मंडप व्यावसायिकांसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर असते. ते सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी अनेक व्यावसायिकांनी साहित्यासाठी गोदामे भाड्याने घेतली आहेत. गोदामासाठी वीजपुरवठा आवश्यक आहे. व्यवसायाअभावी महावितरणची विजेची बिले तसेच गोदामांचे भाडे भरावेच लागत आहे.

---------------------------

कोरोनामुळे मंडप व संलग्न व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. व्यवसायातील गुंतवणूक अधिक आहे. परंतु, कामच नसल्याने उलाढाल ठप्प झाली आहे. व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार, गोदाम भाडे, विद्युत बिले याचा भुर्दंड सोसावाच लागत आहे. शासनाकडून नियमांमध्ये अजून शिथिलता आणण्याची आवश्यकता आहे.

- ए. एस. सावंत, जिल्हाध्यक्ष, मंडप, लाईट, साऊंड, इव्हेंट आणि कॅटरर्स असोसिएशन, रत्नागिरी.