शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालक दोन महिने मानधनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र अर्थात संग्राम व सध्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांच्या मानधनाचा तिढा अद्याप कायम आहे. जुलै व ऑगस्टचे मानधन अद्याप देण्यात न आल्याने संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

डिजिटल महाराष्ट्राचे काम करणारे संगणक परिचालक ग्रामीण भागातील जनतेला रहिवासी बांधकाम परवाना, पीटीआर नक्कल अशा सर्व २९ प्रकारचे दाखले, ग्रामपंचायतचा संपूर्ण जमा-खर्चाची नोंद घेणे, ग्रामसभा, मासिक सभेचे ऑनलाईन कामकाज, १४ व्या वित्त आयोगाचा गावविकास आराखडा यासह ग्रामपंचायत ‘सांगेल ते काम’ करीत आहेत. शेतकरी कर्जमाफी, अस्मिता योजना, जनगणना, घरकुल सर्वे, प्रधानमंत्री पीकविमा योजना इत्यादी प्रकारची महत्त्वपूर्ण कामे करणाऱ्या संगणक परिचालकांच्या मागण्या अद्याप दुर्लक्षित आहेत, शिवाय दोन महिन्यांचे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. कोरोनाचा फटका सर्व आस्थापनांना बसला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही संगणक परिचालक काम करीत असून, त्यांना आवश्यक स्टेशनरीही मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वास्तविक गणेशोत्सव असल्याने मानधन वेळेवर होणे आवश्यक होते. सणासुदीच्या काळातही उपासमारीची वेळ आली आहे.

जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायती असून लोकसंख्येच्या आधारावर संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाभरात ५५० संगणक परिचालक कार्यरत आहेत. ग्रामपंचायत तेथे इंटरनेट, संगणक प्रणाली जोडण्यात येऊन पेपरलेस ग्रामपंचायतीचा कारभार सुरू झाला. संपूर्ण राज्यासाठी यंत्रणा राबविण्यासाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीकडून संगणक परिचालकांचे मानधन वेळेवर दिले जात नाही. या कंपनीला प्रत्येक ग्रामपंचायतीकडून चौदाव्या वित्त आयोगामधून वार्षिक एक ते दीड लाख रुपये जमा करण्यात येतात. संगणक परिचालकांचे मानधन व ग्रामपंचायतींना लागणारी स्टेशनरी पुरविण्याचे कंत्राट या कंपनीला देऊ केले आहे. मात्र, संबंधित कंपनीकडून मानधन व स्टेशनरी कधीच वेळेवर दिली जात नाही.

--------------------

डिजिटल महाराष्ट्राचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांकडून काम करून घेत असताना दोन-तीन महिने मानधन दिले जात नाही. ग्रामपंचायतीकडून मानधनाची रक्कम कंपनीकडे आधीच जमा करुनही मानधन काढण्याकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आता तरी संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.

- हरिष वेदरे, जिल्हाध्यक्ष, संगणक परिचालक संघटना