शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

संगणक परिचालकांची दिवाळी मानधनविना

By admin | Updated: October 26, 2014 23:24 IST

जिल्ह्यातील ६६६ संगणक परिचालकांची दिवाळी मागील महिन्याचे मानधन न मिळाल्याने कडू

रत्नागिरी : जिल्ह्यातील ६६६ संगणक परिचालकांची दिवाळी मागील महिन्याचे मानधन न मिळाल्याने कडू झाली आहे. महाआॅनलाईनचा कारभार सुधारून या परिचालकांना ‘अच्छे दिन’ येणार कधी? असा प्रश्न विचारला जात आहे.जिल्ह्यात सात तालुके मिळून ६६६ संगणक परिचालक ग्रामपंचायतीत काम करीत आहेत. कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत सुदरीक यांनी या परिचालकांना दिवाळीपूर्वी मानधन देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. आॅगस्ट, सप्टेंबर या महिन्यांचे मानधन देण्यात आलेले नाही. परिचालकांनी त्यांच्या प्रलंबीत मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मे महिन्यात सादर केले होते. त्यावर जिल्हा समन्वयक व विभागीय प्रमुखांनी आश्वासने दिली होती. मात्र ती आश्वासने हवेत विरल्याने संगणक परिचालकांचा प्रश्न अद्याप ऐरणीवरच आहे.चार हजार १०० एवढे मानधन ठरलेले असताना अनेकांच्या खात्यावर त्या महिन्यात निम्म्याहुन कमी मानधन जमा झाले होते. काही परिचालकांचे जुलै महिन्याचे मानधन कंपनीने केले नाही. या मानधनाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. चार महिन्यापासून या परिचालकांना मानधन न मिळाल्यामुळे दिवाळी गेली. आता पुढील काळात परिचालकांना वेळेवर मानधन दिले जाईल का? हा प्रश्न असतानाच दिलेल्या निवेदनावर कोणतीही ठाम भूमिका घेत नसल्याबद्दल संबंधित परिचालकांनी कंपनीविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)