शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

महामार्गाच्या भूसंपादित जमिनींचा मोबदला रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:34 IST

लांजा : गेल्या साडेतीन वर्षांपासून अधिक काळ राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेतील मोबदला लांजा शहरातील अनेक जमीन मालकांना मिळालेला ...

लांजा

: गेल्या साडेतीन वर्षांपासून अधिक काळ राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेतील मोबदला लांजा शहरातील अनेक जमीन मालकांना मिळालेला नाही. भूसंपादन होऊनही आजवर मोबदला प्राप्त झालेला नसल्याने यामागे प्रशासकीय अनास्था प्रकर्षाने समोर येत आहे. केवळ लोकांना वेठीस धरून चुकीच्या नियमांचा बडगा उगारणाऱ्या प्रशासनाच्या या भूमिकेबाबत प्रकल्पबाधित लोकांकडून नाराजी उफाळून आली आहे.

महामार्ग प्रकल्पबाधित संघर्ष समितीचे लांजातील प्रमुख महंमद रखांगी आणि जयवंत शेट्ये यांनी प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत भूमिका मांडताना महंमद रखांगी यांनी सांगितले की, काही नागरिकांनी मोबदला न घेण्याच्या या अडचणी प्रशासनानेच निर्माण केल्या आहेत. मोबदला दरातील तफावत आणि दर लावताना केलेली जनतेची क्रूर चेष्टा यामुळेच ही प्रक्रिया रखडली आहे. प्रशासकीयदृष्ट्या अनेक त्रुटी असल्याने जमीन मालकांनी हा मोबदला स्वीकारलेला नाही. दोन महिन्यांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत प्रलंबित जमीनमालक आणि संबंधित प्रशासन यांच्या दोन बैठका घेऊन लांजा शहरातील नागरिकांचा प्रलंबित मोबदला वेळेत मिळावा आणि या कामाला गती द्यावी यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार महसूल आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला त्यांनी स्पष्ट सूचनावजा आदेश दिले होते. महसूल आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने समन्वय ठेवून यावर मार्ग काढणे आवश्यक होते, परंतु मुळात पिढीजात बिनशेती असलेल्या जमिनींचे पुरावे द्या, अशी चुकीच्या पद्धतीने मागणी केली जात आहे.

जमिनीचा मोबदला १,४५३ दिवस प्रलंबित राहिल्याने या दिवसांची व्याज आकारणी देणे अशक्यप्राय आहे, अशी भूमिका महामार्ग विभागाने घेतली आहे. या दिरंगाई झालेल्या कालावधीला जबाबदार कोण, यामध्ये राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि महसूल खाते यांच्यातील सावळागोंधळ लोकांना वेठीस धरत आहे. दोन प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे लोकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. स्वतंत्रपणे जमीन मालकांचे सातबारे असतानाही केवळ लोकांना वेठीस धरू नका त्या अडचणी काढून चुकीच्या नियमांच्या आधारे हा छळ सुरू असल्याचे रखांगी आणि शेट्ये यांनी सांगितले.

या प्रशासकीय अनास्थेमुळेच महामार्गाचे काम रखडले आहे. या प्रशासनाला महामार्ग चौपदरीकरण करायचेच नाही हे यावरून दिसत आहे. केवळ लोकांचा छळ करायचा आहे. रस्त्याच्या कामाच्या दिरंगाईला जबाबदार कोणाला धरायचे याबाबत प्रशासनात मतभेद आहेत. प्रलंबित दिवसांच्या व्याज आकारणीसाठी जबाबदार कोणाला धरायचे हा पेच निर्माण झाला आहे. हे व्याज जमीन मालकांना मिळणे आवश्यक आहे.

ज्यावेळी भूसंपादनाची प्रक्रिया झाली तेव्हापासून संबंधित यंत्रणांनी या भूसंपादन प्रक्रियेतील तज्ज्ञ लोकांना स्वतंत्र भरती करून याबाबतच्या अडचणी आणि या प्रक्रियेतील समस्या दूर केल्या होत्या. मग सरकारच्या पैशावर या तज्ज्ञ लोकांना पगार देऊन जर या लोकांनी संपूर्ण प्रक्रियेतील अडचणी, भूसंपादन प्रक्रियेतील अडचणी दूर केल्या असतानाही केवळ चुकीच्या पद्धतीने आज प्रशासन जनतेला वेठीस धरीत आहे. केवळ अडचणी निर्माण करून लोकांचा जमिनीचा मोबदला रखडविला आहे. यामुळे जमीन मालकांनी आपल्या जागेत महामार्गाचे काम करू न दिल्यास हा रस्ता आणि उड्डाणपूल रखडविण्याची यांची मानसिकताच आहे हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.