शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून संगणकाची उपलब्धता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST

- शाळा बंद मात्र शिक्षण सुरू लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचा परिणाम सर्व क्षेत्रावर झाला आहे. प्रत्यक्ष वर्ग ...

- शाळा बंद मात्र शिक्षण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाचा परिणाम सर्व क्षेत्रावर झाला आहे. प्रत्यक्ष वर्ग भरविणे शक्य नसल्याने शाळांचे अध्यापन ऑनलाईन सुरू आहे; मात्र काही ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांनी ‘शाळा बंद पण शिक्षण चालू’ या उपक्रमांतर्गत मुलांपर्यंत शिक्षणाचा वसा विविध मार्गाने पोहोचवत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे घेवडेवाडी या गावातील प्राथमिक शिक्षक ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील आहेत.

जिल्ह्यातील शाळांमध्ये Online/off-line च्या माध्यमातून शिक्षण विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. शहरात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे सोयीस्कर होत असले तरी ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आहे. शिवाय मोलमजुरी करणाऱ्या पालकांकडे स्मार्टफोन नाही. त्यामुळे वाड्या-वस्ती, दुर्गम भागात वसलेल्या वाडीतील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचणे जोखमीचे झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील ‘पिरंदवणे-घेवडेवाडी’ गावातील प्राथमिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी लोकसहभागातून संगणकाद्वारे अध्यापन सुरू केले आहे.

मुख्याध्यापक कपिल तडखेले व शिक्षक सतीश निकुंभ यांनी लोकसहभागातून, पिरंदवणे ग्रामपंचायतीच्या मदतीने शाळेसाठी एक संगणक व डोंगल मिळविला आहे. गावात सर्व ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे नेटवर्क उपलब्ध झालेल्या ठिकाणी हा संगणक व डोंगल जोडण्यात आला आहे. त्यामुळे शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे वेळापत्रक ठरवून त्या विद्यार्थ्यांना वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. कोरोनाचे नियम पाळून सोशल डिस्टन्सिंग वापर करून संगणकासमोर बसून अध्यापन करीत आहे. याशिवाय सतीश निकुंभ नेटवर्क मिळेल अशा ठिकाणाहून स्वत:च्या मोबाईलवरून गुगल- मीटद्वारे मुलांना ऑनलाइन शिक्षण देत आहेत. दररोज एक तास एका वर्गासाठी अशा प्रकारे सर्व वर्गासाठी अध्यापन सुरू आहे.

पिरंदवणे घेवडेवाडी शाळेत १७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऑनलाइन शाळेत हजेरी लावून दररोजचा अभ्यास करत आहेत. शिक्षक व ग्रामस्थ यांनी घेतलेल्या या मेहनतीतून विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी शशिकांत त्रिभुवणे, केंद्रप्रमुख महेंद्र जाधव यांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ- पालक, शिक्षकांचे कौतुक केले आहे.