शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शिक्षकांना संचमान्यतेची चिंता!

By admin | Updated: October 19, 2015 23:51 IST

शासनाचा निर्णय : मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता

सागर पाटील- टेंभ्ये--राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये काम करणारा शिक्षक सध्या मोठ्या प्रमाणात चिंतातूर दिसत आहे. दि. २१ आॅक्टोबर रोजी होणारी संचमान्यता हे चिंतेचे प्रमुख कारण असल्याचे अनेक शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. गेल्या दोन शैक्षणिक वर्षापासून प्रलंबित असणारी संचमान्यता सरल प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे करण्याचे शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. दि. २८ आॅगस्टच्या शासन निर्णयाप्रमाणे संचमान्यता करण्याचे निश्चित झाल्याने शिक्षक मोठ्या संख्येने अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.‘सरल’ प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांची माहिती आॅनलाईन करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रणालीमध्ये भरलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे सन २०१५-१६ची संचमान्यता करण्यात येणार आहे. शाळेचा स्तर व संचमान्यतेचे निकष शासनस्तरावरुन दि. २८ आॅगस्टच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहेत. राज्यामध्ये इयत्ता आठवी ते दहावी या माध्यमिक शाळांचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु, शासनाने आठवीचा वर्ग माध्यमिक शाळेपासून वेगळा केल्याने या वर्गाला अध्यापन करणारा शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. माध्यमिक शाळेचा स्तर केवळ इयत्ता नववी ते दहावीइतकाच निश्चित करण्यात आला आहे. नववी अथवा दहावीच्या तुकडीमध्ये ६० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास जादा शिक्षकाचे एक पद अनुज्ञेय राहणार आहे. केवळ दोन तुकड्या असणाऱ्या शाळेतच तीन शिक्षकांना मान्यता मिळणार आहे. यामध्ये भाषा, गणित - विज्ञान व समाजशास्त्राच्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.दि. २८ आॅगस्टच्या शासन निर्णयातील जाचक अटींमुळे अनेक शिक्षक हवालदिल झाले आहेत. ग्रामीण भागातील छोट्या शाळांवर या निर्णयाचे विपरीत परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षांपासून एखाद्या शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकाला ती शाळा सोडून जावे लागणार असल्याची शक्यता अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारांमुळे शिक्षकाला आपले कुटुंबही स्थलांतरीत करावे लागणार आहे. यामुळे संचमान्यतेची तारीख जाहीर झाल्यापासून शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.शासनाविरोधात संयुक्त आंदोलन : भारत घुले२८ आॅगस्टचा शासननिर्णय रद्द करावा व शिक्षणविरोधी धोरणाविरोधात संस्थाचालक, महामंडळ, मुख्याध्यापक संघ, अध्यापक संघ, शिक्षकेतर संघटना व काही शिक्षक संघटना मिळून संयुक्त आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत घुले यांनी सांगितले.२१ तारखेला होणार राज्यात संचमान्यता.प्रलंबित असणारी संचमान्यता सरल प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे करण्याचे निश्चित.