शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबाला वाळीत टाकल्याची तक्रार

By admin | Updated: February 17, 2016 01:08 IST

पोलिसांकडे मांडले गाऱ्हाणे : संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फ संगमेश्वर गावातील घटना

देवरूख : देवाच्या नावावर कोणतीही हत्या करू नका, भक्ष्य देऊ नका, असे सांगितले म्हणून गावाने आपल्या कुटुंबाला वाळीत टाकले, अशी तक्रार वाशीतर्फ संगमेश्वर गावातील ग्रामस्थ संतोष सदानंद बोल्ये यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.या तक्रारवजा निवेदनात म्हटले आहे की, गावातील ग्रामस्थांना देवदेवस्कीच्या नावाखाली घाबरवून येथील ग्रामस्थाने आमच्या कुटुंबाला सहकार्य न करण्यास (वाळीत टाकण्यास) प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. वाशीतर्फ संगमेश्वर गावचे रहिवासी सन २०१५ पर्यंत कै. सदानंद बाबू बोल्ये यांच्या अधिपत्याखाली गावातील सण, उत्सव साजरे करत होते. रत्नकांत बोल्ये हे वाशी गावचे २००३पर्यंत गावकर म्हणून काम करीत होते. मात्र, ते अनधिकृत काम करीत असल्याचे लक्षात येताच गावाने बैठक बोलावली. या बैठकीतून ते कोणतेही कारण न देता निघून गेल्याने गावाने २००३ साली गावकीची जबाबदारी सदानंद बोल्ये यांच्याकडे दिली, असेही या निवेदनात म्हटले आहे. तेव्हापासून २०११ पर्यंत रत्नकांत हे गावाला कोणत्याच प्रकारचे सहकार्य करीत नव्हते. त्यावर्षी त्यांच्याकडे पालखी न नेण्याचा निर्णय गावाने घेतला. मात्र, या उत्सवात कोणतेही सहकार्य न करता त्यांनी गावाकडून पालखी ओढून नेण्याचा प्रकार केला. उत्सवात गावात तंटा नको म्हणून गावाने याची तक्रार केली नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. सन २०१२मध्ये सदानंद बोल्ये यांनी याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावर त्यांना बोलावून पोलिसांनी समज दिली. मात्र, ते आपल्या हट्टावर कायम राहिल्याने त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. २०१४ साली पुन्हा तक्रार झाल्यावर संगमेश्वर पोलिसांनी त्यांना बोलावून घेत गावाला सहकार्य करण्याची तंबी दिली. ती मान्य झाल्याने गावाने त्यांना सामावून घेतले. यानंतर गावातील काही लोकांना हाताशी धरून त्यांनी देवदेवस्कीची भीती दाखवण्यास सुरुवात केल्याचे निवेदनात म्हटले आहे. २६ एप्रिल २०१४ रोजी गावात झालेल्या बैठकीत यापुढे देवाच्या नावावर कोणतीच हत्या करायची नाही व देवाला नैवेद्य म्हणून भक्ष्य द्यायचे नाही, असा ठराव झाला. सर्व गावाने तशी प्रतिज्ञाही केली. मात्र, त्यांनी या गोष्टीला विरोध केला. यानंतर २१ जून २०१४ च्या बैठकीत त्यांनी मागील ठरावाला विरोध करून मी तीन महिन्यांत गावाची घडी बसवतो, असे सांगितले. गावानेही त्यांना मुदत दिली. मात्र, त्यांनी तसे न करता नवरात्र उत्सवात बाधा आणली. यावेळीही गावातील शांतता बिघडू नये म्हणून गावकरी शांत राहिले. यानंतर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकर पदावरून गोंधळ घातला. ही सभा पुन्हा घेण्यात आली. २०१५ मध्ये गावातील शांतता बिघडल्याने पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली शिंंपणे उत्सव रद्द करण्यात आला. यावेळी बैठक झाली, पण तोडगा पडला नाही. त्याचवर्षी सदानंद बोल्ये यांचे निधन झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी आपणाकडे त्यांचा मुलगा म्हणून गावाचा खजिना मागितला, तो आपण गावाकडे सुपूर्द केला. मात्र, आम्ही केलेल्या हत्याविरोधी ठरावाला विरोध करीत काही ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्हाला वाळीत टाकण्याचे काम केल्याचे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)अराजकता : ग्रामस्थांमध्ये फूट पडलीदेवदेवस्कीच्या नावावर गावात अराजकता माजवली जात आहे. यातून ग्रामस्थांमध्ये फूट पडली आहे. याबाबत योग्य ती चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, देवरूख तहसीलदार यांच्याकडेही सादर करण्यात आले आहे.